शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘पंचायत राज समिती’ची उपयुक्तता उरलीय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:51 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांमध्ये ‘पीआरसी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची ही २८ आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप का उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांमध्ये ‘पीआरसी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची ही २८ आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप का उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नसतो. अनेकांच्या खिशाला या सर्व प्रक्रियेमध्ये किती चाट लागली, याचाही पत्ता नसतो. चार वर्षांपूर्वीच्या कामाचा हिशेब मागणाºया या समितीची खरोखरच उपयुक्तता उरली आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतआहे.राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, कोल्हापूर, जालना, रायगड, नागपूर, नंदुरबार, ठाणे, पालघर, अहमदनगर या जिल्हा परिषदांना ही समिती सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यांत भेटी देणार आहे. आमदारांचा समावेश असलेल्या या समितीला विधानमंडळाचे सर्व अधिकार प्राप्त असतात. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची वेगळी प्रश्नावली तयार केली जाते. याची उत्तरे शोधण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभागांकडून सुट्यांच्या दिवशीही काम करीत, चार-पाच वर्षांपूर्वीच्या फायली उपसल्या जातात आणि माहिती जमा केली जाते.चार वर्षांपूर्वीचा हिशेब आता कशासाठी?एकीकडे जिल्हा परिषदेचे अंतर्गत आॅडिट होते, लोकल फंडाचे आॅडिट होते, अकौंटंट जनरल आॅफ इंडिया यांच्याकडून आॅडिट होते. विषय समितींमध्ये विषय चर्चेचा येऊन तो स्थायी सभेत जातो. तेथे मंजूर होऊन सर्वसाधारण सभेत मांडला जातो. तिथे सत्तारूढ आणि विरोधक यांच्या चर्चेतून त्या विषयाला मंजुरी मिळते आणि मग खर्च होतो.राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला अध्यक्ष जिल्हा परिषदेत असताना, आयएएस अधिकारी या संस्थेचा प्रशासनाचा प्रमुख असताना, पुन्हा चार वर्षांपूर्वीचा हिशेब मांडायची खरोखरच गरज आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.मूळ हेतू काय?या समितीने पंचायत राज व्यवस्थेत येणाºया अडचणींचा अभ्यास करावा, त्यातून समाजाच्या हिताचे मुद्दे मांडले जावेत आणि त्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात असा हेतू आहे; परंतु अनेक वेळा या समितीचा दौरा हा बैठकीतील कामकाजापेक्षा अवांतर मुद्द्यांनी आणि होणाºया खर्चामुळेच चर्चेत येत असल्याचे वास्तव आहे.