शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोलोली वीज उपकेंद्र ठरतोय पांढरा हत्ती

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

वीज उपकेंद्राचे काम निकृष्ट : दिवसातून ३ ते ४ तास वीज गायब; कोगेतून पूर्ववत लाईन जोडणी करा

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ --सांगरुळ, खाटांगळे, म्हारूळ, आमशीसह बारा वाड्या सदस्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. या ठिकाणी कळे येथून आसगाव उपकेंद्रातून लाईन जोडली आहे, पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कमीत कमी गावांसाठी हे उपकेंद्र असूनसुद्धा दररोज बराच काळ वीज गायब असते. बोलोली वीज उपकेंद्र पांढरा हत्ती ठरत असून बोलोली वीज उपकेंद्राच्या कामाची चौकशी व्हावी व तातडीने कोगे येथून पूर्वीप्रमाणे लाईन जोडावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.महावितरण कंपनीने कोगे येथील सबस्टेशनला विजेचा भार वाढत असल्याने कळे, आसगाव येथून २० किलोमीटर अंतर डोंगरातून नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले आहे. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून गेली तीन वर्षे हे काम महावितरण कंपनीला दुरुस्त करता आलेले नाही. सुरुवातीच्या काळात आसगाव येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन (चीन मातीच्या प्लेट) फुटण्याचे सत्र सुरू होते. हे काम गेल्या वर्षभरात नव्याने पूर्ण केल्यानंतर आता तरी वीज मिळेल, अशी अशा नागरिकांना होती, पण सध्या येथे वेगवेगळ््या कारणांनी नेहमी वीज गायब असते. महावितरण कंपनी याची ट्रायल आणखी किती वर्ष घेणार अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे.सांगरुळ परिसरात खरिपाचे क्षेत्र जास्त असून भात, भुईमूग, सोयाबीन, मटकी, वरी, ज्वारी यांसारख्या पिकांच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतीला पाणी पाजण्याची लगबग सुरू आहे, पण विजेचा खेळखंडोबा नेहमी सुरू असल्याने उगवत सुरू असलेली बियाणे पाण्याअभावी वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतीसह घरगुती विजेचा ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर दळप- कांडप करतानाही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने महिलांही यामुळे त्रस्त झाल्या आहेत. कोगे येथून वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. जाळपोळीची झलक परत होईलचार वर्षांपूर्वी महावितरण कंपनीचा विजेचा खेळखंडोबा असाच सुरू होता. त्यावेळी त्रस्त नागरिकांनी अधिकाऱ्याला जाब विचारला असता, अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावत कार्यालयातील संपूर्ण साहित्य पेटवले होते. महावितरण कंपनीने याची आठवण ठेवून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेकाला सामोरे जावे लागले.