शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

फडणवीस सरकारने काय दिवे लावले माहीत आहेत;चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:23 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.

ठळक मुद्देसत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावले? : विजय वडेट्टीवारसारथीला ५० कोटी दिले; ५०० कोटी दिल्यासारखे विरोधक वागतात

कोल्हापूर : सत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावलेत माहीत आहेत, असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवला असता, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.

कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. सारथीसाठी ५० कोटींचा निधी दिला असताना ५०० कोटींचा निधी दिल्यासारखे विरोधक वागत आहेत. कोकणातील चक्रीवादळाचा पंचनामा नाही, मदत नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचाही समाचार त्यांनी यावेळी घेतला.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) सुरू झाल्यानंतर सत्ता बदलली. मागील सरकारने केवळ ५० कोटींचा निधी दिला. आमची सत्ता आल्यानंतर आम्हीही ५० कोटी दिले.

अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांची तरतूद केली आणि आम्ही ती दिली नाही, असे झाले नाही. मात्र विरोधक नको त्या टीका करीत आहेत. आम्ही कुठेही कमी पडत नाही. कोरोनाच्या संकटात विरोधकांनी समजून घ्यावे. 

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्लीराज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवण्यात आला असता, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याबाबत आपले काय मत आहे, असे विचारल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले, दोन दिवसांचा कालावधीही त्यांना जास्त होईल, असे मला वाटते. ते दोन मिनिटांतच तो सोडवतील, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस