शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा खोऱ्यात गव्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:09 IST

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई ...

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई करण्यात आलेल्या हत्ती प्रतिबंधक चरीही पूर्ण बुुजल्या असल्याने गवे थेट शिवारात वावरू लागले आहेत. अरण्यक्षेत्राजवळील अनेक शेतपिके गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत.परिसरातील मानवळे, तोंदलेवाडी, केळेवाडी, मुरुक्टे, गोतेवाडी, भांडेबांबर, बारवे, दिंडेवाडी, बेगवडे, बेडीव, आदी गावांमध्ये गव्यांचा मोठा उपद्रव सुरू आहे. शिवारात सध्या वरणा, तूर, शाळू पिके फुलोºयात आली असून, रानगवे नुकसान करू लागल्यामुळे शेतकºयांना रात्री शेताची राखण करावी लागत आहे.महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने १२ वर्षांपूर्वी मुरुक्टे, मानवळे, गोतेवाडी गावांजवळील वनहद्दीजवळून खोल हत्ती प्रतिबंधक चरींची खोदाई केली होती. यामुळे या परिसरात रानगवे फारसे येत नव्हते. गेली १२ वर्षे सतत पावसाने चरींची धूप होऊन खोली कमी झाली. गाळाने भरत गेलेल्या चरी अखेर पूर्ण भरून गेल्या. परिणामी, या अरण्यक्षेत्राजवळील गाव शिवारात रानगव्यांचा वावर वाढला आहे.पाणी उपलब्ध असूनही काही शेतकºयांनी गेली चार वर्षे ऊसपीक गव्यांच्या उपद्रव्यास कंटाळून बंद केले आहे. या परिसरातील गावांमध्ये वरणा पिकाचे क्षेत्र जास्त होते. मात्र, रानगव्यांचे वरणा हे पीक चारा म्हणून आवडते पीक असल्यामुळे या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. परिणामी, शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.रात्री शेतावर मुक्कामी थांबणे शेतकºयांना धोकादायक वाटू लागले आहे. पाच वर्षांपूर्वी केळेवाडी (ता. भुदरगड) येथील शेतातमशागत कामात मग्न असलेलेनिवृत्त शिक्षक बापू सखाराम शिऊडकर यांचा गव्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. आजहीअनेक शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्री शेतपिकाची राखण करतात. वनविभागामार्फतनुकसान झालेल्या पीक क्षेत्राची पाहणी करून जी भरपाई दिली जाते ती अत्यल्प असल्याचे शेतकºयांनी सांगितले. अरण्यक्षेत्राभोवती पुन्हा नव्याने चरींची खोदाई होणे आवश्यक आहे. अरण्यक्षेत्राजवळील हद्दीवर सोलर कुंपन, खोल चर खोदाई, नुकसान झालेल्या पिकांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अरण्यक्षेत्राजवळील शेतकरी शासनाकडे करीत आहेत.