शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

फडणवीस सरकारने काय दिवे लावले माहीत आहेत;चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:23 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.

ठळक मुद्देसत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावले? : विजय वडेट्टीवारसारथीला ५० कोटी दिले; ५०० कोटी दिल्यासारखे विरोधक वागतात

कोल्हापूर : सत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावलेत माहीत आहेत, असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवला असता, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.

कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. सारथीसाठी ५० कोटींचा निधी दिला असताना ५०० कोटींचा निधी दिल्यासारखे विरोधक वागत आहेत. कोकणातील चक्रीवादळाचा पंचनामा नाही, मदत नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचाही समाचार त्यांनी यावेळी घेतला.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) सुरू झाल्यानंतर सत्ता बदलली. मागील सरकारने केवळ ५० कोटींचा निधी दिला. आमची सत्ता आल्यानंतर आम्हीही ५० कोटी दिले.

अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांची तरतूद केली आणि आम्ही ती दिली नाही, असे झाले नाही. मात्र विरोधक नको त्या टीका करीत आहेत. आम्ही कुठेही कमी पडत नाही. कोरोनाच्या संकटात विरोधकांनी समजून घ्यावे. 

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्लीराज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवण्यात आला असता, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याबाबत आपले काय मत आहे, असे विचारल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले, दोन दिवसांचा कालावधीही त्यांना जास्त होईल, असे मला वाटते. ते दोन मिनिटांतच तो सोडवतील, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस