शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

‘कृष्णा’च्या आईला शोधताना रेल्वेने केली ताटातूट

By admin | Updated: January 29, 2016 23:56 IST

...अन् रेल्वे सुटली : भरकटलेल्या पवन आवळेची कहाणी; मिरज पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी

एकनाथ पाटील -- कोल्हापूर--खेळायला जातो म्हणून आम्ही घरातून बाहेर पडलो...कृष्णा ऊर्फ आर्याची आई रेल्वे स्थानकावर स्क्रॅप गोळा करते. तिला शोधण्यासाठी आम्ही तिघेजण गेलो होतो. शोधताशोधता आम्ही रेल्वेत चढलो...अचानक रेल्वे सुरू झाली...अन् आम्ही भीतीने खाली उतरलोच नाही, अशी माहिती रेल्वेतून भरकटलेल्या पवन अनिल आवळे (वय ११) या मुलाने शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील गुन्हेगारीचे वास्तव्य म्हणून जवाहरनगरची ओळख आहे. गँगस्टार, चोऱ्या, लूटमारीमध्ये येथील तरुणांसह महिलांचा वाढता सहभाग आहे. आजूबाजूच्या गुन्हेगारी वातावरणाचा परिणाम येथील लहान मुलांवर होत आहे. येथील पवन आवळे, कृष्णा तुकाराम झाडबुके (१०) व त्याचा भाऊ यश (७) हे तिघेजण गुरुवारी रेल्वेतून प्रवास करत होते. प्रवासी अमित पवार यांना संशय आल्याने त्यांनी या तिघांना मिरज पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जवाहरनगर पत्ता सांगितला. त्यावरून पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने ही मुले रेल्वेतून प्रवास करत असल्याचा संशय व्यक्त केला. या तिन्ही मुलांमध्ये पवन हा मोठा होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने कृष्णा व यशची आई स्क्रॅप गोळा करते, ती रेल्वे स्थानक परिसरात नेहमी फिरत असते. त्यामुळे तिला भेटण्यासाठी आम्ही रेल्वे स्थानकावर आलो. याठिकाणी शोधाशोध केली पण ती दिसली नाही. रेल्वेत असेल म्हणून तिला शोधण्यासाठी रेल्वेत चढलो असता रेल्वे निघाली. खाली उतरायचे कसे म्हणून आम्ही रेल्वेत बसून राहिल्याचे त्याने सांगितले. पतीच्या निधनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुलगी व दोन मुलांची जबाबदारी संगीता आवळे यांच्यावर पडली आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. राहायला झोपडी, दोनवेळच्या जेवणासाठी दिवसभर धुण्या-भांड्यांची कामे करून संसाराचा रहाटगाडा चालवितात. त्यांची मुलगी शुभांगीसह दोन्ही मुले वीर कक्कय विद्यालयात शिकत आहेत. लहान मुलगा पवन हा पाचवीमध्ये शिकतो. गुरुवारी सकाळी पवन हा बाहेर खेळायला जातो म्हणून बाहेर पडला. संगीता या धुण्या-भांड्याची कामे करून दुपारी घरी आल्या. इतक्यात रेल्वे पोलिसांचा निरोप आला. त्या तातडीने मिरजेला गेल्या. पोलीस ठाण्यामध्ये बाकड्यावर तीन लहान मुले बसलेली होती. त्यामध्ये त्यांचाही मुलगा पवन बसून होता. भीतीने अंग थरथरत असलेल्या संगीता यांना पोलिसांनी सावरले. त्यानंतर त्यांचा व कृष्णाच्या नातेवाइकांचा जाब-जबाब घेऊन तिघांनाही त्यांच्या स्वाधीन केले. स्कूल बोर्डाकडून चौकशी पवन आवळे हा वीर कक्कय विद्यालयात पाचवीमध्ये शिकतो. तो त्याचे मित्र मिरजेला गेल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाने (स्कूल बोर्ड) या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. त्यानुसार शिक्षण विभागाचे विजय माळी, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र हळिज्वाळे, शिक्षक उमेश देसाई यांनी तिन्हीही मुलांच्या घरी शुक्रवारी सकाळी भेट दिली. त्यानंतर पवन आवळे हा शाळेला असून, कृष्णा व यश ही दोन मुले शाळेला नसल्याचे स्पष्ट झाले. बहिणीने दिला जबाब संगीता आवळे या अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांचा लेखी जबाब कसा घ्यायचा? असा प्रश्न मुखाध्यापक व शिक्षकांना पडला. अखेर पवनची थोरली बहीण शुभांगी हिने स्वत:च्या हस्ताक्षरात जबाब लिहून दिला. त्यावर संगीता यांचा अंगठा घेतला. शाळेतील पवनच्या गैरहजेरीचे रेकॉर्ड शिक्षकांनी त्याच्या आईसमोर ठेवले. हा जबाब सुरू असताना पवन बिनधास्तपणे शिक्षकांच्या समोर खुर्चीवर बसून दंगामस्ती करीत होता. नशीब बलवत्तर म्हणूनच ही तीन मुले पुन्हा आमच्या आश्रयाला आली. अन्यथा भरकटलेल्या या मुलांची कोणीतरी विक्री केली असती किंवा चोऱ्या, लूटमार करण्यास भाग पाडले असते. मिरज रेल्वे पोलिसांचे आम्ही आभारी आहे. - संगीता आवळे (पालक)