शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

‘वर्दळी’मुळे कोरोनाची चेन ब्रेक होणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

घनश्याम कुंभार यड्राव : शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी कडक होण्याऐवजी ग्रामस्थांचा ...

घनश्याम कुंभार

यड्राव : शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी कडक होण्याऐवजी ग्रामस्थांचा रस्त्यावरील बिनधास्त वावर चिंताजनक आहे. या लोकांवर कारवाई करण्यास अनास्था दाखवत आहे, की हतबल बनले आहे. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक होणार का, हा संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढत असल्याने व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्याने शासनाला उपाययोजना करणे भाग पडले आहे. त्यास अनुसरून पंधरा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला.

त्यातील नियमांबाबत संभ्रम असतानाच नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी रस्त्यावर बिनधास्तपणे वावरत आहेत.

यड्राव हा औद्योगिक परिसर असल्याने इचलकरंजी शहराचा एकजीव झालेला भाग आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण, उद्योग यासह विविध कारणांसाठी या परिसरातून लोकांची वर्दळ, तर सांगली- मिरजकडून कर्नाटक राज्याकडे जाण्यास हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर नागरिकांची रहदारी मोठी आहे.

इचलकरंजी शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर यड्राव, खोतवाडी या परिसरात रुग्णसंख्या ही हातावर मोजण्याइतकी असली तरीही परिसरातील लोकांचा शहराशी असलेला संपर्क यामुळे रुग्ण संख्या वाढू नये, ही काळजी घेणे आवश्यक आहे.

यड्राव फाटा येथे पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला आहे; परंतु याठिकाणी बिनधास्त फिरणाऱ्यांची चौकशी होताना दिसत नाही. अशा वर्दळीमुळे कोरोनाची चेन ब्रेक होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेस ग्रामस्थांसह प्रशासन गांभीर्य दाखवत नाही, हे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते व कोरोना रोखण्यासाठी शासनाने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांना खीळ बसविण्यास सर्व जण जबाबदार ठरू शकतात.

फोटो - २००४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ -

यड्राव (ता. शिरोळ) येथील यड्राव फाटा येथे पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असतानाही कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. (छाया : घनश्याम कुंभार)