शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

तज्ज्ञांना रुग्णाच्या हितासाठी पाचारण करण्यात गैर काय आहे..?

By admin | Updated: January 7, 2015 00:07 IST

आपल्याच स्पेशालिटीचा अहंकार न बाळगता इतर शास्त्रांतील

सिटी टॉकआरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अधिकार विशेष करून वैद्यकीय व्यावसायिकांस आहे, ही भूमिका ठेवून ‘लोकमत’ने मला लिहिण्याची संधी दिली असावी. सुमारे २५ वर्षांपूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना रूढ होती. फॅमिली डॉक्टर हा त्या घरचा मायबाप जणू. आरोग्याचे तर सोडाच; पण घरातील मुला-मुलीच्या लग्नाची निश्चिती ही त्याच्या विचाराने व्हायची. त्या घरातील प्रत्येक बाबतीतील नर्स फॅमिली डॉक्टरला माहीत असायची. डॉक्टरला ज्याप्रमाणात विश्वास मिळतो, त्याच्या कितीतरी पट विश्वासाने फॅमिली डॉक्टरला काम करावे लागायचे. त्यामुळे पूर्वीचा रुग्ण आजच्यासारखा गोंधळलेला अवस्थेत नसायचा. शांतपणे अनारोग्य तसेच इतर संकटांवर हसतखेळत मात करायचा. आज वैद्यकीय तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात विकसित होत आहे. स्पेशालिटी तसेच सुपर स्पेशालिटीचा जमाना आहे. वाढती लोकसंख्या, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, लैंगिक समस्यांमुळे तसेच त्यावरील उपचारांमुळे उदा. बाजारात येणाऱ्या नवनवीन प्रतिजैविकेच्या दुष्परिणामांमुळे होणारे किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर सारखे आजार उद्भवतात. गेल्या पन्नास वर्षांत कॅन्सर, हृदयरोगासारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पटलावर इबोला आजाराचे जीवघेणे तांडव होण्याची शक्यता आहे. या सर्व जुन्या तसेच नवीन रोगांचे निदान होण्यासाठी खर्चिक चाचण्या सामान्य, गरीब रुग्णांच्या कुवतीबाहेरच्या आहेत. आजच्या घडीला स्पेशालिटी, सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल ही काळाची गरज आहे; पण मला असे वाटते की, या सर्व सोयी रुग्णांच्या दृष्टीने दुधारी शस्त्रच आहेत. अतिदक्षता विभाग जरूर हवा; पण आजारातून बाहेर पडू पाहणारा रुग्ण त्या विभागात प्रवेश घेतल्यानंतर जास्त आजारी पडला, असे होता कामा नये. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या नियतकालिकाने अशी टीका केली आहे की, पंचतारांकित रोगचिकित्सा केंद्रात माणूस चालत जातो आणि रुग्ण होऊन बाहेर पडतो. अतिदक्षता विभागामध्ये जर एखाद्या रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला, तर तेथील तज्ज्ञाने आपल्याच स्पेशालिटीचा अहंकार न बाळगता इतर शास्त्रांतील तज्ज्ञांना रुग्णाच्या हितासाठी पाचारण करण्यात गैर काय आहे..?माझे एक रुग्ण सुदाम कुरणे यांना तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. येथील हृदयरोग हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर योग्य उपचार झाले. त्यामुळे त्यांना त्वरित आराम मिळाला; पण त्याच्याच दुसरे दिवशी त्यांची किडनी अकार्यक्षम झाली. रुग्णालयाने किडनी तज्ज्ञांना पाचारण करण्याचे ठरविले. तत्पूर्वी रुग्णांच्या चिरंजीवाने होमिओपॅथिक औषध देऊन पाहूया, असे सुचविले. तज्ज्ञाने मान्यता दिल्याने होमिओपॅथिक औषधाने त्याच दिवशी किडनीची कार्यक्षमता सुधारली व रिपोर्ट नॉर्मल आले.सुमारे महिन्यापूर्वी इचलकरंजीमधील जिभेचा कॅन्सरग्रस्त पती आणि त्यांच्या स्त्री-रोग तज्ज्ञ माझ्याकडे कॅन्सरच्या वेदना शमत नाहीत म्हणून आल्या. त्यांना लवकरच गुण आला, की जो अ‍ॅलोपॅथिक वेदनाशामक इंजेक्शनमुळेही आला नाही. तेव्हा अशा असाध्य रोगामध्ये होमिओपॅथी कशी काम करते याची त्यांनी जिज्ञासा व्यक्त केली. याचाच अर्थ डॉक्टरांनासुद्धा आपल्या शास्त्राशिवाय दुसऱ्या शास्त्रांची माहिती नसते. वैद्यकशास्त्राच्या प्रवेशापूर्वीच्या अभ्यासक्रमात विविध वैद्यक उपाययोजनांची ढोबळ माहिती दिली पाहिजे. जेणेकरून वैद्यकतज्ज्ञास आपले शास्त्र ज्या रोगात उपयुक्त नाही, त्यामध्ये इतर उपचार पद्धतीचा फायदा करून रुग्णाला रोगमुक्त करता येईल. प्रत्येकाने आजार होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. आजार वाट्याला आल्यास अंधश्रद्धेने एखाद्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आजाराची माहिती तसेच उपाययोजना जाणून घेणे गरजेचे नसून हक्काचे आहे. डॉक्टर हादेखील माणूस आहे. त्यांच्यापुढील व्यापामुळे त्यांच्या हातूनही अनवधानाने चुका होऊ शकतात. डॉक्टरांनीही सदैव सतर्क राहावे व रुग्णानेही सदैव जागृत राहावे, हा माझा नववर्षाच्या संदेश आहे. (लेखक कोल्हापुरातील प्रख्यात होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत.)