शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एलबीटीची वसुली कमी का? शासनाकडून विचारणा : कारणे दाखवा

By admin | Updated: May 14, 2014 00:09 IST

सांगली : महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी वसुली का कमी झाली आहे?, अशी विचारणा

सांगली : महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी वसुली का कमी झाली आहे?, अशी विचारणा नगरविकास खात्याकडून आज, मंगळवारी करण्यात आली. नगरविकासच्या कक्ष अधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने कमी वसुलीच्या कारणांची माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी झाला. जकात असताना पालिकेचे उत्पन्न १०५ कोटीच्या घरात होते. एलबीटी लागू झाल्यानंतर दरमहा उत्पन्नात मोठी घसरण झाली. पहिल्या चार महिन्यात कर्मचार्‍यांच्या पगाराइतकेही उत्पन्न मिळाले नाही. त्यासाठी महापालिकेच्या ठेवीही मोडाव्या लागल्या होत्या. महापालिका निवडणुकीनंतर मात्र प्रशासनाने एलबीटी वसुलीबाबत कडक भूमिका घेतली. व्यापार्‍यांना नोटिसा बजावून नोंदणीस प्रवृत्त केले. पालिका हद्दीत एलबीटीअंतर्गत सुमारे साडेतेरा हजार व्यापारी येतात. त्यापैकी ८ हजार ७०० व्यापार्‍यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात १८०० ते २००० व्यापारी दरमहा कर भरत आहेत. उर्वरित व्यापार्‍यांना नोटिसा बजाविण्याची कार्यवाही सुरू आहे. अशातच नोंदणी न केलेल्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार नोटिसा बजावूनही सुनावणीला गैरहजर राहणार्‍या आणि नोंदणी न करणार्‍या १७० व्यापार्‍यांना गत आठवड्यातच मालमत्ता जप्तीची नोटीस बजाविण्यात आली आहे. एलबीटीला महापालिका हद्दीतील व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी एलबीटीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्याने व्यापार्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यातच आज नगरविकास खात्याने महापालिकेच्या एलबीटीचे उत्पन्न का घटले, याच्या कारणांची माहिती मागविली आहे. तसे पत्रही आयुक्त अजिज कारचे यांना पाठविण्यात आले आहे. व्यापार्‍यांचा विरोध हेच प्रमुख कारण वसुली कमी होण्यामागे असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)