शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बोलोली वीज उपकेंद्र ठरतोय पांढरा हत्ती

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

वीज उपकेंद्राचे काम निकृष्ट : दिवसातून ३ ते ४ तास वीज गायब; कोगेतून पूर्ववत लाईन जोडणी करा

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ --सांगरुळ, खाटांगळे, म्हारूळ, आमशीसह बारा वाड्या सदस्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. या ठिकाणी कळे येथून आसगाव उपकेंद्रातून लाईन जोडली आहे, पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कमीत कमी गावांसाठी हे उपकेंद्र असूनसुद्धा दररोज बराच काळ वीज गायब असते. बोलोली वीज उपकेंद्र पांढरा हत्ती ठरत असून बोलोली वीज उपकेंद्राच्या कामाची चौकशी व्हावी व तातडीने कोगे येथून पूर्वीप्रमाणे लाईन जोडावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.महावितरण कंपनीने कोगे येथील सबस्टेशनला विजेचा भार वाढत असल्याने कळे, आसगाव येथून २० किलोमीटर अंतर डोंगरातून नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून गेली तीन वर्षे हे काम महावितरण कंपनीला दुरुस्त करता आलेले नाही. सुरुवातीच्या काळात आसगाव येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन (चीन मातीच्या प्लेट) फुटण्याचे सत्र सुरू होते. हे काम गेल्या वर्षभरात नव्याने पूर्ण केल्यानंतर आता तरी वीज मिळेल, अशी अशा नागरिकांना होती, पण सध्या येथे वेगवेगळ््या कारणांनी नेहमी वीज गायब असते. महावितरण कंपनी याची ट्रायल आणखी किती वर्ष घेणार अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे.सांगरुळ परिसरात खरिपाचे क्षेत्र जास्त असून भात, भुईमूग, सोयाबीन, मटकी, वरी, ज्वारी यांसारख्या पिकांच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतीला पाणी पाजण्याची लगबग सुरू आहे, पण विजेचा खेळखंडोबा नेहमी सुरू असल्याने उगवत सुरू असलेली बियाणे पाण्याअभावी वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतीसह घरगुती विजेचा ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर दळप- कांडप करतानाही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने महिलांही यामुळे त्रस्त झाल्या आहेत. कोगे येथून वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. जाळपोळीची झलक परत होईलचार वर्षांपूर्वी महावितरण कंपनीचा विजेचा खेळखंडोबा असाच सुरू होता. त्यावेळी त्रस्त नागरिकांनी अधिकाऱ्याला जाब विचारला असता, अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावत कार्यालयातील संपूर्ण साहित्य पेटवले होते. महावितरण कंपनीने याची आठवण ठेवून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेकाला सामोरे जावे लागले.