शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बोरवडेकरांचे प्रबोधन होणार तरी कधी ?

By admin | Updated: October 23, 2014 00:02 IST

प्रत्येक निवडणुकीत राडा ठरलेलाच : पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज

अनिल पाटील - मुरगूड - गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्याच्या संवेदनशील गावच्या यादीत नंबर वन असणाऱ्या कागल तालुक्यातील बोरवडे गावातील सुजाण नागरिकांनी गावाच्या भल्यासाठी प्रबोधनाच्या मार्गातून पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत कोणाचाही जय-पराजय होवो, या ना त्या कारणाने बोरवडेमध्ये राडा ठरलेलाच असतो. रोजच्याच प्रकाराने गावातील सर्वसामान्य नागरिकांतून याबाबत नापसंती व्यक्त होत आहे. गावची शांती भंग करणाऱ्या घटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कागल विधानसभेचा निकाल परतवणारे गाव म्हणून बोरवडे गावची ओळख सर्वश्रूत आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे एकहाती हत्तीचे बळ देणारे गाव म्हणून बोरवडे गाव राजकारणात महत्त्वाचे ठरलेले; पण मंडलिकांपासून हसन मुश्रीफ बाजूला गेल्यानंतर या गावचे तत्कालीन जुन्या मंडलिक गटाचे शिलेदार गणपतराव फराकटे यांनी बोरवडे गावची ताकद हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे मुश्रीफ यांचा विजय सुकर करण्यामध्ये बोरवडेकरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच मंडलिक, संजय घाटगे गटाला हे गाव मारक ठरत आहे. काही वर्षांपूर्वी विक्रमसिंह घाटगे गटाला या गावाने मतदानामध्ये त्रास दिला होता. मुश्रीफ यांनीही आपल्याला एकगठ्ठा मतदान मिळते म्हणून कोट्यवधीचा निधी, फराकटे यांच्याकरवी महत्त्वाची पदे या गावाला दिली. मुश्रीफांना अगदी परवा झालेल्या निवडणुकीतही या गावाने १६०० चे मताधिक्य दिले.कितीही चांगली कामे झाली तरी गावात विरोधक असणारच, याला अपवाद बोरवडेही नाही. मंडलिक गटाकडून हमीदवाडा कारखान्याचे संचालक आनंदा फराकटे आणि काही वर्षांपूर्वी मुश्रीफांचे निष्ठावंत असलेले, पण आता मंडलिक गटामध्ये सामील झालेले बालाजी फराकटे यांनी गणपतराव फराकटे यांच्या एकहाती सत्तेला थोपविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, विधानसभा असो की लोकसभा, या ना त्या कारणांवरून हे दोन्ही गट एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी समोरासमोर येतात आणि मारामाऱ्या, दगडफेक, दरोडा अशा अनेक गुन्ह्यांखाली सर्वसामान्यांची पोरं अडकविली जातात.या सर्वांचा विचार करता हे सर्व थांबविण्यासाठी आणि गावची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी दोन्ही गटांकडून सामंजस्य ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. धार्मिक कार्यक्रमांत, सार्वत्रिक उपक्रमांत सर्वांनी एकदिलाने पुढे आले पाहिजे. विकासकामांच्या माध्यमातून संघर्षाची धार कमी करण्याची जबाबदारी या गावातील नेत्यांनी घेणे गरजेचे बनले आहे. प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा हवाविधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने संवेदनशील गावा-गावांमध्ये बैठका घेऊन परस्पर विरोधी गटांचे प्रबोधन केले. त्यामुळे मुरगूड पोलीस ठाण्याला चांगले यशही मिळाले. बोरवडेची घटना वगळता परिसरामध्ये अगदी मुरगूडमध्येही कोणतीही अनुचित घटना घडली नाही; पण बोरवडे गावात चक्क सातवेळा शांतता बैठक घेऊनही शेवटी राडा झालाच. त्यामुळे प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा बोरवडेकरांना दाखवायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.