शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची चाके गतिमान, प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने एस. टी. बसेसवरही कडक निर्बंध घातले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने एस. टी. बसेसवरही कडक निर्बंध घातले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, संसर्गाचा कहर कमी आल्यानंतर सर्वच मार्गावरील प्रवासी वाहतूक सुुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाने ७०० पैकी ४५० बसेस रस्त्यावर उतरविल्या असून १३०० हून अधिक फेऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नातही भर पडू लागली आहे.

कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने सर्वत्र कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य प्र‌वाशांना प्रवास करण्यास मुभा दिली नाही. त्याचा परिणाम म्हणून एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सुमारे दिवसाकाठी १५ लाखांचे उत्पन्न बुडाले होते. अत्यावश्यक सेवेतील रस्त्यावर उतरविण्यात आलेल्या बसेसचा इंधनाचाही खर्च निघाला नाही. काहीअंशी निर्बंध शिथिल केल्यानंतर हळूहळू एस.टी.ची चाके पूर्वपदावर येऊ लागली आहेत. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील अंतर्गत ग्रामीण भागातही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही ठिकाणी प्रवाशांचा प्रतिसाद उदंड, तर काही ठिकाणी अजूनही संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एस.टी.बसेसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईलाही जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे मार्गावर रोज पन्नासहून अधिक बसेस सोडल्या जात आहेत. तर कर्नाटक, पणजी (गोवा) परराज्यांच्या मार्गावरील बसेस अजूनही बंद आहेत. तर कर्नाटकातूनही कर्नाटक महामंडळाच्या बसेसनाही कोल्हापुरात प्रवेशास बंदी आहे. तर एस.टी.महामंडळाच्या बसेसनाही प्रवाशांनी आरटीपीसीआर केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

पुन्हा जोर वाढला

जिल्ह्यातील एकूण आगार - १२

एकूण बसेस -७००

सध्या सुरू असलेल्या बसेस - ४५०

रोज एकूण फेऱ्या - १३००

तोटा वाढला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने पहिल्या काही दिवसांत सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला. त्यानंतर एस.टी. बसेसची सेवाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सुरू ठेवली. यात सर्वसामान्यांना प्रवासास बंदी घालण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर विभागाला सुमारे रोज १५ लाखांचा तोटा झाला. मात्र, हा तोटा सध्या भरून काढण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या गावांमध्ये एस.टी. बसेसची सेवा बंद करण्यात आली होती, ती पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

दुसऱ्या राज्यातील बसेस अजूनही बंदच

कर्नाटकातून येणाऱ्या कर्नाटक महामंडळाचा बसेस कोल्हापुरात येत नाहीत. तर एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे बसेस निपाणी, संकेश्वर, बेळगाव, हुबळी, धारवाड आदी ठिकाणी जात नाहीत. दोन्ही बाजूंनी तपासणी नाक्यांवर प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय राज्यांच्या हद्दीत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कर्नाटकसह गोवा राज्यातून येणाऱ्या कदबाच्या बसेसही बंद आहेत.

बंद फेऱ्या पुन्हा सुरू

बारा तालुक्यांतील सर्वच अंतर्गत ग्रामीण गावे पुन्हा एस.टी. बसेसनी जोडली गेली आहेत. त्यामुळे आजरा, चंदगड, शाहूवाडी, मुरगुड, गारगोटी, राधानगरी आदी भागातील अंतर्गत गावांमध्ये पुन्हा एस.टी.ची सेवा पूर्ववत होऊ लागली आहे. बसेस तुडुंब भरत नसल्या तरी नियमित प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वी केवळ तालुकास्तरावरच बससेवा सुरू होती. दररोज १३०० फेऱ्या होत आहेत.

मुंबई, पुणे मार्गावरही सकारात्मक प्रतिसाद

देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही राज्य शासनाने कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सरकारी कामाकरिता जाणाऱ्या प्रवाशांनीही मुंबई, पुणेकडे पाठ फिरवली होती. या भागातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने तेथीलही निर्बंध शिथिल केले. त्यामुळे तेथील व्यावसायिकांनी आपल्या आस्थापना सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे दिवसभरात कोल्हापुरातील विविध आगारांतून ५० बसेस या मार्गावर सोडल्या जातात. विशेष म्हणजे केवळ एकच रेल्वे मुंबई मार्गावर सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एक तर खासगी किंवा एस.टी.च्या बसेसकडे वाढला आहे.