शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सोलापूरचे झाले, मग कोल्हापूरला का नाही?

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

विमानसेवेचा प्रश्न रखडला : पाठपुरावा थांबला; शहरवासीयांतून नाराजी

कोल्हापूर : मुंबई-सोलापूर-मुंबई अशी जूनपासून विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. सोलापूरमधून १९ आसनक्षमतेच्या विमानाद्वारे सेवा पुरविण्यास खासगी कंपनी तयार होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची निव्वळ चर्चा सुरूच आहे. कंपनी येते, सर्व्हे करते आणि ठरावीक प्रवासी रोज मिळाले पाहिजेत, अशी अट घालते. त्यासह आश्वासनाशिवाय दुसरे काही झालेले नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा याबाबत कमी पडत असल्याने विमानसेवा प्रारंभाचा प्रश्न रखडल्याची नाराजी कोल्हापूरकरांतून व्यक्त होत आहे.कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने विमानसेवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विमानसेवा पुरविण्यासाठी जेट एअरवेजने गेल्या चार महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्यानुसार ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी रोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी; तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या. पण, साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला. त्यानंतर एक महिन्यांपूर्वी ‘एअर इंडिया’ने विमानसेवा सुरू करण्याबाबत सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना रोज ५० ते ५५ प्रवाशांची हमी हवी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणारा आहे. (प्रतिनिधी)