शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बोरवडेकरांचे प्रबोधन होणार तरी कधी ?

By admin | Updated: October 23, 2014 00:02 IST

प्रत्येक निवडणुकीत राडा ठरलेलाच : पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज

अनिल पाटील - मुरगूड - गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्याच्या संवेदनशील गावच्या यादीत नंबर वन असणाऱ्या कागल तालुक्यातील बोरवडे गावातील सुजाण नागरिकांनी गावाच्या भल्यासाठी प्रबोधनाच्या मार्गातून पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही निवडणुकीत कोणाचाही जय-पराजय होवो, या ना त्या कारणाने बोरवडेमध्ये राडा ठरलेलाच असतो. रोजच्याच प्रकाराने गावातील सर्वसामान्य नागरिकांतून याबाबत नापसंती व्यक्त होत आहे. गावची शांती भंग करणाऱ्या घटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कागल विधानसभेचा निकाल परतवणारे गाव म्हणून बोरवडे गावची ओळख सर्वश्रूत आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे एकहाती हत्तीचे बळ देणारे गाव म्हणून बोरवडे गाव राजकारणात महत्त्वाचे ठरलेले; पण मंडलिकांपासून हसन मुश्रीफ बाजूला गेल्यानंतर या गावचे तत्कालीन जुन्या मंडलिक गटाचे शिलेदार गणपतराव फराकटे यांनी बोरवडे गावची ताकद हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे मुश्रीफ यांचा विजय सुकर करण्यामध्ये बोरवडेकरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच मंडलिक, संजय घाटगे गटाला हे गाव मारक ठरत आहे. काही वर्षांपूर्वी विक्रमसिंह घाटगे गटाला या गावाने मतदानामध्ये त्रास दिला होता. मुश्रीफ यांनीही आपल्याला एकगठ्ठा मतदान मिळते म्हणून कोट्यवधीचा निधी, फराकटे यांच्याकरवी महत्त्वाची पदे या गावाला दिली. मुश्रीफांना अगदी परवा झालेल्या निवडणुकीतही या गावाने १६०० चे मताधिक्य दिले.कितीही चांगली कामे झाली तरी गावात विरोधक असणारच, याला अपवाद बोरवडेही नाही. मंडलिक गटाकडून हमीदवाडा कारखान्याचे संचालक आनंदा फराकटे आणि काही वर्षांपूर्वी मुश्रीफांचे निष्ठावंत असलेले, पण आता मंडलिक गटामध्ये सामील झालेले बालाजी फराकटे यांनी गणपतराव फराकटे यांच्या एकहाती सत्तेला थोपविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, विधानसभा असो की लोकसभा, या ना त्या कारणांवरून हे दोन्ही गट एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी समोरासमोर येतात आणि मारामाऱ्या, दगडफेक, दरोडा अशा अनेक गुन्ह्यांखाली सर्वसामान्यांची पोरं अडकविली जातात.या सर्वांचा विचार करता हे सर्व थांबविण्यासाठी आणि गावची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी दोन्ही गटांकडून सामंजस्य ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. धार्मिक कार्यक्रमांत, सार्वत्रिक उपक्रमांत सर्वांनी एकदिलाने पुढे आले पाहिजे. विकासकामांच्या माध्यमातून संघर्षाची धार कमी करण्याची जबाबदारी या गावातील नेत्यांनी घेणे गरजेचे बनले आहे. प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा हवाविधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने संवेदनशील गावा-गावांमध्ये बैठका घेऊन परस्पर विरोधी गटांचे प्रबोधन केले. त्यामुळे मुरगूड पोलीस ठाण्याला चांगले यशही मिळाले. बोरवडेची घटना वगळता परिसरामध्ये अगदी मुरगूडमध्येही कोणतीही अनुचित घटना घडली नाही; पण बोरवडे गावात चक्क सातवेळा शांतता बैठक घेऊनही शेवटी राडा झालाच. त्यामुळे प्रबोधनाबरोबर कायद्याचा बडगा बोरवडेकरांना दाखवायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.