शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

साखर कारखान्यांना पाझर फुटणार कधी?

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

दोनच कारखान्यांकडे दातृत्व : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत उदासीन

प्रवीण देसाई  - कोल्हापूर -कर्जाचा डोंगर असाह्य झाल्याने मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना अद्याप संपलेली नाही. या पीडितग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना दत्तक घ्यावे, असा निर्णय झाला असताना जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) व आजरा सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने दातृत्व दाखविलेले नाही. दहा वर्षांत कर्जाची परतफेड न झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ८५ पर्यंत आहे. त्यांच्यापैकी ६३ जण शासकीय सानुग्रह अनुदानास पात्र आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांची ससेहोलपट सुरू आहे. पोटाची खळगी भरताना त्यांना अनेक दिव्ये पार करावी लागत आहेत. त्यातच आपल्या पाल्याने शिकावे, असे कुठल्या आईला वाटणार नाही; परंतु दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना शिक्षणाचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधकारमय आहे. ९ डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय झाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या एका संघटनेने सुचविलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २५०० रुपये व पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी ५००० रुपये देण्याचे निश्चित झाले. प्रत्येक वर्षाला मिळणाऱ्या या रकमेमध्ये खंड पडू नये, यासाठी ही रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर ही मदत त्या मुलांना द्यावी, असेही ठरले होते. परंतु, जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी शरद व आजरा साखर कारखाना सोडले, तर इतरांनी दातृत्व दाखविलेले नाही. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही त्याला ‘केराची टोपली’ दाखविल्याचे दिसत आहे. या दोन्ही साखर कारखान्यांनी आपली सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या कार्यक्षेत्रातील मुलांना दत्तक घेतले आहे.यांना घेतले दत्तकशरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. संजय पाटील (रा. टाकवडे) यांचा मुलगा गंगाधर याच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे, तर आजरा साखर कारखान्याच्यावतीने कै. राजाराम भीवा धडाम (मोरेवाडी) यांच्यासाठी पांडुरंग याच्या शिक्षणासाठी मदत केली आहे.शेतकऱ्यांविषयी वरवरची आस्था दाखविणारे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज असते, तेव्हा पाठ फिरवितात. या प्रश्नावर शुक्रवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी सकारात्मक मार्ग निघाला नाही, तर पावसाळी अधिवेशनावेळी सरकारविरोधी मुंबईत आंदोलन करू.- शिवाजीराव परुळेकर, अध्यक्ष, जनता नागरी निवारा संघटना