शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

बँकेसाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले

By admin | Updated: May 13, 2015 00:48 IST

राजू शेट्टींचा पलटवार : शेतकऱ्यांनी सांगितल्यास मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानांच्या दारात आंदोलन

कोल्हापूर : माझे हात दगडाखाली सापडलेले नसल्याने शेतकऱ्यांनी आदेश दिल्यास मुख्यमंत्र्यांच्याच काय पंतप्रधानांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करू. जिल्हा बँकेतील घोटाळ्याची चौकशी लपविण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी कोणाचे पाय धरले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीत, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. महामंडळाच्या तुकड्यासाठी राजू शेट्टींनी ‘वर्षा’वर लोटांगण घातल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली होती. याबाबत त्याच भाषेत खासदार शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकातून मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला. पत्रकात म्हटले की, शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठराविक साखर कंपन्यांचे लाड करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम पवार यांनी केल्याने मुश्रीफ यांनी पवार यांची वकिली करू नये. मी माझा स्वाभिमान कधीही गहाण टाकलेला नाही आणि टाकणारही नाही. आंदोलन कधी व कुठे करायचे हे आम्ही ठरवतो. जिल्हा बँकेतील ५ कोटी ३४ लाखांची जबाबदारीची रक्कम मुश्रीफ यांनी अगोदर भरावी, मगच बोलावे. राष्ट्रवादीचे महापौर लाचप्रकरणात अडकले आहेत, त्याच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरे झिजवणाऱ्यांनी बोलू नये. महापौर बदलून मोक्याच्या जागेचा ठराव करून जागा हडप करण्याचा डाव कोणाचा आहे. राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये, म्हणून भाजपशी हातमिळवणीचे काम ही मंडळी करीत आहेत. माझ्या मिशीला कधीही खरकटे लागलेले नाही म्हणून आवाज खणखणीत आहे. हिंमत असेल तर सरकारविरोधात खणखणीत बोलून दाखवा. भाजपची सत्ता आल्यानंतर न मागता पाठिंबा का दिला, शरद पवार व पंतप्रधान मोदी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विरोधात बोलतो म्हणून महायुतीतून काढून टाकले तरी बेहत्तर, आम्ही सत्तेसाठी, मंत्रिपदासाठी जन्मलो नाही. आमच्या मनगटात ताकद आहे, म्हणूनच विरोधात बोलतो, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी म्हणाले,माझे हात दगडाखाली सापडलेले नाहीत‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीतहसन मुश्रीफ यांना तुरुंगात जावेच लागणार आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर जिल्हा बँक बुडविल्याबद्दल. बँकेत सत्ता असताना अडचणीतील संस्थांचा लिलाव कसा काढला, त्या कुणी विकत घेतल्या. कागल शाखेतील गायब झालेल्या रकमेबाबत मुश्रीफ यांची नार्को टेस्ट केली तर सत्य बाहेर येईल. बँकेतील घोटाळा व कारवाई टाळण्यासाठी कुणाचे पाय धरले, हे शेतकऱ्यांना माहिती असल्याचे शेट्टी यांनी पत्रकात म्हटले आहे.