शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

आर्द्रता नियंत्रणाची जबाबदारी फक्त श्रीपूजकांचीच का?

By admin | Updated: June 25, 2016 00:42 IST

अंबाबाई मंदिर : हक्कदार श्रीपूजक मंडळाचा सवाल

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर गाभाऱ्यातील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने सुचविलेल्या उपायांमध्ये श्रीपूजकांची जबाबदारी कमी आणि देवस्थानची अधिक आहे, असे असताना समितीने कोणकोणत्या उपाययोजनांवर कार्यवाही केली आणि आर्द्रता नियंत्रणाची जबाबदारी केवळ श्रीपूजकांचीच आहे का, असा सवाल श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने केला आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीपूजकांनी मोगली व आदिलशाही आक्रमणाच्या काळात मूर्तीचे संरक्षण केले आहे. त्यामुळे श्रीपूजक मूर्ती संवर्धनाबाबत अधिक जागरूक आहेत. पितळी उंबऱ्याच्या आत आर्द्रता वाढण्याचे मोठे कारण म्हणजे वायूविजनाचा अभाव हे सिद्ध झाले आहे. समितीने त्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मूर्तीवरील अभिषेक सन १९९७ सालापासून बंद आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर वस्त्र ओले करून मूर्ती पुसण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. मूर्तीवर हार-फुलांचा वापरही खूप कमी केला आहे. भाविकांनी अर्पण केलेले हार-फुले त्यांच्यासमक्ष बाहेर टाकणे शक्य नाही कारण त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. आर्द्रता नियंत्रणाचे काम सौहार्दाने करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान समितीने उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिल्यास आर्द्रता नियंत्रण लवकर साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)