शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न ...

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुटुंबातील निधन झालेल्या पितरांच्या कर्मांसाठी राखीव असलेल्या पितृपक्षात विवाह, कौटुंबिक समारंभ, वास्तू खरेदी-विक्री, वास्तुशांत, मुलगी बघणे-ठरवणे, साखरपुडा एवढेच काय चांगले कार्य कधी करावे याची चर्चादेखील केली जात नाही. एकीकडे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्या नावे श्राद्धकर्म करायचे आणि दुसरीकडे हा कालावधी शुभकार्यासाठी निषिद्ध अशी चुकीची मानसिकता समाजात आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी झाली की एक दिवसाने महालय म्हणजेच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसापासून ते सर्वपित्री अमावास्यापर्यंतच्या पंधरा दिवसांत कुटुंबातील वारलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या त्या तिथीला श्राद्ध घातले जाते, त्यांच्या नावे पूजा करून कावळ्याला नैवेद्य दिला जातो. पितरांचा कायम आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद असावा म्हणून हा विधी करण्याची पद्धत आहे. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की या काळात एकही शुभकार्य केले जात नाही. हा काळ देवदेवतांच्या उपासनेसाठी, धार्मिक विधींसाठी निषिद्ध मानला गेला आहे. मुलगा-मुलीचे लग्न ठरवायचे आहे, तर साधा बायोडाटादेखील या काळात कुणाला पाठवला जात नाही. बारसं, वास्तुशांत, लग्नसमारंभ, घराची खरेदी, कौटुंबिक सोहळे या बाबी तर खूपच लांबची गोष्ट. घरात एखादी नवीन वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असले तरी हे टाळले जाते.

---

बाजारपेठाही थंड

ग्राहकांची ही मानसिकता असल्याने या दिवसात बाजारपेठेतील उलाढालदेखील कमी होते. पुढे नवरात्रोत्सवापासून सगळे व्यवहार पूर्वपदावर येतात. ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजनाही या काळात दिल्या जात नाहीत.

---

हे कशातून सुरु झाले..

वर्षभर देवतांचे विधी-उपासना केल्या जातात. पण पितृपक्ष हा पितरांसाठी राखीव आहे. कोणतेही शुभकार्य म्हटले की धार्मिक विधी, देवदेवतांची उपासना आलीच. या कार्यांमुळे पितरांचा विसर पडू नये, त्यांच्या पूजेला गौणत्व येऊ नये म्हणून या काळात शुभकार्य टाळले जाते. लोकांच्या मनात त्यातून कधीकाळी गैरसमज तयार झाला आहे आणि पिढ्यानपिढ्या तो आपली पाठ सोडायला तयार नाही.

पितृपक्ष म्हणजे अमंगल, वाईट काळ ही भावना आधी मनातून काढून टाकली पाहिजे. पितरांच्या नावे श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध हा याचा खरा अर्थ आहे. वारलेल्या व्यक्तींचे आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वादच असतात. त्यामुळे या काळात काही चांगले केले की वाईट घडते ही चुकीची मानसिकता लोकांच्या मनात आहे.

ॲड. प्रसन्न मालेकर

धार्मिक प्रथापरंपरांचे अभ्यासक

---