शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

त्रिशताब्दी वर्षात विकास होणार का?

By admin | Updated: September 26, 2015 00:38 IST

अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना : मंदिर विकास आराखडा लटकला शासनाच्या मंजुरीसाठी

इंदुमती गणेश- कोल्हापूर -करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापना त्रिशताब्दी वर्षाला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. गेल्या सात वर्षांपासून रखडलेला मंदिर विकासाचा आराखडा या त्रिशताब्दीत तरी मार्गी लागणार का? असा प्रश्न आहे. या आराखड्यात दिलेल्या सूचनांनुसार सुधारणा करून तो मंजुरीसाठी शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सध्याच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना २६ सप्टेंबर १७१५ रोजी करण्यात आली. तीनशे वर्षांत मूळ मंदिराचे विकासाचे एक पाऊलही पुढे गेलेले नाही. शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या मंदिराच्या विकासासाठी फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २२५ कोटींचा आराखडा मार्च महिन्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सादर केला होता. त्यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांना या आराखड्याचे टप्पे करायला सांगितले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि भोवतालच्या परिसराचा विचार केला जावा, असे सुचविले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यासाठी १२५ कोटींचा आराखडा तयार केला. भाजप सत्तेत आल्यानंतर मांडण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये अंबाबाई मंदिरासह महाराष्ट्रातील अन्य १० देवस्थानांसाठी मिळून शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती; पण त्यातील एक रुपयाही अजून मंदिराच्या विकासासाठी आलेला नाही. महापालिकेने पाठविलेल्या आराखड्यात शासनाने काही त्रुटी व शंका उपस्थित केल्या होत्या. त्या त्रुटींत सुधारणा करून ते मंजुरीसाठी पुन्हा पाठविण्यात आले आहे. मात्र, गेले तीन महिने झाले त्याला शासनाने मंजुरी दिलेली नाही की अभिप्राय दिलेला नाही. जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी हा आराखडा सदस्यांसमोर मांडला. त्यात समितीने विकास आराखड्याला मंजुरी व विकासकामांना ‘एनओसी’ दिली. देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हे मंदिर विकासासाठीचा शंभर टक्के निधी शासनाने द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले होते. हे सगळे नियोजन, आराखडे कागदोपत्रीच रंगले. प्रत्यक्षात मंदिराच्या आहे त्या स्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. हा दुजाभाव का?नांदेडसह अन्य देवस्थानांच्या विकासासाठी शासनाने शंभर टक्के निधी दिला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला वर्षाला २२ लाखांहून अधिक नागरिक येतात. साडेतीन शक्तिपीठांतील एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणून मंदिराचे महत्त्व अधोरेखित आहे. महाराष्ट्रातील एकही नेता असा नसेल, ज्याने अंंबाबाईचे दर्शन घेतलेले नाही की तिची महती त्याला माहीत नाही. तरीही मंदिराच्या विकास आराखड्याला एवढा वेळकाढूपणा का केला जात आहे? असा प्रश्न आहे.