शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लहरी हवामानामुळे काजूचे उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST

कडगाव : सतत बदलणाऱ्या व शेतकऱ्याला सुद्धा न समजणाऱ्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम भुदरगडच्या पश्चिम भागातील काजू पिकावर झाल्याने ...

कडगाव : सतत बदलणाऱ्या व शेतकऱ्याला सुद्धा न समजणाऱ्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम भुदरगडच्या पश्चिम भागातील काजू पिकावर झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत निम्मे उत्पादन तरी हाताला लागेल का? असा प्रश्न काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काजू उत्पादन घटल्यामुळे काजूबियांच्या पहिल्या आवकेलाच शेतकऱ्यांना तेजीतील दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान आहे. येत्या काही दिवसांत काजू बियांचा दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने व पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीमुळे असेल तसा आणि मिळेल तेवढ्या काजूबिया मिळविण्यासाठी व्यापारी स्पर्धा करीत आहेत.

तळ कोकणाला लागून असणाऱ्या भुदरगडच्या पश्चिम भागात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यंदा वातावरणातील बदलामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात काजू झाडांना असलेल्या बहरामुळे यंदा काजूचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता काजू उत्पादकांनी व्यक्‍त केली होती. मात्र, वातावरणात होत असणाऱ्या बदलामुळे व अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे काजूच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे सध्या काजू बीचा किलोचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. तो दीडशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

पारंपरिक शेती व्यवसायातून कसेबसे भागवणाऱ्या शेतकऱ्याला ऊस व भात या पारंपरिक पिकांबरोबरच काजूच्या उत्पन्नाची जोड मिळाली आहे. यंदा जर काजू बियांना चांगला दर मिळाला तर काजू उत्पादकांची आर्थिक घडी सावरण्यात थोडी मदत होऊ शकते.

या वर्षी काजू उत्पादनामध्ये झालेली घट यामुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला असून ज्या पद्धतीने कापूस, ऊस, कांदा यासारख्या पिकांना शासनाकडून अनुदान दिले जाते या पद्धतीने काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी.

शशिकांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते, तिरवडे, ता. भुदरगड

भुदरगड-आजरा परिसरातील काजूबियांचा दर्जा उच्च प्रतीचा आहे. या तुलनेत परदेशातून आयात केलेल्या बिया चवीच्या दृष्ट‌ीने अत्यंत सुमार दर्जाच्या असतात. कमी दरामुळे परदेशी काजूची आवक वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह छोट्या स्थानिक उद्योजकाचे गणित बिघडत आहे.

सुरेश शेवाळे नागनवाडी, काजू व्यापारी

फोटो:काजू