शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

विधवा आहे म्हणून

By admin | Updated: June 5, 2015 00:13 IST

सिटी टॉक

मागील आठवड्यात शाहू स्मारक भवनमध्ये मराठा संघटनांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या विधवाश्रमाद्वारे विधवा महिलांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला तुलनेने महिलांची संख्या तशी कमी होती; पण जेवढ्या काही महिला तेथे उपस्थित होत्या, त्यापैकी प्रत्येकीला काही ना काही आशा होती. या मेळाव्यात महिलांनी आपले अनुभव मांडणे अपेक्षित होते. दोन-तीन महिलांनी धाडस केले, विधवा म्हणून जगताना येणारे अनुभव सांगताना त्यांच्या डोळ््यांतून अश्रू येत होते, तरी त्या पहिल्यांदा मन मोकळं करत होत्या. विधवा म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून आम्हाला समानतेने जगण्याचा अधिकार द्या, असे त्या म्हणत होत्या. मला आठवतंय मी सातवीत आणि मोठी बहीण नववीत असताना माझ्या निवृत्त माजी सैनिक असलेल्या वडिलांचे निधन झाले. पप्पांनी आम्हाला खूप लाडात वाढविले होते. आई घरबसल्या काही तरी छोटे-मोठे काम करायची; पण वडिलांच्या निधनानंतर आम्हा दोघींची सगळी जबाबदारी आईवर आली. त्यात कागदपत्रांच्या घोळामुळे पेन्शनसाठी तीन वर्षे आईला जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरश: हेलपाटे मारावे लागायचे. या सगळ््या अडचणींच्या काळात तिने शिवणकाम, वह्या, पुस्तकांचे बायडिंग, उन्हाळी पदार्थांचा व्यवसाय करून आमच्या शिक्षणाची तरतूद केली. आम्हीही तिला मदत करत होतो. पुढे पेन्शनही चालू झाली; पण तीन वर्षांचा खडतर काळ आईने कसा झेलला असेल? त्यात नाही ते टोमणे मारणाऱ्यांचीही संख्या काही कमी नव्हती. आम्ही शिकलो स्वत:च्या पायावर उभे राहिलो; पण त्याची मुळे आईने केलेल्या कष्टात तिने दिलेल्या भक्कम पाठिंब्यावर आधारलेली आहेत.सोलापूरसारख्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये विधवांना फारसे अंतर दिले जात नाही किंवा जीवनशैलीत केवळ विधवा आहे म्हणून वेगळा बदल करावा लागत नाही; पण कोल्हापुरात या रूढीचे प्रमाण खूप जास्त असल्याचे मला गेल्या नऊ वर्षांत जाणवले. म्हणजे विधवा महिलेने गळ््यातल्या माळेतही काळे मणी घालायचे नाहीत, अधिक तर पांढरी साडी नेसायची किंवा रंगाची साडी असली तरी हिरव्या रंगांचा लवलेशही असू नये, हातात बांगड्या घालायच्या नाहीत, कपाळ मोकळंच ठेवायचं. कोणतीही टिकली नाही की गंध नाही. कार्यक्रमांमध्ये फारसं पुढे यायचं नाही. कुणाचे औक्षण करायचे नाही. शुभकार्ये, पूजाविधी करायचे नाहीत. लग्नकार्यात डिझायनर साडी किंवा ब्लाऊज घालायचं नाही. सगळं कसं साधं-साधं राहायचं. त्यांच्यासमोर सुवासिनींचा मान मिरवणाऱ्या बायका मात्र किती सजू किती नको अशा पद्धतीने वावरतात. या नियमांबाहेर काही केलंच, तर महिलाच चारचौघांत नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत. आता शहरातल्या विधवा महिला किंवा नोकरदार महिलांना आपल्याकडे पाहण्याचा समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलून या स्वसंरक्षणाच्या उद्देशाने मंगळसूत्र, टिकली वापरतात; पण त्यांनाही नाक मुरडले जाते. आजही आपण अत्यंत मागासलेल्या समाज जीवनात वावरत आहोत. हे मान्यच आहे की, विवाहानंतर स्त्रीचे जीवन पतीभोवती फिरत असते. साता जन्माची साथ देण्याची वचने घेतलेली असतात. अनेक सुख-दु:खाचे क्षण एकत्र जगलेले असतात. अशा व्यक्तीचे अचानक जाणे म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यातून सावरताना, आठवणीतून बाहेर येताना स्त्री खूप खंबीर राहते. विधवा झाली म्हणून तिने सार्वजनिक जीवनाचा त्यागच करावा हा नियम कुठला? तिच्यावर सक्ती करण्याचा अधिकार समाजाला कुणी दिला? विधवा महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत सर्वसामान्य महिलांचा बदलणार नाही तोपर्यंत समाजपरिवर्तन होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे विधवा महिलांनी स्वत:चा आत्मसन्मान राखला पाहिजे आणि त्यांना कुटुंबीयांची साथ मिळाली पाहिजे.- इंदुमती गणेश