शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रोजंदारी कर्मचाऱ्यांची साडेसाती संपणार कधी ?

By admin | Updated: August 6, 2015 22:06 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : १0२ कर्मचाऱ्यांची केवळ अडीच हजार रुपये तुटपुंज्या वेतनावर फरफट

दिलीप चरणे - नवे पारगाव--जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोजंदारीवर नियुक्त केलेल्या १०२ कर्मचाऱ्यांचा वेतनासह सेवा शाश्वती हा प्रश्न गेली साडेतीन वर्षे ऐरणीवर आहे. केवळ अडीच हजार रुपयांच्या तुटपुंज्या वेतनावर त्यांच्या कुटुुंबाची फरफट होत आहे. प्रशासकांच्या ताठर भूमिकेमुळे त्यांचा प्रश्न अधांतरीच राहिला असून विद्यमान संचालक मंडळाकडून हे कर्मचारी आशावादी आहेत.जिल्हा बँकेच्या २००७-०८ च्या संचालक मंडळाने १०९ जणांची नोकर भरती केली. नियुक्तीनंतर त्यांना केवळ अडीच हजार रुपये वेतन होते, ते अजूनही तसेच आहे. १०९ पैकी चारजणांचा मृत्यू झाला, तर तिघांनी नोकरीला रामराम ठोकला. सध्या १0२ कर्मचारी इमानेइतबारे काम करीत आहेत. सकाळी १0 ते सायंकाळी ६ पर्यंत कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे हे कर्मचारीही राबत आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अलीकडील असल्याने हे कर्मचारी संगणकज्ञानात सरस आहेत, याचा प्रत्यय नुकताच जिल्हा बँकेच्या झालेल्या कोअर बँकिंगप्रणाली जोडणीवेळी झाला आहे. पगारवाढ होईल, नोकरीत स्थैर्य मिळेल या आशेपोटी हे कर्मचारी शिपायापासून शाखाधिकाऱ्यांचीही पडद्याआड बडदास्त ठेवतात. कायम नोकरीत नसल्याने कर्मचाऱ्यांना लग्न जमवताना अडथळे आले. हे सर्व पार करीत ९९ टक्के जणांची लग्ने झालीत. अर्धे आयुष्य संपलं तरी ते सेवेत कायम नाहीत व नोकरीस लागल्यापासून एक रुपयाही वाढ झाली नाही. त्यांच्या व्यथा मन सुन्न करणाऱ्या आहेत.नोकरीच्या स्थैर्याकरिता त्यांची चार वर्षे न्यायालय व प्रशासकांबरोबर झगडण्यात गेली. जिल्हा बँकेची स्थिती जेव्हा नाजूक बनली तेव्हा प्रशासक व बँकेचे कर्मचारी यांनी बँक वाचविली ही सामान्य बँक खातेदारांची धारणा आहे. आज बँकेची स्थिती सुधारली असून एनपीए ८ टक्केपर्यंत, तर ठेवीमध्ये वाढ होऊन त्या २८८९ कोटींपर्यंत झाल्या. याकरिता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. नवीन संचालक मंडळ सत्तारूढ झाले. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. हसन मुश्रीफ हे सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यात माहीर असल्यामुळे त्यांच्याकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल, अशी आशा त्यांच्या ठायी आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत संचालक मंडळ योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.