शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

बोलोली वीज उपकेंद्र ठरतोय पांढरा हत्ती

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

वीज उपकेंद्राचे काम निकृष्ट : दिवसातून ३ ते ४ तास वीज गायब; कोगेतून पूर्ववत लाईन जोडणी करा

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ --सांगरुळ, खाटांगळे, म्हारूळ, आमशीसह बारा वाड्या सदस्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. या ठिकाणी कळे येथून आसगाव उपकेंद्रातून लाईन जोडली आहे, पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कमीत कमी गावांसाठी हे उपकेंद्र असूनसुद्धा दररोज बराच काळ वीज गायब असते. बोलोली वीज उपकेंद्र पांढरा हत्ती ठरत असून बोलोली वीज उपकेंद्राच्या कामाची चौकशी व्हावी व तातडीने कोगे येथून पूर्वीप्रमाणे लाईन जोडावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.महावितरण कंपनीने कोगे येथील सबस्टेशनला विजेचा भार वाढत असल्याने कळे, आसगाव येथून २० किलोमीटर अंतर डोंगरातून नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून गेली तीन वर्षे हे काम महावितरण कंपनीला दुरुस्त करता आलेले नाही. सुरुवातीच्या काळात आसगाव येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन (चीन मातीच्या प्लेट) फुटण्याचे सत्र सुरू होते. हे काम गेल्या वर्षभरात नव्याने पूर्ण केल्यानंतर आता तरी वीज मिळेल, अशी अशा नागरिकांना होती, पण सध्या येथे वेगवेगळ््या कारणांनी नेहमी वीज गायब असते. महावितरण कंपनी याची ट्रायल आणखी किती वर्ष घेणार अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे.सांगरुळ परिसरात खरिपाचे क्षेत्र जास्त असून भात, भुईमूग, सोयाबीन, मटकी, वरी, ज्वारी यांसारख्या पिकांच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतीला पाणी पाजण्याची लगबग सुरू आहे, पण विजेचा खेळखंडोबा नेहमी सुरू असल्याने उगवत सुरू असलेली बियाणे पाण्याअभावी वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतीसह घरगुती विजेचा ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर दळप- कांडप करतानाही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने महिलांही यामुळे त्रस्त झाल्या आहेत. कोगे येथून वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. जाळपोळीची झलक परत होईलचार वर्षांपूर्वी महावितरण कंपनीचा विजेचा खेळखंडोबा असाच सुरू होता. त्यावेळी त्रस्त नागरिकांनी अधिकाऱ्याला जाब विचारला असता, अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावत कार्यालयातील संपूर्ण साहित्य पेटवले होते. महावितरण कंपनीने याची आठवण ठेवून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेकाला सामोरे जावे लागले.