शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तमदलगेकरांना ‘वारणे’चे पाणी केव्हा?

By admin | Updated: May 12, 2015 00:12 IST

दिवसाआड पाणीपुरवठा : पेयजल योजनेच्या कामास मुहूर्त सापडेना; ‘शासकीय काम सहा महिने थांब’चा अनुभव

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यातील तमदलगे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मुहूर्त केव्हा सापडणार, असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. निविदा निघाली मात्र काम सुरू नसल्यामुळे या योजनेला ‘शासकीय काम सहा महिने थांब’, असाच अनुभव येत आहे. सध्या पाणीटंचाई भासत नसली तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ही योजना पूर्ण होण्याची गरज आहे.तालुक्यातील टंचाईग्रस्त म्हणून तमदलगे गावाची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त गाव म्हणून शासनाने जाहीर केलेले होते. गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाझर तलाव चांगला भरत आहे. मुख्य ओढ्यालगतच ग्राम पाणीपुरवठ्याची विहीर आहे. विहिरीतूनच गावात पिण्याचे पाणी पुरविले जाते. विहिरीलगतच जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेला बंधारा आहे. तलावात पाणी असेल तरच बंधारा भरतो व तलावातील पाझर व बंधाऱ्यातील पाझर यावरच विहिरीतील पाणी अवलंबून आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. विहिरीतील पाण्यामुळे सध्या एक दिवसाआड का होईना पाणीपुरवठा केला जात आहे. बंधारा व तलावातील पाणी आटले असले तरी पाझर पाण्यामुळे विहिरीत पाणी साठत आहे. सध्या गावास दैनंदिन १ लाख २० हजार लिटर पाण्याची गरज असली तरी कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. विहिरीतील फुटव्हॉल्व उघड्यावर पडले आहेत.दरम्यान, गावात सतत पाणीटंचाई भासत असल्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावाच्या जिव्हाळ्याचा या पाणी योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, अशी अपेक्षा असताना निविदा निघाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडील प्रशासकीय कामाच्या घोळामुळे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. याबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेले असताना कित्येक वर्षांनंतर वारणा नदीतून पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची गरज आहे.एक दिवसाआड पाणीसध्या गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा अजून तरी टॅँकरची आवश्यकता भासत नसली तरी तीन कूपनलिका खुदाईची गरज आहे. राष्ट्रीय पेयजल योजना कामासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच पिरगोंडा पाटील यांनी दिली....पण वर्कआॅर्डर नाहीतमदलगे पेयजल योजनेची निविदा निघाली आहे. मात्र, वर्कआॅर्डर मिळाली नसल्यामुळे अजून कामास सुरूवात केलेली नाही. जिल्हा परिषदेकडील प्रशासन निवडणूक प्रक्रियेत होते. आदेशाबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार कमते यांनी दिली.