शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडला या हंगामात तरी शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

नंदकुमार ढेरे । चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे ...

नंदकुमार ढेरे ।

चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात यावर्षी काजू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीत झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

यावर्षी दरही चांगला मिळण्याची अपेक्षा असली तरी उत्पादन सुरू झाल्यानंतर दर एकदम कोसळतो हा अनुभव नवा नाही. त्यामुळे योग्य दरासाठी काजू उत्पादक काय भूमिका घेतात व तालुक्यातील शेतकरी संघटनांचे दरासाठी योगदान कसे राहते, यावरच यंदाचा काजू हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार का, हे अवलंबून असेल.

चंदगड तालुक्यात काजू फळधारणेस प्रारंभ झाला आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे काजूची कवडीमोल भावाने विक्री झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी काजू पीक उत्तम स्थितीत मोहरले असून, उत्पादनही चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर पिकांप्रमाणे मोठी गुंतवणूक होत नसल्याने काजू पीक चंदगडकरांसाठी किफायतशीर आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून मेपर्यंत काजू बागेत निगराणी करावी लागते. यासाठी मनुष्यबळ खर्ची पडत असल्याने यासाठी घेतले जाणारे कष्ट हे अधिकच आहेत.

हंगामात काजू बाग दोन ते तीन वेळा बेंदावी लागेत. बागेत खोप तयार करून दिवसभर काजूची राखण करावी लागते. काजू वेचणीसाठी घरातील सर्वच मंडळी कामाला लागतात. त्यामुळे या पिकासाठी घेतला जाणारा वेळ आणि मनुष्यबळ पाहता योग्य भाव मिळणे अपेक्षित असते. तीन-चार वर्षांपूर्वी काजूला प्रतिकिलो १६० रुपये भाव मिळाला होता. चंदगडचे काजू चवदार असूनही त्यास हमीभाव नसल्याने काजू उत्पादकांचा अपेक्षाभंग होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका काजू उत्पादकांनाही बसला. उत्पादकांकडून व्यापाऱ्याने केवळ ६० ते ८० रुपये प्रतिकिलो या दराने काजू खरेदी केली.

काही शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने काजूसाठा घरीच ठेवला. आज ना उद्या दर वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र भाव न वाढल्याने अखेर मिळेल त्या दराला काजू विक्री करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू उत्पादनावर फिरते. लग्नसराईच्या हंगामातच काजूची सुगी होत असल्याने शेतकरी कुटुंबातील अनेक गरजांची पूर्तता या काजूवर ठरवली जाते.

काजू राखण, पक्व झालेले पीक जमा करणे, बागेची स्वच्छता, नवीन रोपांची जोपासना, काजू झाडावर फवारणी करणे अशी कामे करीत चार-पाच महिने वेळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव मिळाला की कष्टाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.

--------------------------

* काजू फोटो : ३००३२०२१-गड-०५/०६