शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

अण्णा गेल्याचे ऐकून उमाताई झाल्या ‘स्तब्ध’

By admin | Updated: March 3, 2015 00:33 IST

प्रकृती स्थिर : रुग्णालयात व्हीलचेअरवरून फेरी

कोल्हापूर : पानसरे अण्णांना उमातार्इंनी आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या पानसरे अण्णांबरोबरच आपल्या अंगावर त्यांनी झेलल्या. या हल्ल्यात अण्णांचे निधन झाल्याचे वृत्त उमातार्इंना समजताच त्या ‘स्तब्ध’ झाल्या. त्यांना या घटनेचा इतका धक्का बसला की, काही काळ त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी रविवारी (दि. १) त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितले.आपल्यातून अण्णा निघून गेल्याचे सांगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त डॉक्टर जोपर्यंत परवानगी देत नाहीत, तोपर्यंत न सांगण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दहा दिवसांत उमातार्इंची प्रकृती दिवसागणिक सुधारत होती. त्यांना व्हीलचेअरवरूनदेखील फिरविण्यात येत होते. त्या बोलू लागल्यानंतर प्रत्येक दिवशी कॉम्रेडांची तब्येत कशी आहे, साहेबांची तब्येत बरी आहे ना?, त्यांची काळजी घ्या, असे त्यांना भेटणाऱ्या नातेवाईक आणि पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना त्या सांगत होत्या. यावेळी नातेवाईक, कार्यकर्त्यांना गलबलून आले, तरी ते अण्णा बरे असल्याचे सांगत होते. उमातार्इंची प्रकृती स्थिर व उत्तम असल्याने त्यांना अण्णांचे निधन झाल्याचे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्टरांनी सांगितले. त्याचा त्यांना इतका धक्का बसला की, त्यांच्या तोंडातून काहीकाळ एकही शब्द फुटला नाही शिवाय स्तब्ध झाल्या. त्यानंतर त्यांच्या बहिणींजवळ त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियांचे टाके काढण्यात आले आहेत. त्यांनी सोमवारी रुग्णालयातील आयसीयू युनिट बाहेरील मोकळ्या जागेत व्हीलचेअरवरून फेरी मारली. (प्रतिनिधी)एकमेकांचा मोठा आधारगेल्या बारा वर्षांपूर्वी अवी पानसरे यांचे अचानक निधन झाले. मुलगा गेल्याच्या धक्क्यातून उमाताई लवकर सावरल्या नव्हत्या. त्यानंतर अण्णा त्यांना बाहेरील कार्यक्रम, अन्य ठिकाणी जाताना कायम समवेत घ्यायचे. ते दिवसातील अधिकतर वेळ एकमेकांसोबत असायचे. त्या दोघांचा एकमेकांना मोठा आधार होता शिवाय त्यांच्यातील भावनिक बंध अतूट होते.