शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय ?

By admin | Updated: July 30, 2014 00:29 IST

दिलीप पाटील : टोलबाबत महायुतीचे नेते दुटप्पी

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामे केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार देण्याचे काम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असताना विरोधकांकडून त्यांना बदनाम करण्याचे षड््यंत्र सुरू आहे. कर्तृत्वशून्य विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय? असा सवाल कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला. टोलला जन्म देणारे महायुतीचे नेतेच टोल हद्दपार करण्याची भाषा करत आहेत, ही दुटप्पी भूमिका जनतेने ओळखल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन कसे करता येईल, हे कृतीने दाखवून दिले आहे. त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावली आहे. दुष्काळ निवारण, जलसंधारण, मराठा समाजाला आरक्षण, आदी भरीव कामे त्यांनी केली. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कॉँग्रेसने एन्रॉन प्रकल्प आणला; पण विरोधकांनी त्यात खोडा टाकला आणि पुन्हा सुरू केला. आता जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प मार्गी लावून राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही विरोध करून बंद पाडण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपची मंडळी करत आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांवर आरोप करण्याचे काम ही मंडळी करत आहे; पण पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.  टोल आकारणीचे काम देशात सर्वप्रथम चंद्राबाबू नायडू यांनी केले. ते सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबई-बंगलोर महामार्ग, मुंबईतील प्लायओव्हरवर प्रथम शिवसेना व भाजपनेच टोल लावला. ही टोल जन्माला घालणारी मंडळीच तो रद्द झाला पाहिजे, अशी वल्गना करत आहेत. ही दुटप्पीची टीकाही पाटील यांनी केली.