शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचायत राज समिती’ची उपयुक्तता उरलीय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:51 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांमध्ये ‘पीआरसी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची ही २८ आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप का उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांमध्ये ‘पीआरसी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाची ही २८ आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप का उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नसतो. अनेकांच्या खिशाला या सर्व प्रक्रियेमध्ये किती चाट लागली, याचाही पत्ता नसतो. चार वर्षांपूर्वीच्या कामाचा हिशेब मागणाºया या समितीची खरोखरच उपयुक्तता उरली आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतआहे.राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, कोल्हापूर, जालना, रायगड, नागपूर, नंदुरबार, ठाणे, पालघर, अहमदनगर या जिल्हा परिषदांना ही समिती सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यांत भेटी देणार आहे. आमदारांचा समावेश असलेल्या या समितीला विधानमंडळाचे सर्व अधिकार प्राप्त असतात. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची वेगळी प्रश्नावली तयार केली जाते. याची उत्तरे शोधण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभागांकडून सुट्यांच्या दिवशीही काम करीत, चार-पाच वर्षांपूर्वीच्या फायली उपसल्या जातात आणि माहिती जमा केली जाते.चार वर्षांपूर्वीचा हिशेब आता कशासाठी?एकीकडे जिल्हा परिषदेचे अंतर्गत आॅडिट होते, लोकल फंडाचे आॅडिट होते, अकौंटंट जनरल आॅफ इंडिया यांच्याकडून आॅडिट होते. विषय समितींमध्ये विषय चर्चेचा येऊन तो स्थायी सभेत जातो. तेथे मंजूर होऊन सर्वसाधारण सभेत मांडला जातो. तिथे सत्तारूढ आणि विरोधक यांच्या चर्चेतून त्या विषयाला मंजुरी मिळते आणि मग खर्च होतो.राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला अध्यक्ष जिल्हा परिषदेत असताना, आयएएस अधिकारी या संस्थेचा प्रशासनाचा प्रमुख असताना, पुन्हा चार वर्षांपूर्वीचा हिशेब मांडायची खरोखरच गरज आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.मूळ हेतू काय?या समितीने पंचायत राज व्यवस्थेत येणाºया अडचणींचा अभ्यास करावा, त्यातून समाजाच्या हिताचे मुद्दे मांडले जावेत आणि त्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात असा हेतू आहे; परंतु अनेक वेळा या समितीचा दौरा हा बैठकीतील कामकाजापेक्षा अवांतर मुद्द्यांनी आणि होणाºया खर्चामुळेच चर्चेत येत असल्याचे वास्तव आहे.