शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

ही कसली संचारबंदी, ही तर नुसतीच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

कोल्हापूर : महानगरपालिका आणि पोलीस पथकांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे संचारबंदी असताना शहराच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची गर्दी ...

कोल्हापूर : महानगरपालिका आणि पोलीस पथकांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे संचारबंदी असताना शहराच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची गर्दी वाढत आहे. सकाळी अकरा वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवली जात असली तरी काही ठिकाणी मागील बाजूने व्यवसाय होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दि. १६ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे, तर दि. १ मे पासून ती पुन्हा पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरवासीयांनी घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता चांगले सहकार्य केले; परंतु गेल्या दोन दिवसांपासून संचारबंदी काळातील नियमांचे उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे.

नागरिक रोज खरेदीच्या निमित्ताने सकाळी आठ वाजेपासूनच गर्दी करायला सुरुवात करतात. बाजारपेठा, भाजीमंडई येथे ही गर्दी झालेली दिसून येते. सकाळी अकरा वाजेनंतर शहरातील औषध दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवायचे आहेत; पण बारा, साडेबारा वाजले तरी व्यवहार सुरूच असतात. त्यामुळे नागरिकांची गर्दीही तोपर्यंत कायम असते. शिवाय पहिल्यासारखे वाहनधारकांना अडवून चौकशी केली जात नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहने यांची गर्दीही दुपारपर्यंत असते.

मंगळवारी लक्ष्मीपुरी, शिंगोशी मार्केट, महापालिका परिसर, राजारामपुरी या परिसरात नागरिकांनी खरेदीकरिता गर्दी केली होती. लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे कपडे, साड्या, दागिने खरेदी होत आहे. त्यामुळे काही ठराविक दुकाने मागील बाजूने ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊन पुढील दरवाजे बंद ठेवत आहेत. बंद दरवाजाआडून आतील व्यवसाय सुरूच आहेत.

शहराच्या अनेक भागांत संध्याकाळी तर अनेक नागरिक एकत्र जमून गप्पा मारत बसलेले पाहायला मिळतात. शहराच्या गावठाण भागातील अपवाद सोडला, तर उपनगरातील नागरिकांच्या संचारावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्याचा परिणाम उपनगरातील नागरिक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर पोलिसांचाही फारसा कडक पहारा दिसत नाही. त्यांची मोटारसायकल गस्तही कमी झाली आहे. त्यामुळेच नागरिकांचा संचार वाढत चालला आहे.

(सूचना - फोटो गर्दी कोळकेर तिकटी, गर्दी लक्ष्मीपुरी या नावाने पाहावेत.)