शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न ...

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुटुंबातील निधन झालेल्या पितरांच्या कर्मांसाठी राखीव असलेल्या पितृपक्षात विवाह, कौटुंबिक समारंभ, वास्तू खरेदी-विक्री, वास्तुशांत, मुलगी बघणे-ठरवणे, साखरपुडा एवढेच काय चांगले कार्य कधी करावे याची चर्चादेखील केली जात नाही. एकीकडे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्या नावे श्राद्धकर्म करायचे आणि दुसरीकडे हा कालावधी शुभकार्यासाठी निषिद्ध अशी चुकीची मानसिकता समाजात आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी झाली की एक दिवसाने महालय म्हणजेच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसापासून ते सर्वपित्री अमावास्यापर्यंतच्या पंधरा दिवसांत कुटुंबातील वारलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या त्या तिथीला श्राद्ध घातले जाते, त्यांच्या नावे पूजा करून कावळ्याला नैवेद्य दिला जातो. पितरांचा कायम आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद असावा म्हणून हा विधी करण्याची पद्धत आहे. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की या काळात एकही शुभकार्य केले जात नाही. हा काळ देवदेवतांच्या उपासनेसाठी, धार्मिक विधींसाठी निषिद्ध मानला गेला आहे. मुलगा-मुलीचे लग्न ठरवायचे आहे, तर साधा बायोडाटादेखील या काळात कुणाला पाठवला जात नाही. बारसं, वास्तुशांत, लग्नसमारंभ, घराची खरेदी, कौटुंबिक सोहळे या बाबी तर खूपच लांबची गोष्ट. घरात एखादी नवीन वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असले तरी हे टाळले जाते.

---

बाजारपेठाही थंड

ग्राहकांची ही मानसिकता असल्याने या दिवसात बाजारपेठेतील उलाढालदेखील कमी होते. पुढे नवरात्रोत्सवापासून सगळे व्यवहार पूर्वपदावर येतात. ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजनाही या काळात दिल्या जात नाहीत.

---

हे कशातून सुरु झाले..

वर्षभर देवतांचे विधी-उपासना केल्या जातात. पण पितृपक्ष हा पितरांसाठी राखीव आहे. कोणतेही शुभकार्य म्हटले की धार्मिक विधी, देवदेवतांची उपासना आलीच. या कार्यांमुळे पितरांचा विसर पडू नये, त्यांच्या पूजेला गौणत्व येऊ नये म्हणून या काळात शुभकार्य टाळले जाते. लोकांच्या मनात त्यातून कधीकाळी गैरसमज तयार झाला आहे आणि पिढ्यानपिढ्या तो आपली पाठ सोडायला तयार नाही.

पितृपक्ष म्हणजे अमंगल, वाईट काळ ही भावना आधी मनातून काढून टाकली पाहिजे. पितरांच्या नावे श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध हा याचा खरा अर्थ आहे. वारलेल्या व्यक्तींचे आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वादच असतात. त्यामुळे या काळात काही चांगले केले की वाईट घडते ही चुकीची मानसिकता लोकांच्या मनात आहे.

ॲड. प्रसन्न मालेकर

धार्मिक प्रथापरंपरांचे अभ्यासक

---