शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न ...

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुटुंबातील निधन झालेल्या पितरांच्या कर्मांसाठी राखीव असलेल्या पितृपक्षात विवाह, कौटुंबिक समारंभ, वास्तू खरेदी-विक्री, वास्तुशांत, मुलगी बघणे-ठरवणे, साखरपुडा एवढेच काय चांगले कार्य कधी करावे याची चर्चादेखील केली जात नाही. एकीकडे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्या नावे श्राद्धकर्म करायचे आणि दुसरीकडे हा कालावधी शुभकार्यासाठी निषिद्ध अशी चुकीची मानसिकता समाजात आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी झाली की एक दिवसाने महालय म्हणजेच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसापासून ते सर्वपित्री अमावास्यापर्यंतच्या पंधरा दिवसांत कुटुंबातील वारलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या त्या तिथीला श्राद्ध घातले जाते, त्यांच्या नावे पूजा करून कावळ्याला नैवेद्य दिला जातो. पितरांचा कायम आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद असावा म्हणून हा विधी करण्याची पद्धत आहे. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की या काळात एकही शुभकार्य केले जात नाही. हा काळ देवदेवतांच्या उपासनेसाठी, धार्मिक विधींसाठी निषिद्ध मानला गेला आहे. मुलगा-मुलीचे लग्न ठरवायचे आहे, तर साधा बायोडाटादेखील या काळात कुणाला पाठवला जात नाही. बारसं, वास्तुशांत, लग्नसमारंभ, घराची खरेदी, कौटुंबिक सोहळे या बाबी तर खूपच लांबची गोष्ट. घरात एखादी नवीन वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असले तरी हे टाळले जाते.

---

बाजारपेठाही थंड

ग्राहकांची ही मानसिकता असल्याने या दिवसात बाजारपेठेतील उलाढालदेखील कमी होते. पुढे नवरात्रोत्सवापासून सगळे व्यवहार पूर्वपदावर येतात. ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजनाही या काळात दिल्या जात नाहीत.

---

हे कशातून सुरु झाले..

वर्षभर देवतांचे विधी-उपासना केल्या जातात. पण पितृपक्ष हा पितरांसाठी राखीव आहे. कोणतेही शुभकार्य म्हटले की धार्मिक विधी, देवदेवतांची उपासना आलीच. या कार्यांमुळे पितरांचा विसर पडू नये, त्यांच्या पूजेला गौणत्व येऊ नये म्हणून या काळात शुभकार्य टाळले जाते. लोकांच्या मनात त्यातून कधीकाळी गैरसमज तयार झाला आहे आणि पिढ्यानपिढ्या तो आपली पाठ सोडायला तयार नाही.

पितृपक्ष म्हणजे अमंगल, वाईट काळ ही भावना आधी मनातून काढून टाकली पाहिजे. पितरांच्या नावे श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध हा याचा खरा अर्थ आहे. वारलेल्या व्यक्तींचे आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वादच असतात. त्यामुळे या काळात काही चांगले केले की वाईट घडते ही चुकीची मानसिकता लोकांच्या मनात आहे.

ॲड. प्रसन्न मालेकर

धार्मिक प्रथापरंपरांचे अभ्यासक

---