शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

चंदगडला या हंगामात तरी शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

नंदकुमार ढेरे । चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे ...

नंदकुमार ढेरे ।

चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात यावर्षी काजू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीत झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

यावर्षी दरही चांगला मिळण्याची अपेक्षा असली तरी उत्पादन सुरू झाल्यानंतर दर एकदम कोसळतो हा अनुभव नवा नाही. त्यामुळे योग्य दरासाठी काजू उत्पादक काय भूमिका घेतात व तालुक्यातील शेतकरी संघटनांचे दरासाठी योगदान कसे राहते, यावरच यंदाचा काजू हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार का, हे अवलंबून असेल.

चंदगड तालुक्यात काजू फळधारणेस प्रारंभ झाला आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे काजूची कवडीमोल भावाने विक्री झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी काजू पीक उत्तम स्थितीत मोहरले असून, उत्पादनही चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर पिकांप्रमाणे मोठी गुंतवणूक होत नसल्याने काजू पीक चंदगडकरांसाठी किफायतशीर आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून मेपर्यंत काजू बागेत निगराणी करावी लागते. यासाठी मनुष्यबळ खर्ची पडत असल्याने यासाठी घेतले जाणारे कष्ट हे अधिकच आहेत.

हंगामात काजू बाग दोन ते तीन वेळा बेंदावी लागेत. बागेत खोप तयार करून दिवसभर काजूची राखण करावी लागते. काजू वेचणीसाठी घरातील सर्वच मंडळी कामाला लागतात. त्यामुळे या पिकासाठी घेतला जाणारा वेळ आणि मनुष्यबळ पाहता योग्य भाव मिळणे अपेक्षित असते. तीन-चार वर्षांपूर्वी काजूला प्रतिकिलो १६० रुपये भाव मिळाला होता. चंदगडचे काजू चवदार असूनही त्यास हमीभाव नसल्याने काजू उत्पादकांचा अपेक्षाभंग होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका काजू उत्पादकांनाही बसला. उत्पादकांकडून व्यापाऱ्याने केवळ ६० ते ८० रुपये प्रतिकिलो या दराने काजू खरेदी केली.

काही शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने काजूसाठा घरीच ठेवला. आज ना उद्या दर वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र भाव न वाढल्याने अखेर मिळेल त्या दराला काजू विक्री करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू उत्पादनावर फिरते. लग्नसराईच्या हंगामातच काजूची सुगी होत असल्याने शेतकरी कुटुंबातील अनेक गरजांची पूर्तता या काजूवर ठरवली जाते.

काजू राखण, पक्व झालेले पीक जमा करणे, बागेची स्वच्छता, नवीन रोपांची जोपासना, काजू झाडावर फवारणी करणे अशी कामे करीत चार-पाच महिने वेळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव मिळाला की कष्टाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.

--------------------------

* काजू फोटो : ३००३२०२१-गड-०५/०६