शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा परिसरातील चार हजार झाडे जगवायची कोणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:44 IST

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या कळंबा तलावाचे दहा कोटींचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामांतर्गत निविदाधारक कंपनीने गतवर्षी जुलैमध्ये तलाव परिसरात व तलावाच्या हद्दीलगत चार हजार झाडे लावून संवर्धित केली. सहा महिन्यांनंतर हे काम पालिका पाणीपुरवठा विभागास हस्तांतरित केले.पाणीपुरवठा विभागाने दोनवेळा तीन महिन्यांची मुदतवाढ घेतली. ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या कळंबा तलावाचे दहा कोटींचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामांतर्गत निविदाधारक कंपनीने गतवर्षी जुलैमध्ये तलाव परिसरात व तलावाच्या हद्दीलगत चार हजार झाडे लावून संवर्धित केली. सहा महिन्यांनंतर हे काम पालिका पाणीपुरवठा विभागास हस्तांतरित केले.पाणीपुरवठा विभागाने दोनवेळा तीन महिन्यांची मुदतवाढ घेतली. तज्ज्ञ कर्मचारी वर्गाअभावी उद्यान विभागाने झाडे संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे पाणीपुरवठा विभागाचे मत होते. पालिका हद्दीतील उद्यानांच्या संवर्धनासाठी कर्मचारी वर्ग तोकडा पडत असल्याने हे काम पाणीपुरवठा विभागाने करावे असे सांगत उद्यान विभागाने जबाबदारी झटकली. त्यामुळे लाखो रुपये खर्चून फुलविलेल्या या नंदनवनाचे संवर्धन करायचे कोणी? हे अनुत्तरीत आहे. प्रशासनाच्या ताकतुंब्यात ही हिरवळ करपण्याची शक्यता आहे.कळंबा तलाव परिसर हा कधीकाळी पशु-पक्षी, प्राणी, वनस्पतीबाबत समृद्ध होता. उत्तम हवामान, मुबलक पर्जन्य, चांगली मृदा यामुळे परिसरात वृक्षसंपदेचा नैसर्गिक ठेवा मुबलक होता. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक देशी-विदेशी पक्षी तलावावर आढळत होते. पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामे, प्रदूषण व बेसुमार वृक्षतोडीने हा परिसर उजाड बनला. तलावास गतवैभव प्राप्त व्हावे, तलावाभोवती नव्याने वनसंपदा विकसित करून तलाव प्रदूषणमुक्त राहावा, परिसरात नागरिकांना मन:शांतीसह विरंगुळा प्राप्त व्हावा यासाठी गतवर्षी १ जुलैला सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलाव परिसरात व तलाव हद्दीलगत चार हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. चार हजार वृक्षारोपणासह तलाव परिसरात नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी गवताचे लॉनही विकसित करण्यात आले. तलाव परिसरातील वृक्षांना लोखंडी ट्री गार्ड बसविण्यात आले. कळंबा-गारगोटी रस्त्यालगत तलावाच्या सीमेच्या हद्दीवर लावण्यात आलेल्या दोन हजार विविध प्रजातींच्या रोपांना दोन बोअरच्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत पाणी देण्यात आले. सहा महिने वृक्षांचे योग्यरीत्या संवर्धन केल्यावर ही वनसंपदा पालिका पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत व संवर्धनाच्या जबाबदारीबाबत पत्राने कळविण्यात आले. पालिका पाणीपुरवठाविभागाने दोनवेळा तीन महिन्यांची मुदतवाढ घेत जबाबदारीझटकली.दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने या वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी पुरेसा तज्ज्ञ कर्मचारी वर्ग नसल्याने उद्यान विभागाने याची जबाबदारी स्वीकारण्याबाबत कळविले. दुसरीकडे उद्यान विभागानेही पालिका हद्दीतील उद्याने संवर्धन करण्यासाठीच कर्मचारी कमी पडत असल्याचे सांगत हात वर केले.झाडे जगवली, वाढविली तरच पर्यावरणाचे संतुलन योग्य राहून पाऊस पडणार हे निश्चित. वृक्षतोडीने निर्माण झालेल्या पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी एकीकडे शासन सामाजिक संस्था ‘एकच लक्ष शतकोटी वृक्ष’ मोहीम राबवीत असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या ताकतुंब्यात वनसंपदा कोमेजत आहे, ज्यामुळे वनसंपदा विकसित करत तलावास नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या हेतूतील गांभीर्यच निघून जात आहे.कर्मचारीचनियुक्त नाहीकळंबा तलावाची मालकी पालिकेची आहे; पण तलावाच्या संवर्धनासाठी कर्मचारी नियुक्त नसल्याने २० एकरांत अतिक्रमण झाले आहे. सुशोभिकरणाची नासधूस सुरू असून, अशास्त्रीयरीत्या गाळ उपसा सुरू आहे. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले व पार्ट्यांसाठी होत आहे. त्यामुळे कर्मचारी नियुक्ती गरजेची आहे.