शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

प्राध्यापकांच्या संपात विद्यार्थ्यांचा ‘बळी’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:42 IST

कोल्हापूर : आम्ही वेळेत शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क भरले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा पंधरा दिवसांवर आली आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत आम्ही कुणाकडे दाद मागायची? प्राध्यापक आणि राज्य शासन यांच्यामध्ये आमचे शैक्षणिक नुकसान का करता? असा सवाल कोल्हापुरातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतून उपस्थित केला जात आहे. प्राध्यापकांच्या काम बंद आंदोलनप्रश्नी ...

कोल्हापूर : आम्ही वेळेत शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क भरले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा पंधरा दिवसांवर आली आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत आम्ही कुणाकडे दाद मागायची? प्राध्यापक आणि राज्य शासन यांच्यामध्ये आमचे शैक्षणिक नुकसान का करता? असा सवाल कोल्हापुरातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतून उपस्थित केला जात आहे. प्राध्यापकांच्या काम बंद आंदोलनप्रश्नी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा. आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.गेल्या बारा दिवसांपासून प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात कायम आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापक (सीएचबी) सहभागी झाल्याने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांतील शिकविणे बंद झाले आहे. या आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या.महावीर महाविद्यालयात बी. ए. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारी सुप्रिया जाधव म्हणाली, या आंदोलनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना एकप्रकारे सुट्टी मिळाली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर तास होत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे आंदोलन थांबविण्यासाठी प्राध्यापकांच्या मागण्यांची सरकारने लवकर पूर्तता करावी. मेघा दोरकर म्हणाली, उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीच्या अनुषंगाने असलेल्या मागण्या घेऊन प्राध्यापकांचे सुरू असलेले आंदोलन योग्य आहे पण या आंदोलनामुळे युवा महोत्सव लांबणीवर पडला आहे. त्याच्या तयारीत अनेक विद्यार्थी कलाकारांनी पाच-सहा महिने व्यतीत केले आहेत.पहिल्या सत्रातील परीक्षा जवळ आल्या आहेत. एकूणच विद्यार्थिहित लक्षात घेऊन हे आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने मार्ग काढणे आवश्यक आहे.विवेकानंद महाविद्यालयातील बी. ए. भाग तीनमधील राजू शेख म्हणाला, या आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. सरकारने प्राध्यापकांच्या संघटनेशी चर्चा करून मागण्यांची पूर्तता करावी. शिक्षणावरील खर्चामध्ये सरकारने वाढ करावी.शिवप्रसाद शेवाळे म्हणाला, तोंडावर आलेल्या परीक्षा लक्षात घेऊन सरकारने या आंदोलनाबाबत तोडगा काढावा. आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सरकार आणि प्राध्यापक संघटनांनी घ्यावी.शहाजी कॉलेजमध्ये बी. ए. भाग तीनचा विद्यार्थी राजवर्धन बिरंजे म्हणाला, राज्य शासन आणि महाविद्यालयाच्या नियमानुसार आम्ही शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क वेळेत भरले आहे. सतरा दिवसांवर पहिल्या सत्रातील परीक्षा आली आहे.विविध विषयांचा अजून २० टक्के अभ्यासक्रम शिकविणे बाकी आहे. या आंदोलनाच्या स्थितीत आम्ही कुणाकडे दाद मागायची? हे आंदोलन लवकरात लवकर मिटावे. प्राध्यापक संघटना आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये.काही ठिकाणी ‘सीएचबी’ प्राध्यापकांचा आधारकाही महाविद्यालयांत ‘सीएचबी’धारक प्राध्यापक तास घेत असल्याने आगामी परीक्षेच्या तोंडावर तेथील विद्यार्थ्यांना त्यांचा काहीसा आधार मिळत आहे.मात्र, या ‘सीएचबी’धारक प्राध्यापकांना तास घेण्यात काही मर्यादा येत आहेत.कायम आणि ‘सीएचबी’धारक प्राध्यापक आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना तास होत नसल्याने सुट्टी मिळाली आहे.