शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडला या हंगामात तरी शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

नंदकुमार ढेरे । चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे ...

नंदकुमार ढेरे ।

चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात यावर्षी काजू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीत झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

यावर्षी दरही चांगला मिळण्याची अपेक्षा असली तरी उत्पादन सुरू झाल्यानंतर दर एकदम कोसळतो हा अनुभव नवा नाही. त्यामुळे योग्य दरासाठी काजू उत्पादक काय भूमिका घेतात व तालुक्यातील शेतकरी संघटनांचे दरासाठी योगदान कसे राहते, यावरच यंदाचा काजू हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार का, हे अवलंबून असेल.

चंदगड तालुक्यात काजू फळधारणेस प्रारंभ झाला आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे काजूची कवडीमोल भावाने विक्री झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी काजू पीक उत्तम स्थितीत मोहरले असून, उत्पादनही चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर पिकांप्रमाणे मोठी गुंतवणूक होत नसल्याने काजू पीक चंदगडकरांसाठी किफायतशीर आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून मेपर्यंत काजू बागेत निगराणी करावी लागते. यासाठी मनुष्यबळ खर्ची पडत असल्याने यासाठी घेतले जाणारे कष्ट हे अधिकच आहेत.

हंगामात काजू बाग दोन ते तीन वेळा बेंदावी लागेत. बागेत खोप तयार करून दिवसभर काजूची राखण करावी लागते. काजू वेचणीसाठी घरातील सर्वच मंडळी कामाला लागतात. त्यामुळे या पिकासाठी घेतला जाणारा वेळ आणि मनुष्यबळ पाहता योग्य भाव मिळणे अपेक्षित असते. तीन-चार वर्षांपूर्वी काजूला प्रतिकिलो १६० रुपये भाव मिळाला होता. चंदगडचे काजू चवदार असूनही त्यास हमीभाव नसल्याने काजू उत्पादकांचा अपेक्षाभंग होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका काजू उत्पादकांनाही बसला. उत्पादकांकडून व्यापाऱ्याने केवळ ६० ते ८० रुपये प्रतिकिलो या दराने काजू खरेदी केली.

काही शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने काजूसाठा घरीच ठेवला. आज ना उद्या दर वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र भाव न वाढल्याने अखेर मिळेल त्या दराला काजू विक्री करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू उत्पादनावर फिरते. लग्नसराईच्या हंगामातच काजूची सुगी होत असल्याने शेतकरी कुटुंबातील अनेक गरजांची पूर्तता या काजूवर ठरवली जाते.

काजू राखण, पक्व झालेले पीक जमा करणे, बागेची स्वच्छता, नवीन रोपांची जोपासना, काजू झाडावर फवारणी करणे अशी कामे करीत चार-पाच महिने वेळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव मिळाला की कष्टाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.

--------------------------

* काजू फोटो : ३००३२०२१-गड-०५/०६