शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

हत्याकटाची टीप मिळालेला कोल्हापूरचा ‘तो’ पोलिस कोण?

By admin | Updated: June 3, 2016 01:43 IST

दाभोलकर हत्या : दोन महिने आधीच लागला होता सुगावा

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूरअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकटाचा सुगावा त्यांच्या हत्येपूर्वी एक-दोन महिने आधी कोल्हापुरातील एका पोलिसाला लागला होता. तशी टीप त्याला खबऱ्याकडून मिळाली होती, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी एका टिष्ट्वटद्वारे केला आहे. यामुळे कोल्हापुरातील ‘तो’ पोलिस कोण? त्याला मिळालेल्या माहितीचा सखोल पाठपुरावा झाला की नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात झाली. त्यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी सनातन संस्थेवर सुरुवातीपासून संशय व्यक्त केला जात आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात, तर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या तिघांच्याही हत्येमागे सनातन ही संस्था असल्याचा आरोप केला जात आहे. त्या दृष्टीने तपास संस्थांनी आपला तपासही सुरू ठेवला आहे. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. तपास संस्थांच्या हाती या तीनही हत्येमागे समान धागेदोरे असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्याकटाचा छडा लागून मारेकऱ्यांची ओळख तपास संस्थांना पटल्याचा दावा आशिष खेतान यांनी बुधवारी एका टिष्ट्वटद्वारे केला होता. सीबीआयनेही बुधवारी सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर यांच्या पुण्यातील घरावर तसेच पनवेल येथील सनातनच्या आश्रमावर छापा टाकला. यामुळे खेतान यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सीबीआयने याप्रकरणी अधिकृतपणे या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. दाभोलकर यांची हत्या होणार असल्याची टीप कोल्हापुरातील एका पोलिसाला त्यांच्या हत्येपूर्वी एक-दोन महिने आधीच मिळाली होती. त्याने आपल्या वरिष्ठांना याची कल्पनाही दिली. मात्र, वरिष्ठांसमोर त्याला याबाबतचा अधिक तपशील देता आला नाही, असे चौकशीत दिसून आले होते, असा दावाही खेतान यांनी यासंदर्भात केलेल्या पुढील टिष्ट्वटमध्ये केला आहे. त्यामुळे हत्येपूर्वीच एक-दोन महिने आधी टीप मिळालेला ‘तो’ पोलिस कोण? याची चर्चा आता पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे. ...तर दाभोलकरांची हत्या टळली असती !पोलिस सूतावरून स्वर्ग गाठतात आणि कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावतात, असे म्हटले जाते. त्यानुसार या पोलिसाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कसून पाठपुरावा केला गेला असता, तर कदाचित डॉ. दाभोलकर यांची हत्या टळली असती, अशी चर्चा आता पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.