शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

बोरवडेकरांचे प्रबोधन होणार तरी कधी ?

By admin | Updated: October 23, 2014 00:02 IST

प्रत्येक निवडणुकीत राडा ठरलेलाच : पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज

अनिल पाटील - मुरगूड - गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्याच्या संवेदनशील गावच्या यादीत नंबर वन असणाऱ्या कागल तालुक्यातील बोरवडे गावातील सुजाण नागरिकांनी गावाच्या भल्यासाठी प्रबोधनाच्या मार्गातून पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत कोणाचाही जय-पराजय होवो, या ना त्या कारणाने बोरवडेमध्ये राडा ठरलेलाच असतो. रोजच्याच प्रकाराने गावातील सर्वसामान्य नागरिकांतून याबाबत नापसंती व्यक्त होत आहे. गावची शांती भंग करणाऱ्या घटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कागल विधानसभेचा निकाल परतवणारे गाव म्हणून बोरवडे गावची ओळख सर्वश्रूत आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे एकहाती हत्तीचे बळ देणारे गाव म्हणून बोरवडे गाव राजकारणात महत्त्वाचे ठरलेले; पण मंडलिकांपासून हसन मुश्रीफ बाजूला गेल्यानंतर या गावचे तत्कालीन जुन्या मंडलिक गटाचे शिलेदार गणपतराव फराकटे यांनी बोरवडे गावची ताकद हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे मुश्रीफ यांचा विजय सुकर करण्यामध्ये बोरवडेकरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच मंडलिक, संजय घाटगे गटाला हे गाव मारक ठरत आहे. काही वर्षांपूर्वी विक्रमसिंह घाटगे गटाला या गावाने मतदानामध्ये त्रास दिला होता. मुश्रीफ यांनीही आपल्याला एकगठ्ठा मतदान मिळते म्हणून कोट्यवधीचा निधी, फराकटे यांच्याकरवी महत्त्वाची पदे या गावाला दिली. मुश्रीफांना अगदी परवा झालेल्या निवडणुकीतही या गावाने १६०० चे मताधिक्य दिले.कितीही चांगली कामे झाली तरी गावात विरोधक असणारच, याला अपवाद बोरवडेही नाही. मंडलिक गटाकडून हमीदवाडा कारखान्याचे संचालक आनंदा फराकटे आणि काही वर्षांपूर्वी मुश्रीफांचे निष्ठावंत असलेले, पण आता मंडलिक गटामध्ये सामील झालेले बालाजी फराकटे यांनी गणपतराव फराकटे यांच्या एकहाती सत्तेला थोपविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, विधानसभा असो की लोकसभा, या ना त्या कारणांवरून हे दोन्ही गट एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी समोरासमोर येतात आणि मारामाऱ्या, दगडफेक, दरोडा अशा अनेक गुन्ह्यांखाली सर्वसामान्यांची पोरं अडकविली जातात.या सर्वांचा विचार करता हे सर्व थांबविण्यासाठी आणि गावची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी दोन्ही गटांकडून सामंजस्य ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. धार्मिक कार्यक्रमांत, सार्वत्रिक उपक्रमांत सर्वांनी एकदिलाने पुढे आले पाहिजे. विकासकामांच्या माध्यमातून संघर्षाची धार कमी करण्याची जबाबदारी या गावातील नेत्यांनी घेणे गरजेचे बनले आहे. प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा हवाविधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने संवेदनशील गावा-गावांमध्ये बैठका घेऊन परस्पर विरोधी गटांचे प्रबोधन केले. त्यामुळे मुरगूड पोलीस ठाण्याला चांगले यशही मिळाले. बोरवडेची घटना वगळता परिसरामध्ये अगदी मुरगूडमध्येही कोणतीही अनुचित घटना घडली नाही; पण बोरवडे गावात चक्क सातवेळा शांतता बैठक घेऊनही शेवटी राडा झालाच. त्यामुळे प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा बोरवडेकरांना दाखवायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.