शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सोलापूरचे झाले, मग कोल्हापूरला का नाही?

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

विमानसेवेचा प्रश्न रखडला : पाठपुरावा थांबला; शहरवासीयांतून नाराजी

कोल्हापूर : मुंबई-सोलापूर-मुंबई अशी जूनपासून विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. सोलापूरमधून १९ आसनक्षमतेच्या विमानाद्वारे सेवा पुरविण्यास खासगी कंपनी तयार होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची निव्वळ चर्चा सुरूच आहे. कंपनी येते, सर्व्हे करते आणि ठरावीक प्रवासी रोज मिळाले पाहिजेत, अशी अट घालते. त्यासह आश्वासनाशिवाय दुसरे काही झालेले नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा याबाबत कमी पडत असल्याने विमानसेवा प्रारंभाचा प्रश्न रखडल्याची नाराजी कोल्हापूरकरांतून व्यक्त होत आहे.कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने विमानसेवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विमानसेवा पुरविण्यासाठी जेट एअरवेजने गेल्या चार महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्यानुसार ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी रोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी; तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या. पण, साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला. त्यानंतर एक महिन्यांपूर्वी ‘एअर इंडिया’ने विमानसेवा सुरू करण्याबाबत सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना रोज ५० ते ५५ प्रवाशांची हमी हवी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणारा आहे. (प्रतिनिधी)