शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न ...

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुटुंबातील निधन झालेल्या पितरांच्या कर्मांसाठी राखीव असलेल्या पितृपक्षात विवाह, कौटुंबिक समारंभ, वास्तू खरेदी-विक्री, वास्तुशांत, मुलगी बघणे-ठरवणे, साखरपुडा एवढेच काय चांगले कार्य कधी करावे याची चर्चादेखील केली जात नाही. एकीकडे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्या नावे श्राद्धकर्म करायचे आणि दुसरीकडे हा कालावधी शुभकार्यासाठी निषिद्ध अशी चुकीची मानसिकता समाजात आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी झाली की एक दिवसाने महालय म्हणजेच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसापासून ते सर्वपित्री अमावास्यापर्यंतच्या पंधरा दिवसांत कुटुंबातील वारलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या त्या तिथीला श्राद्ध घातले जाते, त्यांच्या नावे पूजा करून कावळ्याला नैवेद्य दिला जातो. पितरांचा कायम आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद असावा म्हणून हा विधी करण्याची पद्धत आहे. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की या काळात एकही शुभकार्य केले जात नाही. हा काळ देवदेवतांच्या उपासनेसाठी, धार्मिक विधींसाठी निषिद्ध मानला गेला आहे. मुलगा-मुलीचे लग्न ठरवायचे आहे, तर साधा बायोडाटादेखील या काळात कुणाला पाठवला जात नाही. बारसं, वास्तुशांत, लग्नसमारंभ, घराची खरेदी, कौटुंबिक सोहळे या बाबी तर खूपच लांबची गोष्ट. घरात एखादी नवीन वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असले तरी हे टाळले जाते.

---

बाजारपेठाही थंड

ग्राहकांची ही मानसिकता असल्याने या दिवसात बाजारपेठेतील उलाढालदेखील कमी होते. पुढे नवरात्रोत्सवापासून सगळे व्यवहार पूर्वपदावर येतात. ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजनाही या काळात दिल्या जात नाहीत.

---

हे कशातून सुरु झाले..

वर्षभर देवतांचे विधी-उपासना केल्या जातात. पण पितृपक्ष हा पितरांसाठी राखीव आहे. कोणतेही शुभकार्य म्हटले की धार्मिक विधी, देवदेवतांची उपासना आलीच. या कार्यांमुळे पितरांचा विसर पडू नये, त्यांच्या पूजेला गौणत्व येऊ नये म्हणून या काळात शुभकार्य टाळले जाते. लोकांच्या मनात त्यातून कधीकाळी गैरसमज तयार झाला आहे आणि पिढ्यानपिढ्या तो आपली पाठ सोडायला तयार नाही.

पितृपक्ष म्हणजे अमंगल, वाईट काळ ही भावना आधी मनातून काढून टाकली पाहिजे. पितरांच्या नावे श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध हा याचा खरा अर्थ आहे. वारलेल्या व्यक्तींचे आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वादच असतात. त्यामुळे या काळात काही चांगले केले की वाईट घडते ही चुकीची मानसिकता लोकांच्या मनात आहे.

ॲड. प्रसन्न मालेकर

धार्मिक प्रथापरंपरांचे अभ्यासक

---