शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

बँकेसाठी मुश्रीफांनी कोणाचे पाय धरले

By admin | Updated: May 13, 2015 00:48 IST

राजू शेट्टींचा पलटवार : शेतकऱ्यांनी सांगितल्यास मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानांच्या दारात आंदोलन

कोल्हापूर : माझे हात दगडाखाली सापडलेले नसल्याने शेतकऱ्यांनी आदेश दिल्यास मुख्यमंत्र्यांच्याच काय पंतप्रधानांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करू. जिल्हा बँकेतील घोटाळ्याची चौकशी लपविण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी कोणाचे पाय धरले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीत, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. महामंडळाच्या तुकड्यासाठी राजू शेट्टींनी ‘वर्षा’वर लोटांगण घातल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली होती. याबाबत त्याच भाषेत खासदार शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकातून मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला. पत्रकात म्हटले की, शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठराविक साखर कंपन्यांचे लाड करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम पवार यांनी केल्याने मुश्रीफ यांनी पवार यांची वकिली करू नये. मी माझा स्वाभिमान कधीही गहाण टाकलेला नाही आणि टाकणारही नाही. आंदोलन कधी व कुठे करायचे हे आम्ही ठरवतो. जिल्हा बँकेतील ५ कोटी ३४ लाखांची जबाबदारीची रक्कम मुश्रीफ यांनी अगोदर भरावी, मगच बोलावे. राष्ट्रवादीचे महापौर लाचप्रकरणात अडकले आहेत, त्याच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरे झिजवणाऱ्यांनी बोलू नये. महापौर बदलून मोक्याच्या जागेचा ठराव करून जागा हडप करण्याचा डाव कोणाचा आहे. राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये, म्हणून भाजपशी हातमिळवणीचे काम ही मंडळी करीत आहेत. माझ्या मिशीला कधीही खरकटे लागलेले नाही म्हणून आवाज खणखणीत आहे. हिंमत असेल तर सरकारविरोधात खणखणीत बोलून दाखवा. भाजपची सत्ता आल्यानंतर न मागता पाठिंबा का दिला, शरद पवार व पंतप्रधान मोदी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विरोधात बोलतो म्हणून महायुतीतून काढून टाकले तरी बेहत्तर, आम्ही सत्तेसाठी, मंत्रिपदासाठी जन्मलो नाही. आमच्या मनगटात ताकद आहे, म्हणूनच विरोधात बोलतो, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी म्हणाले,माझे हात दगडाखाली सापडलेले नाहीत‘गोकुळ’च्या निवडणुकीत कुणाचा गेम केलात, तुमची पापे लपणार नाहीतहसन मुश्रीफ यांना तुरुंगात जावेच लागणार आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर जिल्हा बँक बुडविल्याबद्दल. बँकेत सत्ता असताना अडचणीतील संस्थांचा लिलाव कसा काढला, त्या कुणी विकत घेतल्या. कागल शाखेतील गायब झालेल्या रकमेबाबत मुश्रीफ यांची नार्को टेस्ट केली तर सत्य बाहेर येईल. बँकेतील घोटाळा व कारवाई टाळण्यासाठी कुणाचे पाय धरले, हे शेतकऱ्यांना माहिती असल्याचे शेट्टी यांनी पत्रकात म्हटले आहे.