शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग का नाही? ध्वजवंदनास नगण्य उपस्थिती :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:11 IST

गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी

ठळक मुद्देराष्टचा एक घटक या अभिमानाने राष्टध्वजाला सलाम करणे नैतिक जबाबदारी

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी महिला आघाडी ध्वजवंदनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र पिछाडीवर आहेत. मीदेखील या राष्ट्राचा एक घटक आहे, या अभिमानातून महिलांनी एक दिवस तरी राष्ट्रध्वजाला सलाम करणे ही नैतिक, सामाजिक जबाबदारी आहे.

आपण भारतीय उत्सवप्रिय लोक. येथील संस्कृती आणि लोकजीवनाला सण, उत्सव आणि समारंभाच्या रंगांनी अधिक खुलवले आहे. या सणांच्या तयारीत आघाडी असते ती महिलांची. उत्सव एक दिवसाचा असो नाहीतर दहा-बारा दिवसांचा. महिलांचे भावविश्व त्याभोवती गुंफले आहे; पण १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरे करताना मात्र महिला दिसतच नाहीत.

शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पतसंस्था, बँका, ग्रामपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद अशा आस्थापनांमध्ये ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित राहणे बंधनकारक आहे; त्यामुळे याठिकाणी महिला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य महिलांची उपस्थिती असते. याशिवाय राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांना या दिवसाचे महत्त्व माहीत असते; त्यामुळे त्यांचीही ध्वजवंदनाला उपस्थिती असते.अशा विविध क्षेत्रांतील मोजक्या आणि सुशिक्षित महिला वगळता युवती, गृहिणी अगदी भागाभागांतील, गल्ली किंवा चौकांतील ध्वजवंदन सोहळ्यालादेखील उपस्थित नसतात, हे खेदजनक वास्तव आहे.लढवय्या इतिहासाचा विसर..पुरुषप्रधान मानसिकतेच्या काळातही अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. देशाला किती मोठ्या संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात स्त्रीशक्तीचे योगदान किती मोलाचे होते याबद्दल महिलांनाच माहिती नाही. राष्ट्रीय सण महिलांनीदेखील साजरे करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव महिलांमध्ये नाही. त्यासाठी आता त्यांचे प्रबोधन आणि जाणीवजागृती निर्माण करण्याची गरज आहे.मानसिकतेचा पगडापुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेमुळे पूर्वीच्या काळी महिला घराबाहेर पडत नसत. त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना त्यांनी जायचेच नाही हा एक अलिखित नियम त्यांच्या माथी होता. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण सार्वजनिकरीत्या साजरे केले जात असल्याने अजूनही महिलांची त्यात आपला सहभाग हवा अशी मानसिकता नाही. 

सुशिक्षित नोकरदार महिलांमध्ये स्वातंत्र्यदिनाबद्दलची जाणीवजागृती आहे; पण समाजातला मोठा घटक असलेल्या युवती आणि गृहिणींमध्ये अजूनही राष्ट्रीय सणांबद्दल प्रबोधन करण्याची गरज आहे. सार्वजनिकरीत्या साजरा होणाऱ्या या राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.- प्रा. डॉ. भारती पाटील राज्यशास्त्राच्या अभ्यासकमहिलांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाचा सर्वांनाच विसर पडला आहे. किती कष्टाने हे स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव नाही. त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. देवाला रोज हात जोडता, त्याप्रमाणे ध्वजाचेही दर्शन घ्यायला हवे.- सरलाताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यादेशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा केवळ पुरुषच स्वतंत्र झाले का असा प्रश्न पडतो. त्यांना अजुनही आर्थिक, वैचारिक आणि संचाराचे स्वातंत्र्य नाही. देवधर्म, उपवास, व्रतवैकल्ये, सण-वार यात दिवसेंदिवस स्वत:ला गुंतवून घेतलेल्या महिलांनी एक दिवस तरी तिरंग्याला सलाम करावा, अशी अपेक्षा आहे.- सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिवस