शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तमदलगेकरांना ‘वारणे’चे पाणी केव्हा?

By admin | Updated: May 12, 2015 00:12 IST

दिवसाआड पाणीपुरवठा : पेयजल योजनेच्या कामास मुहूर्त सापडेना; ‘शासकीय काम सहा महिने थांब’चा अनुभव

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यातील तमदलगे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मुहूर्त केव्हा सापडणार, असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. निविदा निघाली मात्र काम सुरू नसल्यामुळे या योजनेला ‘शासकीय काम सहा महिने थांब’, असाच अनुभव येत आहे. सध्या पाणीटंचाई भासत नसली तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ही योजना पूर्ण होण्याची गरज आहे.तालुक्यातील टंचाईग्रस्त म्हणून तमदलगे गावाची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त गाव म्हणून शासनाने जाहीर केलेले होते. गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाझर तलाव चांगला भरत आहे. मुख्य ओढ्यालगतच ग्राम पाणीपुरवठ्याची विहीर आहे. विहिरीतूनच गावात पिण्याचे पाणी पुरविले जाते. विहिरीलगतच जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेला बंधारा आहे. तलावात पाणी असेल तरच बंधारा भरतो व तलावातील पाझर व बंधाऱ्यातील पाझर यावरच विहिरीतील पाणी अवलंबून आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. विहिरीतील पाण्यामुळे सध्या एक दिवसाआड का होईना पाणीपुरवठा केला जात आहे. बंधारा व तलावातील पाणी आटले असले तरी पाझर पाण्यामुळे विहिरीत पाणी साठत आहे. सध्या गावास दैनंदिन १ लाख २० हजार लिटर पाण्याची गरज असली तरी कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. विहिरीतील फुटव्हॉल्व उघड्यावर पडले आहेत.दरम्यान, गावात सतत पाणीटंचाई भासत असल्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावाच्या जिव्हाळ्याचा या पाणी योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, अशी अपेक्षा असताना निविदा निघाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडील प्रशासकीय कामाच्या घोळामुळे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. याबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेले असताना कित्येक वर्षांनंतर वारणा नदीतून पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची गरज आहे.एक दिवसाआड पाणीसध्या गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा अजून तरी टॅँकरची आवश्यकता भासत नसली तरी तीन कूपनलिका खुदाईची गरज आहे. राष्ट्रीय पेयजल योजना कामासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच पिरगोंडा पाटील यांनी दिली....पण वर्कआॅर्डर नाहीतमदलगे पेयजल योजनेची निविदा निघाली आहे. मात्र, वर्कआॅर्डर मिळाली नसल्यामुळे अजून कामास सुरूवात केलेली नाही. जिल्हा परिषदेकडील प्रशासन निवडणूक प्रक्रियेत होते. आदेशाबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार कमते यांनी दिली.