शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जो कायदा मला, तो पतंगरावांना का नाही ?

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

राजू शेट्टी यांचा सवाल : संदीप राजोबांची प्रकृती गंभीरच

सांगली : ऊसदर आंदोलनात मला अटक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी तत्परता दाखविली होती, तशी आता का नाही दाखवली? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संदीप राजोबा यांना बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही? पालकमंत्री पतंगराव कदम यांना एक न्याय आणि मी खासदार असताना दुसरा न्याय का?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांची कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या चार बरगड्या मोडल्या असून, अद्याप धोका टळलेला नाही. ते मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांना मारणारे मात्र उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलिसांसमोर मारामारीचा प्रकार घडला असताना, त्यांनी पतंगराव कदम समर्थक कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांवर ३०७ कलमाखाली खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही? कोल्हापुरातील ऊस आंदोलकांच्या दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर ३०७ कलमाखाली खुनाचा गुन्हा दाखल केला होता. माझ्यासाठी एक कायदा आणि पतंगरावांसाठी दुसरा न्याय कसा? कायदा एकच असेल, तर गृहमंत्र्यांनी तत्काळ पतंगरावांचे समर्थक वाळू तस्कर, विनयभंग करणारे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आणि नातेवाइकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन करून कायदा हातात घेणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. गृहमंत्र्यांच्या राज्यात ‘कायद्या’चे, की ‘काय द्यायचे’ राज्य आहे, हे त्यांनीच स्पष्ट करावे.ते म्हणाले की, पोलिसांना मारहाण दिसली नसेल, तर त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवर चित्रित केलेली चित्रफीत देऊ; पण पोलिसांनी चेहरा बघून न्याय देऊ नये. पोलीस राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करीत असल्यामुळे ते निष्पक्षपणे मारहाणीची चौकशी करीत नाहीत.विश्वजित यांनीही स्टंट करावा...संदीप राजोबा यांनी पलूसच्या आमसभेत स्टंटबाजी केल्याचे पतंगराव कदम समर्थक सांगत आहेत. स्टंट करून राजोबा मोठा होत असेल, तर विश्वजित कदम यांनीही स्टंटबाजी करून पाहावी. माझे कार्यकर्ते त्यांना तुडवण्यासाठी पाठवतो, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. (प्रतिनिधी)