शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

आंबेओहोळसाठी मंजूर केलेली २२७ कोटींची रक्कम गेली कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

* धरणग्रस्तांचे पुनर्वसनही नाही, धरणाचेही काम झालेले नाही आजरा : रखडलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाला गती देण्यासाठी तत्कालीन महसूल व सार्वजनिक ...

* धरणग्रस्तांचे पुनर्वसनही नाही, धरणाचेही काम झालेले नाही

आजरा :

रखडलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाला गती देण्यासाठी तत्कालीन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून २७७ कोटींची रक्कम मंजूर केली. पण, धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही व अद्याप धरणाचेही काम पूर्ण झालेले नाही. मग, मंजूर २२७ कोटी रुपयांची रक्कम गेली कुठे? असा सवाल भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुनर्वसन वेळेत न झाल्याने आंबेओहोळचे काम बंद पडण्याची वेळ आली आहे. युती सरकारच्या काळात प्रकल्पाला निधी मंजूर झाला. त्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गस्थ लागले. मात्र, राज्यातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी कायद्याप्रमाणे आधी पुनर्वसन मगच धरण अशी टोकाची भूमिका घेतली. आता आघाडी सरकार अगोदर घळभरणीचे काम करू, पण पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी अडविणार नाही असे म्हणत आहे. यावर धरणग्रस्तांचा विश्वास राहिलेला नाही. प्रकल्पाला भरीव निधीची तरतूद करूनही उत्तूर भागातील शेतकऱ्यांना अजून किती दिवस पाण्याची वाट पाहावी लागणार असाही सवाल उत्तूर भाजपा अध्यक्ष श्रीपती यादव, अतिषकुमार देसाई यांनी केला.

आंबेओहोळ धरणाला भाजपाचा विरोध नाही. पण, धरणग्रस्तांचे पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम व पाणी साठवू देणार नाही. आम्ही राजकारण करीत नाही. १९९६ पासून आंबेओहोळ झालाच पाहिजे यासाठी पाठपुरावा केला आहे, असेही श्रीपती यादव, अरुण देसाई, सुधीर कुंभार यांनी सांगितले.

आंबेओहोळमधील राजकारण थांबवा व धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून धरण बांधा. शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे, याचा विचार करा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष अशोक चराटी यांनी केले.