शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धवलक्रांतीला दिशा देणार कोण?

By admin | Updated: May 5, 2017 22:58 IST

रिक्त पदांचा अडथळा : अधिकारी, कर्मचारी नसल्याने अधिकार कुणाकडे अशी स्थिती

संजय पारकर ।   लोकमत न्यूज नेटवर्क   राधानगरी : राधानगरी तालुक्यातील प्रस्तावित इको-सेन्सिटिव्ह झोन, दाजीपूर अभयारण्याच्या विस्तारामुळे होणाऱ्या लोकांच्या अडचणींवर ‘लोकमत’ने टाकलेल्या प्रकाशझोतामुळे मोठी जनजागृती झाली. लोकांनी हाती घेतलेल्या आंदोलनाला यामुळे बळ मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. शासनस्तरावर व रस्त्यावरील आंदोलन, अशा दोन्ही पातळींवर हा प्रश्न उपस्थित केला जाईल, अशी भूमिका लोकप्रतिनिधी व लोकांनी मांडली.दरम्यान, वारंवार संपर्क साधूनही वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत प्रतिक्रिया मिळाली नाही. पश्चिम घाटाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली स्थानिक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणू नये, अशी मागणी आपण केंदीय वनमंत्री अनिल दवे यांना भेटून केली आहे. त्यांनी याबाबत फेर सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. वन जमिनीबाबत बंधने आणण्यात हरकत नाही. मात्र, सरसकट बंधने लाधली तर या भागातील लोकांच्या विकास प्रक्रियेला खीळ बसेल, त्यामुळे याला विरोध केला जाईल.- धनंजय महाडिक, खासदार इको झोन झाल्यास लोकांना जगणे अशक्य होणार आहे. अभयारण्य झाले त्यावेळी अज्ञानामुळे लोकांनी विरोध केला नाही; पण आता लोक आपल्या हक्कांबाबत जागरूक झाले आहेत. पक्ष, गट-तट बाजूला ठेवून लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याने भव्य मोर्चा निघाला.- तानाजी चौगले, शिवसेना, माजी तालुकाप्रमुख अभयारण्यामुळे जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इको झोन झाल्यास त्यात आणखी भर पडणार आहे. याला संघटितपणे विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा गेल्या महिन्यापासून प्रयत्न होता. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढील काळात एकजूट ठेवून विविध आंदोलने यशस्वी करू.- राजेंद्र भाटळे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेसपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे मान्य केले आहे. राज्य व केंद्र शासनाकडे पक्षीय पातळीवर आवश्यक ते प्रयत्न केले जातील.- दीपक शिरगावकर, तालुकाध्यक्ष, भाजप जनतेला रोजचे जीवन जगण्यात अडचण येणार असेल तर इको झोन व अभयारण्य काय कामाचे ? मुंबई-दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून असे फतवे काढणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन लोकांचे होणारे हाल पाहावेत. दक्षिण भारतात काही राज्यात हरणांची संख्या वाढल्याने त्यांच्या शिकारीला परवानगी दिलीं आहे. त्याच धर्तीवर गव्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, अशी मागणी मी या पूर्वीच केली आहे. या समस्येबाबत मी जनतेबरोबर आहे.- प्रकाश आबिटकर, आमदार शाहू महाराजांच्या कृपेने राखीव राहिलेले जंगल येथील लोकांनी वाढविले, जोपासले ही त्यांची चूक झाली काय? लोक कायदे पाळतात म्हणून त्यांना त्यांची भीती दाखवित असाल, तर येथून पुढे सामुदायिकपणे कायदे न जुमानता ते मोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, त्यासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी आहे. - के. पी. पाटील, माजी आमदार. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे मान्य केले आहे. राज्य व केंद्र शासनाकडे पक्षीय पातळीवर आवश्यक ते प्रयत्न केले जातील.- दीपक शिरगावकर, तालुकाध्यक्ष, भाजप