शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

त्रिशताब्दी वर्षात विकास होणार का?

By admin | Updated: September 26, 2015 00:38 IST

अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना : मंदिर विकास आराखडा लटकला शासनाच्या मंजुरीसाठी

इंदुमती गणेश- कोल्हापूर -करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापना त्रिशताब्दी वर्षाला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. गेल्या सात वर्षांपासून रखडलेला मंदिर विकासाचा आराखडा या त्रिशताब्दीत तरी मार्गी लागणार का? असा प्रश्न आहे. या आराखड्यात दिलेल्या सूचनांनुसार सुधारणा करून तो मंजुरीसाठी शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सध्याच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना २६ सप्टेंबर १७१५ रोजी करण्यात आली. तीनशे वर्षांत मूळ मंदिराचे विकासाचे एक पाऊलही पुढे गेलेले नाही. शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या मंदिराच्या विकासासाठी फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २२५ कोटींचा आराखडा मार्च महिन्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सादर केला होता. त्यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांना या आराखड्याचे टप्पे करायला सांगितले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि भोवतालच्या परिसराचा विचार केला जावा, असे सुचविले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यासाठी १२५ कोटींचा आराखडा तयार केला. भाजप सत्तेत आल्यानंतर मांडण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये अंबाबाई मंदिरासह महाराष्ट्रातील अन्य १० देवस्थानांसाठी मिळून शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती; पण त्यातील एक रुपयाही अजून मंदिराच्या विकासासाठी आलेला नाही. महापालिकेने पाठविलेल्या आराखड्यात शासनाने काही त्रुटी व शंका उपस्थित केल्या होत्या. त्या त्रुटींत सुधारणा करून ते मंजुरीसाठी पुन्हा पाठविण्यात आले आहे. मात्र, गेले तीन महिने झाले त्याला शासनाने मंजुरी दिलेली नाही की अभिप्राय दिलेला नाही. जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी हा आराखडा सदस्यांसमोर मांडला. त्यात समितीने विकास आराखड्याला मंजुरी व विकासकामांना ‘एनओसी’ दिली. देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हे मंदिर विकासासाठीचा शंभर टक्के निधी शासनाने द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले होते. हे सगळे नियोजन, आराखडे कागदोपत्रीच रंगले. प्रत्यक्षात मंदिराच्या आहे त्या स्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. हा दुजाभाव का?नांदेडसह अन्य देवस्थानांच्या विकासासाठी शासनाने शंभर टक्के निधी दिला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला वर्षाला २२ लाखांहून अधिक नागरिक येतात. साडेतीन शक्तिपीठांतील एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणून मंदिराचे महत्त्व अधोरेखित आहे. महाराष्ट्रातील एकही नेता असा नसेल, ज्याने अंंबाबाईचे दर्शन घेतलेले नाही की तिची महती त्याला माहीत नाही. तरीही मंदिराच्या विकास आराखड्याला एवढा वेळकाढूपणा का केला जात आहे? असा प्रश्न आहे.