शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मेरा फरान कहाँ हैं ?

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

अस्वस्थ आईचा प्रश्न : बालक अपहरणाचा तपास संथ

एकनाथ पाटील -कोल्हापूर --दर्शन शहा या शाळकरी मुलाचा खंडणीसाठी खून, गांधीनगर येथील चिराग या बालकाचे खंडणीसाठी अपहरण, अशा गंभीर घटना गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ताज्या असताना दहा दिवसांपूर्वी कोल्हापुरातील टाऊन हॉल बागेतून अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या बालकाचा शोध लागलेला नाही. फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याने अशा घटना घडू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुलाच्या अपहरणाच्या धक्क्याने आई-वडिलांनी अंथरूण धरले आहे. धीर देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक व पोलिसांना ते ‘मेरा फरान कहाँ हैं’, अशी हाक देत आहेत.भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणाहून बालकाचे अपहरण होऊनही लक्ष्मीपुरी पोलिसांचा तपास ‘कासवा’च्या गतीने सुरू आहे. अकिब मन्सूर जांभारकर मुळचे रत्नागिरीचे. वीस वर्षांपासून कोल्हापुरात सिद्धार्थनगराते राहतात. त्यांची टाऊन हॉलजवळ केळीची हातगाडी आहे. व्यवसायामध्ये पत्नीही हातभार लावते. कष्टकरी दाम्पत्यास दोन मुले. नवमान व फरान. नवमान सात वर्षांचा, तर फरान दोन वर्षांचा. पती-पत्नी केळीच्या गाड्यावर उभे राहत असल्याने मुले टाऊन हॉल बागेत खेळतात. सोमवारी(दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास फरान मुलांसोबत खेळत होता. दुपार नंतर तो गायब झाला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी त्याचा बागेत शोध घेतल्यावर तो आढळला नाही. त्यांनी त्याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी तो घरी व आजूबाजूला चौकशी केली असता तो आढळला नाही. म्हणून लक्ष्मीपुरी पोलीसांत मंगळवारी (दि. १७) फिर्याद दिली. तेव्हापासून शोध सुरू असल्याचे सांगून पोलीस जबाबदारी झटकत आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे.रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्या महिलेने मुलाचे अपहरण केल्याची माहिती नातेवाइकांना पोलिसांना दिली; परंतु पोलिसांनी फार कांही केलेले नाही. नातेवाइकांचीच रेल्वे, बसस्थानकासह पंढरपूर, मिरज आदी ठिकाणी शोधाशोध सुरू आहे. टोळीकडून अपहरणाची शक्यता नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यात भीक मागण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या दिवसाढवळ्या लहान मलांचे अपहरण करीत असल्याची चर्चा आहे. त्याच टोळीकडून फरानचे अपहरण झाल्याची दाट शक्यता असल्याने रस्त्यावर एकटे मुलांना सोडणे धोक्याचे बनले आहे.