शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बँकेसाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले

By admin | Updated: May 13, 2015 00:48 IST

राजू शेट्टींचा पलटवार : शेतकऱ्यांनी सांगितल्यास मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानांच्या दारात आंदोलन

कोल्हापूर : माझे हात दगडाखाली सापडलेले नसल्याने शेतकऱ्यांनी आदेश दिल्यास मुख्यमंत्र्यांच्याच काय पंतप्रधानांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करू. जिल्हा बँकेतील घोटाळ्याची चौकशी लपविण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी कोणाचे पाय धरले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीत, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. महामंडळाच्या तुकड्यासाठी राजू शेट्टींनी ‘वर्षा’वर लोटांगण घातल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली होती. याबाबत त्याच भाषेत खासदार शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकातून मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला. पत्रकात म्हटले की, शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठराविक साखर कंपन्यांचे लाड करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम पवार यांनी केल्याने मुश्रीफ यांनी पवार यांची वकिली करू नये. मी माझा स्वाभिमान कधीही गहाण टाकलेला नाही आणि टाकणारही नाही. आंदोलन कधी व कुठे करायचे हे आम्ही ठरवतो. जिल्हा बँकेतील ५ कोटी ३४ लाखांची जबाबदारीची रक्कम मुश्रीफ यांनी अगोदर भरावी, मगच बोलावे. राष्ट्रवादीचे महापौर लाचप्रकरणात अडकले आहेत, त्याच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरे झिजवणाऱ्यांनी बोलू नये. महापौर बदलून मोक्याच्या जागेचा ठराव करून जागा हडप करण्याचा डाव कोणाचा आहे. राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये, म्हणून भाजपशी हातमिळवणीचे काम ही मंडळी करीत आहेत. माझ्या मिशीला कधीही खरकटे लागलेले नाही म्हणून आवाज खणखणीत आहे. हिंमत असेल तर सरकारविरोधात खणखणीत बोलून दाखवा. भाजपची सत्ता आल्यानंतर न मागता पाठिंबा का दिला, शरद पवार व पंतप्रधान मोदी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विरोधात बोलतो म्हणून महायुतीतून काढून टाकले तरी बेहत्तर, आम्ही सत्तेसाठी, मंत्रिपदासाठी जन्मलो नाही. आमच्या मनगटात ताकद आहे, म्हणूनच विरोधात बोलतो, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी म्हणाले,माझे हात दगडाखाली सापडलेले नाहीत‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीतहसन मुश्रीफ यांना तुरुंगात जावेच लागणार आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर जिल्हा बँक बुडविल्याबद्दल. बँकेत सत्ता असताना अडचणीतील संस्थांचा लिलाव कसा काढला, त्या कुणी विकत घेतल्या. कागल शाखेतील गायब झालेल्या रकमेबाबत मुश्रीफ यांची नार्को टेस्ट केली तर सत्य बाहेर येईल. बँकेतील घोटाळा व कारवाई टाळण्यासाठी कुणाचे पाय धरले, हे शेतकऱ्यांना माहिती असल्याचे शेट्टी यांनी पत्रकात म्हटले आहे.