शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

धरणे भरणार की नाही याची धास्ती

By admin | Updated: August 7, 2015 22:54 IST

अपुऱ्या पावसाचा परिणाम : जलविद्युत निर्मिती ठप्प, उन्हाळ््यात पाणी प्रश्न उद्भवणार

राधानगरी : अपुरा पाऊस होऊनही शेतकऱ्यांनी कशीतरी शेतीकामे उरकली खरी, मात्र अशीच स्थिती राहिल्यास उन्हाळ््यात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नांची धास्ती निर्माण झाली आहे. दरवर्षी या काळात ‘ओव्हर फ्लो’ होणारी धरणे भरतात की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय यावर्षी जलविद्युत निर्मिती ठप्प झाल्याने मोठे नुकसान संबंधितांना सोसावे लागणार आहे. राधानगरी व काळम्मावाडी येथील वीज केंद्रांतून गतवर्षी जवळपास पन्नास लाख युनिट वीज निर्मिती या काळात झाली होती.राधानगरीच्या ऐतिहासिक लक्ष्मी तलावाच्या सभोवताली अभयारण्याचे संरक्षण कवच असल्याने येथे प्रचंड पाऊस कोसळतो. परिणामी महिन्याभरातच धरण पूर्ण भरू शकते. म्हणून येथील दोन्ही केंद्रांतील जलविद्युत निर्मिती जूनपासूनच सुरू होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुरू होतात. गतवर्षी पावसाच्या सुरुवातीला २.४0 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक होता. जूनपासून ‘महाजनको’च्या केंद्रांतून ३१ जुलैपर्र्यंत ६५ हजार युनिट, तर सप्टेंबरपर्यंत दोन लाख ५७ हजार युनिट वीज तयार झाली होती. मोहिते कंपनीच्या केंद्रातून केवळ जुलै माहिन्यातच २२ लाख, तर जून महिन्यात दहा लाख युनिट वीज निर्माण झाली होती.गतवर्षी ३१ जुलैपर्यंत २७५७ मि. मी. पाऊस झाला होता. धरणात ७.९१ टी.एम.सी. पाणी होते. १ आॅगस्ट २0१४ रोजी स्वयंचलित दरवाजे सुरू झाले होते. यावर्षी येथे १८३६ मि.मी. पाऊस झाला आहे, तर धरणात ५.८२ टी. एम. सी. पाणीसाठा आहे. यावर्षी केवळ ‘महाजनको’च्या केंद्रातून चाचणीसाठी पाणी सोडल्याने ११ हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे.जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण अशी ओळख असणाऱ्या काळम्मावाडी येथील शाहू सागर जलाशयाचीही अपूर्णच स्थिती आहे. येथे मे २0१४ अखेर धरणात ६.३४ टी.एम.सी. पाणी शिल्लक होते. ३१ जुलै २0१४ पर्यंत येथे १८८२ मि.मी. पाऊस होऊन पाणीसाठा १६.१९ शिल्लक राहिला होता. शिवाय या काळात वीजनिर्मिती केंद्रात सोडलेल्या पाण्यामुळे २८ लाख ६३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली होती.यावर्षी ३१ मे अखेरीस ७.३६ टी. एम. सी. इतका पाणीसाठा होता, तर केवळ १२८७ मि. मी. पाऊस पडल्याने ३१ जुलैचा पाणीसाठा १४.४६ टी. एम. सी. झाला आहे. हे धरण पूर्ण भरायला अजून ११ टी. एम. सी. पाणीसाठा कमी आहे. पावसाची स्थिती पाहता, हे धरण भरण्याची अनिश्चितता आहे. असे झाल्यास उन्हाळ््यात पाण्याच्या वापरावर मर्यादा येणार आहेत. (प्रतिनिधी)