शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

रोजंदारी कर्मचाऱ्यांची साडेसाती संपणार कधी ?

By admin | Updated: August 6, 2015 22:06 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : १0२ कर्मचाऱ्यांची केवळ अडीच हजार रुपये तुटपुंज्या वेतनावर फरफट

दिलीप चरणे - नवे पारगाव--जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोजंदारीवर नियुक्त केलेल्या १०२ कर्मचाऱ्यांचा वेतनासह सेवा शाश्वती हा प्रश्न गेली साडेतीन वर्षे ऐरणीवर आहे. केवळ अडीच हजार रुपयांच्या तुटपुंज्या वेतनावर त्यांच्या कुटुुंबाची फरफट होत आहे. प्रशासकांच्या ताठर भूमिकेमुळे त्यांचा प्रश्न अधांतरीच राहिला असून विद्यमान संचालक मंडळाकडून हे कर्मचारी आशावादी आहेत.जिल्हा बँकेच्या २००७-०८ च्या संचालक मंडळाने १०९ जणांची नोकर भरती केली. नियुक्तीनंतर त्यांना केवळ अडीच हजार रुपये वेतन होते, ते अजूनही तसेच आहे. १०९ पैकी चारजणांचा मृत्यू झाला, तर तिघांनी नोकरीला रामराम ठोकला. सध्या १0२ कर्मचारी इमानेइतबारे काम करीत आहेत. सकाळी १0 ते सायंकाळी ६ पर्यंत कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे हे कर्मचारीही राबत आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या अलीकडील असल्याने हे कर्मचारी संगणकज्ञानात सरस आहेत, याचा प्रत्यय नुकताच जिल्हा बँकेच्या झालेल्या कोअर बँकिंगप्रणाली जोडणीवेळी झाला आहे. पगारवाढ होईल, नोकरीत स्थैर्य मिळेल या आशेपोटी हे कर्मचारी शिपायापासून शाखाधिकाऱ्यांचीही पडद्याआड बडदास्त ठेवतात. कायम नोकरीत नसल्याने कर्मचाऱ्यांना लग्न जमवताना अडथळे आले. हे सर्व पार करीत ९९ टक्के जणांची लग्ने झालीत. अर्धे आयुष्य संपलं तरी ते सेवेत कायम नाहीत व नोकरीस लागल्यापासून एक रुपयाही वाढ झाली नाही. त्यांच्या व्यथा मन सुन्न करणाऱ्या आहेत.नोकरीच्या स्थैर्याकरिता त्यांची चार वर्षे न्यायालय व प्रशासकांबरोबर झगडण्यात गेली. जिल्हा बँकेची स्थिती जेव्हा नाजूक बनली तेव्हा प्रशासक व बँकेचे कर्मचारी यांनी बँक वाचविली ही सामान्य बँक खातेदारांची धारणा आहे. आज बँकेची स्थिती सुधारली असून एनपीए ८ टक्केपर्यंत, तर ठेवीमध्ये वाढ होऊन त्या २८८९ कोटींपर्यंत झाल्या. याकरिता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. नवीन संचालक मंडळ सत्तारूढ झाले. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. हसन मुश्रीफ हे सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यात माहीर असल्यामुळे त्यांच्याकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल, अशी आशा त्यांच्या ठायी आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत संचालक मंडळ योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.