शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसचे चाक पुन्हा रुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोविड-१९ मुळे एप्रिल २०२० मध्ये बंद झालेली खासगी बस वाहतूक काहीअंशी सुरळीत होऊ लागली होती. तोपर्यंत पुन्हा ...

कोल्हापूर : कोविड-१९ मुळे एप्रिल २०२० मध्ये बंद झालेली खासगी बस वाहतूक काहीअंशी सुरळीत होऊ लागली होती. तोपर्यंत पुन्हा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे खासगी बस वाहतूकदार पुन्हा अडचणीत आले आहेत. याशिवाय बँकांचे हप्ते तटल्यामुळे बँकांचे अधिकारी वसुलीसाठी दारात येऊ लागल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. एकूणच काय, खासगी बसचे चाक खोलवर पुन्हा रुतले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ३५० पैकी १८५ बसेसच रस्त्यावर धावत आहेत. अन्य बस मालकांनी डिझेल दरवाढीमुळे व प्रवासीच नसल्यामुळे बस अक्षरश: दारात उभी केली आहे.

मागील वर्षी २५ मार्चनंतर प्रथम रेल्वे त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद झाली. त्यानंतर खासगी बसेसही हळूहळू बंद होऊ लागल्या. कोरोनाचा संसर्ग जसा वाढू लागला, तसे लाॅकडाऊन आणि प्रवासी वाहतुकीला निर्बंध आले. त्यामुळे सरकारने खासगी बसेसनाही प्रवासी वाहतुकीस बंदी घातली. ही बंदी तब्बल ७ महिने लागू होती. या काळात खासगी बसेस मालकांचे बँकांचे हप्ते, चालक व अन्य कर्मचाऱ्यांचा पगार अंगावर बसला. एनकेन प्रकारे बसेस मालकांनीही हा खर्च उधार-उसनवार करीत निभावून नेला. बसेस रस्त्यावर पूर्ण क्षमतेने येण्यास जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडला. कोल्हापुरातही पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने येऊ लागले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागला. त्यामुळे पुन्हा सरकारने निर्बंध आणण्यास सुरुवात केली. त्यात भर म्हणून गेल्या काही महिन्यांपासून डिझेलमध्ये झालेल्या भरमसाट वाढीमुळे प्रवासी संख्याही घटली आहे. मार्च महिना असल्यामुळे थकलेले हप्ते भरण्यासाठी बँकांचाही लकडा बसेस मालकांच्या मागे लागला आहे. एका बाजूने व्यवसाय नाही, प्रवासी संख्या घटली आणि त्यात बँकांनीही वसुलीचा तगादा लावल्याने बस मालक अक्षरश: कात्रीत सापडले आहेत. काही बसेस मालक इतके अडचणीत आलेत की, त्यांना दैनंदिन खर्च चालविणेही अवघड झाले आहे. त्यांनी आपल्या बसेस दारात उभ्या करणेच पसंत केले आहे. कारण मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर मार्गावर प्रवासी संख्या घटली आहे. या मार्गावर किमान ४० प्रवासी असतील तरच डिझेल, चालक, वाहक पगार निघतो. त्यातून काहीअंशी दुरुस्ती देखभाल खर्च निघतो. मात्र, या मार्गावर प्रवासी संख्याच घटल्यामुळे बसेस कोणत्या आणि कशा पद्धतीने चालवायच्या, असा प्रश्न बस मालकांच्या पुढे उभा आहे.

बसेस संख्या अशी...

- कोरोनाआधी बाहेर जाणाऱ्या मार्गावर ३५० बसेस धावत होत्या.

- कोरोनानंतर सध्या १८५ बसेस या मार्गावर धावत आहेत.

चौकट

गेल्या नऊ महिन्यानंतर खासगी बसेस पूर्ण क्षमतेने पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, गोवा, बंगलोर, अहमदाबाद, हैदराबाद आदी मार्गावर धावत होत्या. त्यात डिझेल दरवाढ आणि कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे. त्यामुळे काही बसेस मालकांनी खर्चाचाच ताळमेळ बसेना म्हणून तब्बल १६५ बसेस दारातच उभ्या केल्या आहेत. याशिवाय बँकेचे हप्ते तटल्यामुळे बँकांनीही मार्च महिन्याची वसुली करण्याचा तगादा लावला आहे. थेट जप्तीचा मार्ग अवलंबल्यामुळे बसमालक हवालदिल झाले आहेत. सरकारने इतर राज्यांप्रमाणे टोल, कर निम्म्यावर आणावेत, जेणेकरून बसमालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा या व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

कोट

कोरोनामुळे आधीच हा व्यवसाय घाईला आला आहे. त्यात डिझेल दरवाढ आणि बँकांनीही थेट वसुलीसाठी जप्तीचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे व्यवसाय नसल्याने हवालदिल झालेला बसमालक आणखीनच धास्तावला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप करून बस मालकांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे बसमालकांनीही आत्महत्या केली, तर आश्चर्य वाटायला नको.

- सतीशचंद्र कांबळे,

अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा खासगी आराम बस मालक संघटना.

प्रतिक्रिया

काहीअंशी रुळावर येणारी बससेवा पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्यामुळे अडचणीत आली आहे. त्यात बँकांची वसुली आणि प्रवासी संख्या घटल्यामुळे ताळमेळ कसा बसवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सरकारने इतर राज्यांप्रमाणे करासह टोलमध्ये माफी द्यावी.

- गौरव कुसाळे, ट्रॅव्हल्स मालक.

प्रतिक्रिया...

कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात डिझेल दरवाढ आणि बँकांची जप्ती यामुळे खासगी बसमालक अक्षरश: कोलमडून गेला आहे. यावर सरकारने काही तरी उपाय काढावा. अन्यथा हा व्यवसाय कोलमडेल आणि बेरोजगारीतही वाढ होईल.

- रियाज मुजावर, ट्रॅव्हल्स मालक.