शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राजेंच्या नादी कोण लागणार

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

शरद पवार : सर्व स्थानिक राजकीय निर्णय साताऱ्यातूनच व्हावेत

सातारा : ‘पहिल्यापासूनच बारामतीपेक्षा साताऱ्याला महत्त्व आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे. याच ठिकाणाहून सर्व राजकीय निर्णय व्हावेत, अशी माझीही इच्छा आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच वाक्यात राजकीय स्थितीवर भाष्य केले. रामराजे व उदयनराजे यांच्यातील वादाबाबत विचारले असता, ‘दोन राजेंमध्ये काय असते, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे राजेंच्या नादी कोण लागणार?’ अशी मिश्किलीही त्यांनी यावेळी जोडली. ‘सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीवर पुन्हा विश्वास ठेवला आहे, या विश्वासास पात्र ठरण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही शरद पवार यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘पवार भाजपच्या जवळ जात आहेत,’ असा आरोप केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, ‘अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक काँगे्रसने भाजप व शिवसेनेला सोबत घेऊन लढविली. महाराष्ट्रात कटुता वाढू नये, यासाठी मी काही बोलत नाही. राज्य एकसंध राहावं ही माझी इच्छा आहे. राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याचे लोण आता सधन अशा पश्चिम महाराष्ट्रातही पसरले आहे. सरकारने योग्यवेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना या संकटसमयी दिलासा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रापासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत शरद पवार म्हणाले, ‘अनेकांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आहे. राज्य एकसंध राहिले पाहिजे. ज्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली, त्या नेत्यांना तेथील जनतेनंच स्वीकारलं नाही. वेगळ्या विदर्भाबाबत येथील जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. येथील जनताच वेगळ्या विदर्भाच्या निर्णयाबाबत अनुकूल नाही.’ जमीन अधिनियम कायद्याला आपला विरोध असल्याचे स्पष्टीकरण पवारांनी केले. शेतीच्या तुकड्यावरच शेतकरी तग धरून राहतो. आता परस्पर या जमिनी काढून घेतल्या गेल्या, तर तो देशोधडीला लागेल. त्यामुळे केंद्र शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला आमचा विरोध आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तरी ते राज्यसभेत मंजूर होणारच नाही. (प्रतिनिधी) अशोक चव्हाण म्हणजे लहान मूल ! पवार भाजपच्या जवळ गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. याबाबत पवार यांनी ‘लहान मुलं असं बोलतात. महाराष्ट्रातील कटुता वाढू नये, यासाठी मी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही,’ असं स्पष्टीकरण केले.