शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा खोऱ्यात गव्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:09 IST

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई ...

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई करण्यात आलेल्या हत्ती प्रतिबंधक चरीही पूर्ण बुुजल्या असल्याने गवे थेट शिवारात वावरू लागले आहेत. अरण्यक्षेत्राजवळील अनेक शेतपिके गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत.परिसरातील मानवळे, तोंदलेवाडी, केळेवाडी, मुरुक्टे, गोतेवाडी, भांडेबांबर, बारवे, दिंडेवाडी, बेगवडे, बेडीव, आदी गावांमध्ये गव्यांचा मोठा उपद्रव सुरू आहे. शिवारात सध्या वरणा, तूर, शाळू पिके फुलोºयात आली असून, रानगवे नुकसान करू लागल्यामुळे शेतकºयांना रात्री शेताची राखण करावी लागत आहे.महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने १२ वर्षांपूर्वी मुरुक्टे, मानवळे, गोतेवाडी गावांजवळील वनहद्दीजवळून खोल हत्ती प्रतिबंधक चरींची खोदाई केली होती. यामुळे या परिसरात रानगवे फारसे येत नव्हते. गेली १२ वर्षे सतत पावसाने चरींची धूप होऊन खोली कमी झाली. गाळाने भरत गेलेल्या चरी अखेर पूर्ण भरून गेल्या. परिणामी, या अरण्यक्षेत्राजवळील गाव शिवारात रानगव्यांचा वावर वाढला आहे.पाणी उपलब्ध असूनही काही शेतकºयांनी गेली चार वर्षे ऊसपीक गव्यांच्या उपद्रव्यास कंटाळून बंद केले आहे. या परिसरातील गावांमध्ये वरणा पिकाचे क्षेत्र जास्त होते. मात्र, रानगव्यांचे वरणा हे पीक चारा म्हणून आवडते पीक असल्यामुळे या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. परिणामी, शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.रात्री शेतावर मुक्कामी थांबणे शेतकºयांना धोकादायक वाटू लागले आहे. पाच वर्षांपूर्वी केळेवाडी (ता. भुदरगड) येथील शेतातमशागत कामात मग्न असलेलेनिवृत्त शिक्षक बापू सखाराम शिऊडकर यांचा गव्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. आजहीअनेक शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्री शेतपिकाची राखण करतात. वनविभागामार्फतनुकसान झालेल्या पीक क्षेत्राची पाहणी करून जी भरपाई दिली जाते ती अत्यल्प असल्याचे शेतकºयांनी सांगितले. अरण्यक्षेत्राभोवती पुन्हा नव्याने चरींची खोदाई होणे आवश्यक आहे. अरण्यक्षेत्राजवळील हद्दीवर सोलर कुंपन, खोल चर खोदाई, नुकसान झालेल्या पिकांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अरण्यक्षेत्राजवळील शेतकरी शासनाकडे करीत आहेत.