शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

‘व्हॉट्सअ‍ॅप’ची झाडू दोन वर्षांनंतरही फिरतेय

By admin | Updated: March 12, 2016 01:10 IST

कचऱ्याची विगतवारी : राजापुरातील महिलांची स्वच्छता मोहीम; ग्रुपचा विनाखंड सक्रिय सहभाग

विनोद पवार --राजापूर -सुमारे दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र येत स्वच्छतेचा वसा घेतलेल्या राजापुरातील महिलांनी स्वच्छतेची मोहीम अद्याप कायम ठेवली आहे. आधी केले अन् मग सांगितले, या उक्तीप्रमाणे ग्रुपधील सर्व सदस्यांनी स्वत: शहरातील सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा स्वच्छ केला आणि आता सुका कचरा ओला कचरा अशी विगतवारी करण्यापासून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम विनाखंड सुरू ठेवले आहे. दोन वर्षांपासून हाती घेतलेली व्हॉट्सअ‍ॅपची झाडू अखंडपणे राजापुरात फिरत असून, त्यांचे हे कार्य अनेकांसाठी आदर्शवत असेच आहे.देशात मोदी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले. सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, याबाबतीत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली. शासनाच्या या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणत लोकसहभागही दिसून आला. सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या. काही कालावधीनंतर प्रशासकीय पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत उदासिनता दिसू लागली. मात्र, याच कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राजापुरातील सर्व भगिनींनी आपली ही स्वच्छतेची मोहीम विनाखंड सुरु ठेवली आहे.प्रारंभी आठवड्यातून एकदा या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एसएमएस मिळताच एकत्र येत शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा महिलांनी साफ करण्याचे काम केले. त्यानंतर त्या ठिकाणी तसेच वैयक्तिक ठिकाणची स्वच्छता राहावी, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ठरवून एकत्र येण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्याबरोबरच जागृती करायची, असा नित्यक्रमच या महिलांनी ठरवून घेतला आहे. फक्त त्याचा प्रतिसादच त्या त्यावेळी ग्रुपवर टाकला जातो. एखाद्या ठिकाणी मोहीम राबवायची आवश्यकता असेल आणि तशी बाब कुणाच्या निदर्शनास आली तर त्याबाबतचा एक एसएमएस ग्रुपवर टाकला जातो. दिवस, वेळ सांगतिली जाते व त्यानुसार ज्यांना जाणे शक्य होते, ते सर्वजण संबंधित ठिकाणी पोहोचतात. मोहीम फत्ते होते व त्याचे पुन्हा अपडेट्स ग्रुपवर टाकले जातात. कोण आले नाही म्हणून त्याच्यासाठी काम थांबत नाही किंवा कोणी उगाच चीडचीड करत नाही. जे हजर असतात, ते सर्व सदस्य आपली जबाबदारी समजून काम पार पाडतात. या ग्रुपमध्ये कोणी अध्यक्ष नाही की कोणी नेताही नाही. प्रारंभी कोणतेही नाव धारण न करता केवळ स्वच्छ भारत अभियान नावाने चालणारा हा ग्रुप आता मोहोर ग्रुप, राजापूर या नावाने सुरु आहे. यामध्ये स्मिता अभ्यंकर, गौरी अभ्यंकर, रुपाली केळकर, श्रुती ताम्हणकर, अपूर्वा मराठे, नेत्रा गोखले व कृष्णा करंबेळकर हे सर्व सदस्य आहेत. यामध्ये कोणीही नेता नसून सर्वजण आपले स्वत:चे काम समजून परिसर स्वच्छ करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोहीम अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा निर्धारच सर्वांनी केला आहे.