शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी साखर कामगारांना वाली कोण ?

By admin | Updated: November 23, 2014 23:48 IST

कामगार संघटनांचे दुर्लक्ष : कारखानदारांचा डोळेझाकपणा, दोषींवर शासन कारवाई करणार का ?

घन:शाम कुंभार - यड्राव -साखर कारखान्यांचे हंगाम सुरू आहेत. साखर हंगाम सुरू म्हटल्यावर कारखान्यांना रोजंदारी कामगारांची गरज भासते. अनुभवी कामगारांना हंगामात कामावर घेतले जाते. बरेच वर्षे कारखान्यात काम करत असलेल्या कामगारांना कायम न करता रोजंदारीवर ठेवण्यात येते. यामध्ये कारखानदारांचा फायदा असल्याने ते डोळेझाक करतात, तर कामगार संघटनांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने रोजंदारी कामगार बरीच वर्षे कारखान्यात काम करूनही त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत नाही. यामुळे त्यांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर शासन दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल कामगारांमध्ये आहे.साखर कारखान्यामध्ये कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांव्यतिरिक्त रोजंदारीवरील कामगारांची आवश्यकता असते. त्यांना कारखान्याच्या मस्टरवर घेतले जाते. प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीस त्यांना रोजंदारीवर कामावर घेण्यात येते व हंगामाच्या अखेरपर्यंत ते कार्यरत असतात. बरीच वर्षे एकाच खात्यामध्ये काम करत असलेले हे रोजंदारी कामगार त्या-त्या कामात कुशल असतात.रोजंदारी कामगारांना कायम केल्यास त्याचा आर्थिक फटका कारखान्यांना बसतो. कायम कामगारांना ज्या सोयी-सुविधा व आर्थिक लाभ होतात त्यास ते पात्र ठरतात. यामुळे साखर कारखानदार याकडे डोळेझाक करतात. बरेच कारखानदार गरजेनुसार रोजंदारीची दरवाढ देऊन ठराविक कामगारांना लाभ देतात. हंगामापुरताच याचा उपयोग होत असल्याने कामगार संघटनाही याच्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत; परंतु काही बोटावर मोजता येतील, इतक्या साखर कारखान्यांनी रोजंदारी कामगारांना न्याय दिला आहे.हंगामापुरताच होणारा उपयोग रोजंदारी कामगारांना सध्याच्या महागाईच्या दिवसांत त्रासदायक ठरत आहे. कमी रोजंदारी परंतु कायम कामगारांसारखे काम व त्यांना मिळणारे वेतन आयोगाप्रमाणे पगार यामध्ये बरीच तफावत असल्याने बरीच वर्षे एकाच खात्यात काम करूनही रोजंदारी कामगारांना कायम केले जात नाही. कामगार संघटनाही याबाबत आग्रही राहात नाहीत. कारण बऱ्याच संघटना कारखानदारधार्जिणे असतात. या साखरेप्रमाणे गोड असलेल्या संबंधात रोजंदारी कामगार उसाच्या चिपाडाप्रमाणे चिरडला जात आहे. त्याच्या भविष्याच्या विचारासाठी कोणीही वाली नाही. अशी परिस्थिती उद्भवल्यामुळेच त्रिपक्षीय कराराची मुदत संपली. तरीही बहुतेक ठिकाणी याची अंमलबजावणी झाली नाही. यासाठी संघटनाही आग्रही नाहीत, याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषी कारखाना व संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांमधून होत आहे. त्रिपक्षीय करार२९ जून २०११ रोजी महाराष्ट्र शासन, मालक प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी या त्रिपक्षीय समितीने करार केला आहे. यामध्ये दि. ६ एप्रिल २०१२ पूर्वी तीन वर्षे नियमित खात्यामध्ये काम करणाऱ्या रोजंदारीवरील कारखान्याच्या मस्टरवर व प्लॅँटवर काम करणाऱ्या कामगारांना लाभ मिळेल. तसेच करार व्याप्ती कलम क्र. १ नुसार नव्याने समाविष्ट कामगारांना कराराने होणारे किमान वेतन देण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख आहे.रोजंदारी कामगारांना किमान वेतन१८ टक्के पगारवाढीच्या करारापूर्वी तीन वर्षे रोजंदारीवर असणाऱ्या कामगारांना किमान वेतन द्यावे, असा करार झाला आहे. त्याची अंमलबजावणी संघटना व कारखान्यास बंधनकारक आहे. यातील त्रुटीबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रातिनिधीक मंडळाचे उपाध्यक्ष राऊसो पाटील यांनी स्पष्ट केले.