शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

‘दौलत’ आतातरी सुरू होणार का ?

By admin | Updated: October 29, 2014 00:16 IST

कामगार पगाराच्या प्रतीक्षेत : शेतकरी, कामगारांची त्यागाची भूमिका

नंदकुमार ढेरे -चंदगड गेली चार वर्षे बंद अवस्थेत असलेला दौलत शेतकरी सहकारी कारखाना या हंगामात तरी सुरू होणार का? याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा देण्यास तयार नाही. गेली चार वर्षे या तारखेला, त्या तारखेला पगार देतो, अशी कामगारांची फसवणूक झाल्याने त्यांचाही या तारखांवरील विश्वास उडाला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसिंगराव पाटील व ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक यांच्यात झालेली दिलजमाई यामुळे दौलत सुरू होण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत नरसिंगराव पाटील यांचा झालेला पराभव व ठरलेल्या तारखेला कामगारांचा न झालेला पगार यामुळे दौलत सुरू होण्याच्या आशा पुन्हा धुसर झाल्या आहेत.दौलत कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी, कामगार यांची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. दौलतवर अनेक वर्षे तालुक्याचे राजकारण खेळले गेले. हेही सर्वांना ज्ञात आहे. दौलतचा वापर कशा-कशाला केला हे तालुक्यातील जनतेने पाहिले. दौलतवर अनेक स्थित्यंतरे झाली. २००१ मध्ये दौलतचे तत्कालीन अध्यक्ष नरसिंगराव पाटील यांचे मेहुणे दौलतचे कार्यकारी संचालक गोपाळराव पाटील यांनी बंड करत दौलतची सत्ता हस्तगत केली होती. हा जरी इतिहास असला तरी या सत्तासंघर्षात दौलतचा बळी गेला असून, याची फळे मात्र शेतकरी व कामगारांना भोगावी लागत आहेत.अनेक अडचणींवर मात करून विद्यमान संचालक मंडळ दौलत सुरू करतील, या आशेपोटी कामगारांनी गेले ४५ महिने दौलतची राखण केली. उपाशीपोटी कारखान्याचा सांभाळ केला. कारखाना सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आल्या, पण सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे म्हणा किंवा दौलतवर झालेले अवाढव्य कर्ज यामुळे कंपन्याही धजावत नसाव्यात. तालुक्याची अस्मिता व आर्थिक केंद्रबिंंदू असलेला दौलत सुरू व्हावा, ही जनतेची इच्छा आहे.दौलतसाठी शेतकरी, कामगार यांनी आजपर्यंत त्यागाची भूमिका घेतली आहे. ते यापुढेही घेतील पण खरा प्रश्न आहे तो दौलतवरील कर्जाचा. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत जात आहे. शासनदरबारी प्रयत्न करून या कर्जावरील व्याज तरी थांबवून घेतले पाहिजे. विद्यमान संचालक मंडळाने मरगळ झटकून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा दौलतचा लिलाव एक दिवस ठरलेला आहे. त्यावेळी तालुक्यातील शेतकरी, कामकरी जनता व कामगार या विद्यमान संचालक मंडळाला कधीच माफ करणार नाही.‘दौलत’साठी तालुक्यातून निधी जमवावा !बंद अवस्थेत असलेला दौलत कारखाना सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळासह गोपाळराव पाटील, नरसिंगराव पाटील, भरमूअण्णा पाटील, संभाजीराव देसाई, प्रभाकर खांडेकर, मोहन कांबळे, सुरेशराव चव्हाण-पाटील यांच्यासह दौलतच्या माजी संचालकांनी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांनी निधी जमविल्यास दौलत सुरू होऊ शकतो. मात्र, विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे देऊन दौलत जनतेच्या हाती सोपवायला हवा...तर ‘दौलत’चा लिलाव अटळ४भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडात परिपूर्ण असलेला दौलत कारखाना ३ हंगाम बंद आहे. सहकाराच्या नियमानुसार ३ वर्षे बंद असलेली सहकारी संस्था आजारी म्हणून घोषित करून ती अवसायनात काढली जाते किंवा त्याचा लिलाव केला जातो. ४राजकारणात व सहकारात कधीही काहीही होऊ शकते. दौलतची वाटचाल ही त्याच दिशेने सुरू असल्याचे सहकारातील जानकारांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात दौलतचा लिलाव होऊन तो दौलतशी संबंधित व्यक्तीनीच घेतल्यास नवल वाटायला नको ! हे टाळायचे असेल, तर तालुक्यातील जनतेने उठाव करणे गरजेचे आहे. अन्यथा दौलतचा लिलाव अटळ आहे.