शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’वर राबविणार

By admin | Updated: March 12, 2016 01:06 IST

महापालिकेचे ११५८ कोटींचे अंदाजपत्रक ‘स्थायी’ला सादर

कोल्हापूर : मर्यादित आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन नवीन योजनांच्या फंदात न पडता सध्या अपूर्ण असलेल्या सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देणारे सन २०१६-२०१७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीसमोर मांडले. पुढील आर्थिक वर्षात कोल्हापूर शहर वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर कार्यान्वित करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे; तर रंकाळा, क ळंबा तलाव, सार्वजनिक उद्याने, पर्यावरण संवर्धनास अंदाजपत्रकात प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१६-२०१७ सालाचे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून ११५८ कोटी ४६ लाख १९ हजार ५५६ रुपयांचे नवीन अंदाजपत्रक आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्थायी समितीसमोर मांडले. उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, आस्थापनांवरील वाढता खर्च यांचा ताळमेळ घालताना मेटाकुटीस आलेल्या प्रशासनाने नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात उत्पन्न वाढविण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे एलबीटी, नगररचना, घरफाळा, आदी विभागांकडून पुढील वर्षात किमान ५८ ते ६० कोटींचे जादा उत्पन्न मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. शिवाय खर्चात काटकसर करण्याचाही निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण शहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. यामुळे आठ कोटींचे वीज बिल चार कोटींपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. शहरात सुरू असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सेफ सिटी योजना, तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देऊन नवीन वर्षात ते पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामास भांडवली खर्चाच्या २५ टक्के म्हणजे तब्बल ११९ कोटी रुपयांची तरतूद अंदापत्रकात करण्यात आलेली आहे. शिवाय ४०० कोटींच्या भुयारी गटार योजना व जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे प्रस्ताव राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले असून ते मंजूर करून आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. (प्रतिनिधी) रंकाळा, क ळंबा तलाव, सार्वजनिक उद्याने, पर्यावरण संवर्धनास प्राधान्यशहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविणार