शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शिवसेनेची ही कसली मैत्री?

By admin | Updated: August 21, 2014 00:51 IST

राजू शेट्टी यांचा सवाल : कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय, महायुतीत तणाव

विश्वास पाटील - कोल्हापूर -ज्या माजी आमदारांने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास उघड विरोध केला, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पायघड्या घालत असेल तर शिवसेनेचे हे राजकारण न समजणारे आहे. शिवसेनेचा हा घटक पक्षांसोबत कसला व्यवहार आणि ही कसली मैत्री, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे खासदार शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घडामोडींमुळे महायुतीमध्ये जागावाटपाआधीच तणाव निर्माण झाला आहे.शाहूवाडी मतदारसंघातील पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या पुढाकाराने सरुड (ता.शाहूवाडी) येथे होत असलेल्या मेळाव्यासाठी ठाकरे उद्या (गुरुवारी) कोल्हापुरातयेत आहेत. सरुडकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते खासदार शेट्टी यांच्याविरोधात काम केले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा दिला होता. त्यावरून शेट्टी व शिवसेना यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेने सत्यजित पाटील यांना उमेदवारी देवू नये, अशी उघड भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. शाहूवाडी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेस द्यावा व त्यापक्षातर्फे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्याविरोधात संघटनेचे लढाऊ नेते सदाभाऊ खोत किंवा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांना रिंगणात उतरण्याची ‘स्वाभिमानी’ची तयारी आहे.  या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी म्हणाले,‘माझ्या मतदारसंघात शिवसेना कार्यक्रम घेत असेल व आम्हांला त्याबद्दल अजिबातच विश्वासात घेतले जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. त्याबद्दल मी आज संपर्कनेते दिवाकर रावते यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहे. शिवसेनेने कुणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा अधिकार आहे. परंतु ज्यांनी आम्हांला लोकसभेला थेट विरोध केला, त्यांनाच तुम्ही उमेदवारी देणार असाल तर संघटनेचे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. यांनी काँग्रेस सत्तेत असताना लुटमार केली तेच लोक आता काँग्रेसचे जहाज बुडायला लागल्यावर महायुतीत यायला रांग लागली आहे. अशा लोकांना घेतल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. याचा शिवसेना नेतृत्वाने विचार करावा, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे.