शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

आर्द्रता नियंत्रणाची जबाबदारी फक्त श्रीपूजकांचीच का?

By admin | Updated: June 25, 2016 00:42 IST

अंबाबाई मंदिर : हक्कदार श्रीपूजक मंडळाचा सवाल

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर गाभाऱ्यातील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने सुचविलेल्या उपायांमध्ये श्रीपूजकांची जबाबदारी कमी आणि देवस्थानची अधिक आहे, असे असताना समितीने कोणकोणत्या उपाययोजनांवर कार्यवाही केली आणि आर्द्रता नियंत्रणाची जबाबदारी केवळ श्रीपूजकांचीच आहे का, असा सवाल श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने केला आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीपूजकांनी मोगली व आदिलशाही आक्रमणाच्या काळात मूर्तीचे संरक्षण केले आहे. त्यामुळे श्रीपूजक मूर्ती संवर्धनाबाबत अधिक जागरूक आहेत. पितळी उंबऱ्याच्या आत आर्द्रता वाढण्याचे मोठे कारण म्हणजे वायूविजनाचा अभाव हे सिद्ध झाले आहे. समितीने त्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मूर्तीवरील अभिषेक सन १९९७ सालापासून बंद आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर वस्त्र ओले करून मूर्ती पुसण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. मूर्तीवर हार-फुलांचा वापरही खूप कमी केला आहे. भाविकांनी अर्पण केलेले हार-फुले त्यांच्यासमक्ष बाहेर टाकणे शक्य नाही कारण त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. आर्द्रता नियंत्रणाचे काम सौहार्दाने करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान समितीने उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिल्यास आर्द्रता नियंत्रण लवकर साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)