शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

...तर राज्यात सहकार खात्याची गरजच काय ? : सदाभाऊ खोत

By admin | Updated: December 13, 2014 00:16 IST

असा ‘घरचा आहेर’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता दिला

कोल्हापूर : ऊसदराचा विषय ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार यांच्यातीलच आहे, असे म्हणून सहकारमंत्री आपली बाजू झटकत असतील तर राज्यात सहकार खात्याची गरजच काय ? असा ‘घरचा आहेर’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सरकारविरोधातही आंदोलनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.खोत म्हणाले, साखर कारखान्यांनी नियमानुसार ‘एफआरपी’ देणे बंधनकारक आहे. त्यांनी पहिली उचल तातडीने न दिल्यास कारखान्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. आता कारखाने सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरीही ऊसदराचा पहिला हप्ता मिळाला नाही. साखरेवरील खरेदी कर रद्द केला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनेवर आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेतल्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. साखर कारखान्यांनी दर न दिल्यास त्यांच्यावर कारवाईचे अधिकार साखर सहसंचालकांना आहेत. परंतु ते जर कारखानदारांचेच हित पाहत असतील तर अशा कार्यालयाची येथे गरजच नाही. आम्ही कॉँग्रेस आघाडी सरकारला शेतकरीविरोधी धोरण घेतल्यामुळे धडा शिकविला.