शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वबळ’ म्हणजे काय रे भाऊ ?

By admin | Updated: December 22, 2016 23:46 IST

कार्यकर्त्यांना प्रश्न : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका

ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजरानगरपंचायतीचे वादळ शमते न शमते तोच आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपची नेतेमंडळी या निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार अशी भीमगर्जना करू लागले आहेत. सुरुवातीला स्वबळाची भाषा व शेवट आघाडी, स्थानिक आघाडी, महाआघाडी, युती असाच होत असल्याने कार्यकर्त्यांना आता ‘स्वबळ’ म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न विचारावा लागत आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जागावाटपात दबाव निर्माण करण्यासाठी प्रमुख पक्षांची नेतेमंडळी ‘स्वबळावर’ निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा करीत आहेत. प्रथम स्वबळाची भाषा त्यानंतर ज्या पक्षासोबत निवडणुकीला सामोरे जायचे त्या पक्षासोबत वाटाघाटीच्या फेऱ्या, ताणाताणी आणि शेवटी एखाद्या ठिकाणी ‘मैत्रिपूर्ण’ लढतीचे गोंडस नाव देऊन इतरत्र आघाडी प्रमुखांचा गळ्यात गळे घालून, हात उंचावून विजयाची खूण करीत दिसणारी छायाचित्रे, असा प्रकार वारंवार जिल्हा, गावपातळीपासून अनुभवताना दिसतो आहे.स्वबळाच्या भाषेत जोर असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेटाने कामाला लागतात. यामुळे अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसतो. हा संघर्ष अगदी शिवीगाळ, मारामारी, बाचाबाची असा होऊन पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत कधी गेला, हे कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत नाही. काही कार्यकर्त्यांना ज्या पक्षासाठी अथवा संघटनेसाठी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागतात. त्यापैकी वरिष्ठ नेत्यांच्या तडजोडीमुळे अनेक पक्ष, संघटन यांची चिन्हेदेखील गायब होताना दिसतात.