शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जे निसर्गदत्त, ते सर्वांच्या मालकीचे

By admin | Updated: February 7, 2015 00:06 IST

बी. जी. कोळसे-पाटील : विद्यापीठात ‘समन्यायी पाणीवाटप व सामाजिक न्याय’ चर्चासत्र

कोल्हापूर : जे-जे निसर्गदत्त ते-ते सर्वांच्या मालकीचे असले पाहिजे. त्यावर सर्वांचा हक्क आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे, ही मूलभूत भूमिका अंगिकारणे आवश्यक आहे. पाणीवाटपाचा प्रश्न हा केवळ पाण्याचा नसून त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र अधिविभाग आणि भारती विद्यापीठाच्या ‘समन्यायी पाणीवाटप व सामाजिक न्याय’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, तर डॉ. भारत पाटणकर, चिकोत्रा प्रकल्पाचे प्रणेते आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.पाणीवाटपाच्या सामाजिक न्यायाच्या बाजूबाबत कोळसे-पाटील म्हणाले, समग्राची जाणीव झाल्याशिवाय त्यातील काही अंशांवर काम करणे अशक्य असते. लोकशाही व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक, राजकीय समता अभिप्रेत असताना आपण विषमतेविरुद्ध लढायचेच विसरलो. त्यातून अखिल मानवजातीचे कल्याण हा शिक्षणाचा मूळ हेतू साध्य झाला का, असा प्रश्न पडतो. डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, पाणी ही वित्तीय वस्तू (इकॉनॉमिक गुड) आहे, अशी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी केल्यास सुयोग्य व्यवस्थापनाची गरज अधोरेखित होते. त्यामुळे त्याचे केवळ समन्यायीच नव्हे, तर त्या बरोबरीने कार्यक्षम वाटप होणे अत्यावश्यक आहे. पाण्याचे प्रमाण वेगाने घटत असून येत्या ५० वर्षांत जगभर पाणीटंचाई होण्याची चिन्हे आहेत. डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यघटनेने दिलेला जीवनाचा आणि जीविकेचा अधिकार विचारात घेता नागरिकांना किमान आवश्यक पाणी मिळणे गरजेचे आहे. स्थानिकतेसह व्यापक पद्धतीने या धोरणाचा विचार झाल्यास त्याचे खरे लाभ प्राप्त होतील. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, पावसाचे पाणी आणि भूगर्भातील पाणी या दोहोंच्या नियोजनाची मोठी गरज आहे. पावसाचे दहा टक्के पाणी जमिनीत मुरते आणि ९० टक्के पाणी विविध प्रवाहांतून वाहून जाते. या दहा टक्के मुरणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे. पाण्याचे वितरण हा राष्ट्रीय नियोजनाचा भाग असावा. चर्चासत्रास संपतबापू पाटील, प्रा. प्रदीप पुरंदरे, संपतराव देसाई, डॉ. बी. टी. लावणी, कल्पनाताई साळुंखे आदी उपस्थित होते. प्रा. आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. जगन कराडे यांनी आभार मानले. छोटासा तरीही ज्वलंत भागदेशातील साठ कोटी दलित, आदिवासी, कष्टकरी जनतेच्या कल्याणाचे नियोजन आपल्याकडे नाही. या सर्व समाजाच्या जगण्याचे प्रश्न घेऊन लढण्याची गरज आहे. समन्यायी पाणीवाटप हा त्या लढ्याचा एक छोटासा तरीही ज्वलंत भाग आहे, अशा शब्दात समन्यायी पाणीवाटपाचे महत्त्व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी यावेळी विषद केले.