शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय ?

By admin | Updated: July 30, 2014 00:29 IST

दिलीप पाटील : टोलबाबत महायुतीचे नेते दुटप्पी

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामे केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार देण्याचे काम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असताना विरोधकांकडून त्यांना बदनाम करण्याचे षड््यंत्र सुरू आहे. कर्तृत्वशून्य विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीकेचा अधिकार काय? असा सवाल कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला. टोलला जन्म देणारे महायुतीचे नेतेच टोल हद्दपार करण्याची भाषा करत आहेत, ही दुटप्पी भूमिका जनतेने ओळखल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन कसे करता येईल, हे कृतीने दाखवून दिले आहे. त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावली आहे. दुष्काळ निवारण, जलसंधारण, मराठा समाजाला आरक्षण, आदी भरीव कामे त्यांनी केली. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कॉँग्रेसने एन्रॉन प्रकल्प आणला; पण विरोधकांनी त्यात खोडा टाकला आणि पुन्हा सुरू केला. आता जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प मार्गी लावून राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही विरोध करून बंद पाडण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपची मंडळी करत आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांवर आरोप करण्याचे काम ही मंडळी करत आहे; पण पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.  टोल आकारणीचे काम देशात सर्वप्रथम चंद्राबाबू नायडू यांनी केले. ते सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबई-बंगलोर महामार्ग, मुंबईतील प्लायओव्हरवर प्रथम शिवसेना व भाजपनेच टोल लावला. ही टोल जन्माला घालणारी मंडळीच तो रद्द झाला पाहिजे, अशी वल्गना करत आहेत. ही दुटप्पीची टीकाही पाटील यांनी केली.