शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

हिंस्त्र वन्यजीव गावकुसात

By admin | Updated: April 17, 2017 00:23 IST

तळपत्या उन्हाने जंगलातील जलस्रोत आटले असून कासावीस झालेले हिंस्त्र वन्यजीव गावकुसाकडे धाव घेत आहे.

जलस्रोत आटले : वाढत्या हल्ल्यांनी शेतकरी धास्तावले, महागावात तीन जखमी पुसद : तळपत्या उन्हाने जंगलातील जलस्रोत आटले असून कासावीस झालेले हिंस्त्र वन्यजीव गावकुसाकडे धाव घेत आहे. यातून मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढला असून पुसद आणि उमरखेड उपविभागात रानडुकरांच्या हल्ल्यांच्या घटनात वाढ झाली आहे. महागाव तालुक्यात तर एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला करून शेतमजुरांना गंभीर जखमी केले. उमरखेड आणि पुसद उपविभागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात तृणभक्षी आणि हिंस्र प्राणी आहेत. जंगलातून वाहणारी पैनगंगा आटल्याने वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी वन्यजीव विभागाने ठिकठिकाणी पानवठे उभारले आहे. परंतु या पानवठ्यांची देखभाल योग्यरीत्या होत नाही. पानवठ्यात वेळीच पाणी भरले जात नाही. त्यामुळे कासावीस झालेले वन्यजीव पाण्याच्या शोधात शेतशिवारात आणि गावकुसात शिरत आहेत. महागाव तालुक्यात गत आठवड्यात दोन शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. शेतात ज्वारीच्या रखवालीसाठी गेलेले माळकिन्ही येथील गजानन रामजी शिरडकर आणि जनावरे चारण्यासाठी जंगलात गेलेले लक्ष्मण रामजी इंगळे रा. साई यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात दोनही गंभीर जखमी झाले. या दोन घटना शेतात अथवा जंगलात तरी झाल्या. काळीदौलत येथील एका चिमुकलीवर रानडुकराने अंगणात येऊन हल्ला केला. शर्वरी शरद सरोदे (५) ही बालिका रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तसेच या गावातील एक महिलाही याच रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाली. पुसद उपविभागातील दिग्रस आणि पुसद तालुक्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ झाले आहे. माळपठार भागातील जंगलात वन्यजीव रस्त्यावर येत आहेत. रानडुक्कर सर्वाधिक आक्रमक झाले असून ओलिताच्या शेतात हमखास रानडुकरांचा संचार असतो. झुंडीने राहणारे रानडुक्कर हल्ला केल्यानंतर आपल्या सुळ्याने समोरच्याला अक्षरश: फाडून टाकतात. पुसद आणि दिग्रसमध्ये अशा घटना गत काही दिवसात पुढे आल्या आहेत. हिंस्त्र प्राणी गावकुसात आणि शेतशिवारात शिरत असल्याने शेतकरी आणि शेतमजुरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जंगलात एकटे दुकटे जाण्याची कुणीचीही हिंमत होत नाही. विशेष म्हणजे वन्यजीवाने हल्ला केल्यानंतर जखमीला वन विभागातर्फे नुकसानभरपाई दिली जाते. परंतु ही वेळच येऊ नये यासाठी वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. सध्या पारा ४३ अंशाच्या पार गेला असून जलस्त्रोत झपाट्याने खाली जात आहे. यामुळे वनविभागाने ठिकठिकाणी पानवठे निर्माण करण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहे. (कार्यालय चमू) शिकारीच्या घटनांत वाढ पाण्यासाठी कासावीस झालेले तृणभक्षी प्राणी गावकुसात शिरतात. व्याकुळ प्राणी अलगद शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतात. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात शिकाऱ्यांचा मुक्त संचार असल्याचे दिसून येते. काही दिवसापूर्वी दोन शिकाऱ्यांना एअरगणसह ताब्यात घेण्यात आले होते. आता तर मोर, हरीण, तितर, बटेर आदी पशुपक्षी पाण्याच्या शोधात असल्याने शिकाऱ्यांचे सहज सावज होत आहे. ग्रामीण भागापेक्षा वन्य प्राण्यांच्या शिकारीत शहरी मंडळीच गुंतली असून ग्रामीणांच्या मदतीने शिकारीचा हिस्सा शहरातील हॉटेल आणि ढाब्यांपर्यंत पोहोचतो. शिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई केली जात नाही.