शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

साखर कारखान्यांना पाझर फुटणार कधी?

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

दोनच कारखान्यांकडे दातृत्व : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत उदासीन

प्रवीण देसाई  - कोल्हापूर -कर्जाचा डोंगर असाह्य झाल्याने मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना अद्याप संपलेली नाही. या पीडितग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना दत्तक घ्यावे, असा निर्णय झाला असताना जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) व आजरा सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने दातृत्व दाखविलेले नाही. दहा वर्षांत कर्जाची परतफेड न झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ८५ पर्यंत आहे. त्यांच्यापैकी ६३ जण शासकीय सानुग्रह अनुदानास पात्र आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांची ससेहोलपट सुरू आहे. पोटाची खळगी भरताना त्यांना अनेक दिव्ये पार करावी लागत आहेत. त्यातच आपल्या पाल्याने शिकावे, असे कुठल्या आईला वाटणार नाही; परंतु दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना शिक्षणाचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधकारमय आहे. ९ डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय झाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या एका संघटनेने सुचविलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २५०० रुपये व पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी ५००० रुपये देण्याचे निश्चित झाले. प्रत्येक वर्षाला मिळणाऱ्या या रकमेमध्ये खंड पडू नये, यासाठी ही रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर ही मदत त्या मुलांना द्यावी, असेही ठरले होते. परंतु, जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी शरद व आजरा साखर कारखाना सोडले, तर इतरांनी दातृत्व दाखविलेले नाही. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही त्याला ‘केराची टोपली’ दाखविल्याचे दिसत आहे. या दोन्ही साखर कारखान्यांनी आपली सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या कार्यक्षेत्रातील मुलांना दत्तक घेतले आहे.यांना घेतले दत्तकशरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. संजय पाटील (रा. टाकवडे) यांचा मुलगा गंगाधर याच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे, तर आजरा साखर कारखान्याच्यावतीने कै. राजाराम भीवा धडाम (मोरेवाडी) यांच्यासाठी पांडुरंग याच्या शिक्षणासाठी मदत केली आहे.शेतकऱ्यांविषयी वरवरची आस्था दाखविणारे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज असते, तेव्हा पाठ फिरवितात. या प्रश्नावर शुक्रवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी सकारात्मक मार्ग निघाला नाही, तर पावसाळी अधिवेशनावेळी सरकारविरोधी मुंबईत आंदोलन करू.- शिवाजीराव परुळेकर, अध्यक्ष, जनता नागरी निवारा संघटना