शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सअ‍ॅप’ची झाडू दोन वर्षांनंतरही फिरतेय

By admin | Updated: March 12, 2016 01:10 IST

कचऱ्याची विगतवारी : राजापुरातील महिलांची स्वच्छता मोहीम; ग्रुपचा विनाखंड सक्रिय सहभाग

विनोद पवार --राजापूर -सुमारे दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र येत स्वच्छतेचा वसा घेतलेल्या राजापुरातील महिलांनी स्वच्छतेची मोहीम अद्याप कायम ठेवली आहे. आधी केले अन् मग सांगितले, या उक्तीप्रमाणे ग्रुपधील सर्व सदस्यांनी स्वत: शहरातील सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा स्वच्छ केला आणि आता सुका कचरा ओला कचरा अशी विगतवारी करण्यापासून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम विनाखंड सुरू ठेवले आहे. दोन वर्षांपासून हाती घेतलेली व्हॉट्सअ‍ॅपची झाडू अखंडपणे राजापुरात फिरत असून, त्यांचे हे कार्य अनेकांसाठी आदर्शवत असेच आहे.देशात मोदी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले. सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, याबाबतीत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली. शासनाच्या या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणत लोकसहभागही दिसून आला. सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या. काही कालावधीनंतर प्रशासकीय पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत उदासिनता दिसू लागली. मात्र, याच कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राजापुरातील सर्व भगिनींनी आपली ही स्वच्छतेची मोहीम विनाखंड सुरु ठेवली आहे.प्रारंभी आठवड्यातून एकदा या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एसएमएस मिळताच एकत्र येत शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा महिलांनी साफ करण्याचे काम केले. त्यानंतर त्या ठिकाणी तसेच वैयक्तिक ठिकाणची स्वच्छता राहावी, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ठरवून एकत्र येण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्याबरोबरच जागृती करायची, असा नित्यक्रमच या महिलांनी ठरवून घेतला आहे. फक्त त्याचा प्रतिसादच त्या त्यावेळी ग्रुपवर टाकला जातो. एखाद्या ठिकाणी मोहीम राबवायची आवश्यकता असेल आणि तशी बाब कुणाच्या निदर्शनास आली तर त्याबाबतचा एक एसएमएस ग्रुपवर टाकला जातो. दिवस, वेळ सांगतिली जाते व त्यानुसार ज्यांना जाणे शक्य होते, ते सर्वजण संबंधित ठिकाणी पोहोचतात. मोहीम फत्ते होते व त्याचे पुन्हा अपडेट्स ग्रुपवर टाकले जातात. कोण आले नाही म्हणून त्याच्यासाठी काम थांबत नाही किंवा कोणी उगाच चीडचीड करत नाही. जे हजर असतात, ते सर्व सदस्य आपली जबाबदारी समजून काम पार पाडतात. या ग्रुपमध्ये कोणी अध्यक्ष नाही की कोणी नेताही नाही. प्रारंभी कोणतेही नाव धारण न करता केवळ स्वच्छ भारत अभियान नावाने चालणारा हा ग्रुप आता मोहोर ग्रुप, राजापूर या नावाने सुरु आहे. यामध्ये स्मिता अभ्यंकर, गौरी अभ्यंकर, रुपाली केळकर, श्रुती ताम्हणकर, अपूर्वा मराठे, नेत्रा गोखले व कृष्णा करंबेळकर हे सर्व सदस्य आहेत. यामध्ये कोणीही नेता नसून सर्वजण आपले स्वत:चे काम समजून परिसर स्वच्छ करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोहीम अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा निर्धारच सर्वांनी केला आहे.