शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’ आतातरी सुरू होणार का ?

By admin | Updated: October 29, 2014 00:16 IST

कामगार पगाराच्या प्रतीक्षेत : शेतकरी, कामगारांची त्यागाची भूमिका

नंदकुमार ढेरे -चंदगड गेली चार वर्षे बंद अवस्थेत असलेला दौलत शेतकरी सहकारी कारखाना या हंगामात तरी सुरू होणार का? याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा देण्यास तयार नाही. गेली चार वर्षे या तारखेला, त्या तारखेला पगार देतो, अशी कामगारांची फसवणूक झाल्याने त्यांचाही या तारखांवरील विश्वास उडाला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसिंगराव पाटील व ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक यांच्यात झालेली दिलजमाई यामुळे दौलत सुरू होण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत नरसिंगराव पाटील यांचा झालेला पराभव व ठरलेल्या तारखेला कामगारांचा न झालेला पगार यामुळे दौलत सुरू होण्याच्या आशा पुन्हा धुसर झाल्या आहेत.दौलत कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी, कामगार यांची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. दौलतवर अनेक वर्षे तालुक्याचे राजकारण खेळले गेले. हेही सर्वांना ज्ञात आहे. दौलतचा वापर कशा-कशाला केला हे तालुक्यातील जनतेने पाहिले. दौलतवर अनेक स्थित्यंतरे झाली. २००१ मध्ये दौलतचे तत्कालीन अध्यक्ष नरसिंगराव पाटील यांचे मेहुणे दौलतचे कार्यकारी संचालक गोपाळराव पाटील यांनी बंड करत दौलतची सत्ता हस्तगत केली होती. हा जरी इतिहास असला तरी या सत्तासंघर्षात दौलतचा बळी गेला असून, याची फळे मात्र शेतकरी व कामगारांना भोगावी लागत आहेत.अनेक अडचणींवर मात करून विद्यमान संचालक मंडळ दौलत सुरू करतील, या आशेपोटी कामगारांनी गेले ४५ महिने दौलतची राखण केली. उपाशीपोटी कारखान्याचा सांभाळ केला. कारखाना सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आल्या, पण सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे म्हणा किंवा दौलतवर झालेले अवाढव्य कर्ज यामुळे कंपन्याही धजावत नसाव्यात. तालुक्याची अस्मिता व आर्थिक केंद्रबिंंदू असलेला दौलत सुरू व्हावा, ही जनतेची इच्छा आहे.दौलतसाठी शेतकरी, कामगार यांनी आजपर्यंत त्यागाची भूमिका घेतली आहे. ते यापुढेही घेतील पण खरा प्रश्न आहे तो दौलतवरील कर्जाचा. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत जात आहे. शासनदरबारी प्रयत्न करून या कर्जावरील व्याज तरी थांबवून घेतले पाहिजे. विद्यमान संचालक मंडळाने मरगळ झटकून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा दौलतचा लिलाव एक दिवस ठरलेला आहे. त्यावेळी तालुक्यातील शेतकरी, कामकरी जनता व कामगार या विद्यमान संचालक मंडळाला कधीच माफ करणार नाही.‘दौलत’साठी तालुक्यातून निधी जमवावा !बंद अवस्थेत असलेला दौलत कारखाना सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळासह गोपाळराव पाटील, नरसिंगराव पाटील, भरमूअण्णा पाटील, संभाजीराव देसाई, प्रभाकर खांडेकर, मोहन कांबळे, सुरेशराव चव्हाण-पाटील यांच्यासह दौलतच्या माजी संचालकांनी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांनी निधी जमविल्यास दौलत सुरू होऊ शकतो. मात्र, विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे देऊन दौलत जनतेच्या हाती सोपवायला हवा...तर ‘दौलत’चा लिलाव अटळ४भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडात परिपूर्ण असलेला दौलत कारखाना ३ हंगाम बंद आहे. सहकाराच्या नियमानुसार ३ वर्षे बंद असलेली सहकारी संस्था आजारी म्हणून घोषित करून ती अवसायनात काढली जाते किंवा त्याचा लिलाव केला जातो. ४राजकारणात व सहकारात कधीही काहीही होऊ शकते. दौलतची वाटचाल ही त्याच दिशेने सुरू असल्याचे सहकारातील जानकारांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात दौलतचा लिलाव होऊन तो दौलतशी संबंधित व्यक्तीनीच घेतल्यास नवल वाटायला नको ! हे टाळायचे असेल, तर तालुक्यातील जनतेने उठाव करणे गरजेचे आहे. अन्यथा दौलतचा लिलाव अटळ आहे.