शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

चिकोत्रा खोऱ्यात गव्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:09 AM

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई ...

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई करण्यात आलेल्या हत्ती प्रतिबंधक चरीही पूर्ण बुुजल्या असल्याने गवे थेट शिवारात वावरू लागले आहेत. अरण्यक्षेत्राजवळील अनेक शेतपिके गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत.परिसरातील मानवळे, तोंदलेवाडी, केळेवाडी, मुरुक्टे, गोतेवाडी, भांडेबांबर, बारवे, दिंडेवाडी, बेगवडे, बेडीव, आदी गावांमध्ये गव्यांचा मोठा उपद्रव सुरू आहे. शिवारात सध्या वरणा, तूर, शाळू पिके फुलोºयात आली असून, रानगवे नुकसान करू लागल्यामुळे शेतकºयांना रात्री शेताची राखण करावी लागत आहे.महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने १२ वर्षांपूर्वी मुरुक्टे, मानवळे, गोतेवाडी गावांजवळील वनहद्दीजवळून खोल हत्ती प्रतिबंधक चरींची खोदाई केली होती. यामुळे या परिसरात रानगवे फारसे येत नव्हते. गेली १२ वर्षे सतत पावसाने चरींची धूप होऊन खोली कमी झाली. गाळाने भरत गेलेल्या चरी अखेर पूर्ण भरून गेल्या. परिणामी, या अरण्यक्षेत्राजवळील गाव शिवारात रानगव्यांचा वावर वाढला आहे.पाणी उपलब्ध असूनही काही शेतकºयांनी गेली चार वर्षे ऊसपीक गव्यांच्या उपद्रव्यास कंटाळून बंद केले आहे. या परिसरातील गावांमध्ये वरणा पिकाचे क्षेत्र जास्त होते. मात्र, रानगव्यांचे वरणा हे पीक चारा म्हणून आवडते पीक असल्यामुळे या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. परिणामी, शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.रात्री शेतावर मुक्कामी थांबणे शेतकºयांना धोकादायक वाटू लागले आहे. पाच वर्षांपूर्वी केळेवाडी (ता. भुदरगड) येथील शेतातमशागत कामात मग्न असलेलेनिवृत्त शिक्षक बापू सखाराम शिऊडकर यांचा गव्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. आजहीअनेक शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्री शेतपिकाची राखण करतात. वनविभागामार्फतनुकसान झालेल्या पीक क्षेत्राची पाहणी करून जी भरपाई दिली जाते ती अत्यल्प असल्याचे शेतकºयांनी सांगितले. अरण्यक्षेत्राभोवती पुन्हा नव्याने चरींची खोदाई होणे आवश्यक आहे. अरण्यक्षेत्राजवळील हद्दीवर सोलर कुंपन, खोल चर खोदाई, नुकसान झालेल्या पिकांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अरण्यक्षेत्राजवळील शेतकरी शासनाकडे करीत आहेत.