शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पी.एन.’नी काय उजेड पाडला

By admin | Updated: January 17, 2017 00:30 IST

धैर्यशील पाटील, पवार यांचा पलटवार : पारदर्शकतेमुळेच ‘भोगावती’ कर्जमुक्तीकडे

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार केल्यामुळेच भोगावती साखर कारखाना कर्जमुक्तीकडे चालला आहे; पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी वीस वर्षे सत्ता असताना पी.एन. पाटील यांनी काय उजेड पाडला, सूज्ञ सभासदांना माहिती आहे, असा पलटवार परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर व माजी उपाध्यक्ष अशोक पवार-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत कॉँग्रेसवर केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमुळे कारखाना मोडला’ अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांनी रविवारी परिते येथील मेळाव्यात केली होती. त्यावर राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल व आमदार चंद्रदीप नरके गटाच्यावतीने पत्रकार परिषदेत कॉँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. धैर्यशील पाटील म्हणाले, ‘भोगावती’ची सलग वीस वर्षे सत्ता कॉँग्रेसकडे होती. त्या काळात कारखाना ३५ कोटींच्या संचित तोट्यात, २८ कोटींचे कर्ज, २२ कोटींची देणी अशा आर्थिक अरिष्टात सापडला होता. सूज्ञ सभासदांनी परिवर्तन करून राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात कारखाना दिला. त्यानंतर संचित तोटा २९ कोटींनी कमी केला. कर्मचाऱ्यांचा सात महिन्यांचा पगार देऊन नियमित पगार देण्याचा प्रयत्न केला. सध्या कारखान्यावर १९ कोटींचे सॉफ्ट लोन तर तेवढेच गॅप लोन आहे. राज्यात पहिल्या पाचमध्ये आम्ही ऊस दर दिला आहे; पण विरोधक ४२५ कोटींचे कर्ज असल्याचा कांगावा करत सुटले आहेत. ‘टीआरएफ’ खरेदीत पुणे येथे झालेल्या ठेकेदाराच्या खुनाची चौकशी ‘सीआयडी’मार्फत करावी म्हणजे सर्व स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. नोकरभरती गरजेनुसारच केली आहे. त्यामुळे कारखान्यावर कोणताही अतिरिक्त भार पडलेला नाही. आमचा कारभार सभासदांनी बघितला आहे, सूज्ञ सभासद तुलना करून चांगलाच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीत ‘दादासाहेब पाटील-कौलवकर विकास आघाडी’ एकसंध आहे. भाजपसह आणखी काहीजण आमच्या संपर्कात असल्याचेही धैर्यशील पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे माजी संचालक उपस्थित होते. एका व्यासपीठावर येऊन आरोप करापाच वर्षांत आम्ही पारदर्शक कारभार केला म्हणूनच कारखाना वाचला, अन्यथा ‘दौलत’सारखी अवस्था झाली असती. विरोधाला विरोध करा पण चांगल्याला चांगले म्हणण्याची सवयही असावी. आरोपच करायचा असेल, तर एका व्यासपीठावर येऊन करावेत, आम्हीही वीस वर्षांचा पाढा वाचतो, असा इशारा अविनाश पाटील-राशिवडेकर यांनी दिला.