शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

जनगणनेचा अर्ज भरतांना ‘हिंदू धर्म’ असेच नमूद करा : लिंगायत महासंघाचे आवाहन; कोल्हापुरात उद्या होणार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST

कोल्हापूर : हिंदू हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पद्धती आहे, याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे येत्या ...

कोल्हापूर : हिंदू हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पद्धती आहे, याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे येत्या जनगणनेवेळी लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात हिंदू धर्म असेच नमूद करावे, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने केले आहे. महासंघाचा नववा वर्धापनदिन सोहळा येथे उद्या, शनिवारी अक्कमहादेवी मंटपात दुपारी १२ वाजता होत आहे. त्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी केले आहे.

डॉ. स्वामी म्हणतात की, वीरशैव समाज हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येत नाही. समाजातील काही राजकीय मंडळी वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करीत आहेत. येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात स्वत:चा धर्म ‘लिंगायत’ असे लिहिण्यासाठी सांगून ते समाजाची मोठी दिशाभूल करीत आहेत. वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी पडून स्वत:च्या हिंदू धर्माला सोडू नये. जनगणनेचा अर्ज भरताना धर्माच्या रकान्यात ‘हिंदू धर्म’ असेच नमूद करावे.

वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे. यासह विविध क्षेत्रांत स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या वीरशैव समाजातील १० मान्यवरांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाचे यजमानपद अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या कोल्हापूर शाखेने स्वीकारले आहे.

मान्यवर उपस्थिती

परमपूज्य डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य गौडगांवकर (खासदार), परमपूज्य डॉ. नीळकंठ शिवाचार्य धारेश्‍वर, परमपूज्य डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधामकर, परमपूज्य श्रीगुरू महादेव शिवाचार्य वाईकर, वेदान्ताचार्य दिगंबर शिवाचार्य वसमतकर, परमपूज्य डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य वाईकर, नूल मठाचे मठाधिपती परमपूज्य गुरुसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांची वंदनीय उपस्थिती या वर्धापन दिनाला लाभणार असल्याची माहिती डॉ. विजय जंगम स्वामी यांनी दिली.

दोन मतप्रवाह

जनगणनेवेळी धर्माच्या रकान्यात काय नोंद करायची यावरून वीरशैव लिंगायत समाजात सध्या दोन प्रवाह तयार झाले आहेत. लिंगायत धर्म म्हणून स्वतंत्र मान्यता मिळावी यासाठी गेले काही महिने आंदोलन करणाऱ्या गटाचे म्हणणे आहे की, जनगणनेवेळी त्यांनी धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ म्हणूनच नोंद करावी. ही भूमिका मान्य नसलेल्या प्रवाहाचे म्हणणे असे की, आपण लिंगायत असलो तरी मूळ हिंदू धर्माचेच घटक आहोत. डाव्या आणि उजव्या सनातनी विचारसरण्यांचा संघर्ष यामागे प्रामुख्याने दिसून येत आहे.