शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात हव्यात मैत्रीपूर्ण लढती !

By admin | Updated: August 25, 2014 22:54 IST

बंडखोरांची ‘गळती’ रोखा : काँग्रेसच्या पाच जिल्हाध्यक्षांचा तातडीचा प्रस्ताव

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसमधून बाहेर पडून ‘महायुती’मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशीच परिस्थिती राहिली तर दोन्ही काँग्रेससाठी ते धोकादायक ठरणार असल्याचे लक्षात घेऊन नवा पर्याय पुढे आला आहे. दोन्ही पक्षांतून बाहेर पडणारी नेतेमंडळी रोखायची असेल, तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या, अशी एकमुखी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील पाच काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केल्याची माहिती आ. आनंदराव पाटील यांनी दिली.आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील १७४ मतदारसंघांत इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, या मुलाखतीदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात समाविष्ट असणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मैत्रिपूर्ण लढतींची मागणी केली आहे.वाढती नाराजी आणि इच्छुकांची वाढलेली संख्या, परिणामी सांगली, कोल्हापूर, पुणे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून दोन्ही काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साताऱ्यातही दोन्ही काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. ‘कोरेगावा’तून विजय कणसे यांनी शड्डू ठोकला आहे. ‘वाई’तून मदन भोसलेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा आहे. महाबळेश्वरच्या डी. एम. बावळेकर यांनी शिवबंधन बांधले. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून डॉ. अतुल भोसले यांनी भाजपमध्ये जावे म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. अनिल बाबर, अजित घोरपडे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. बाबर यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचे सहयोगी आ. सदाशिवराव पाटील, तर अजित घोरपडे यांच्या उमेदवारीमुळे मंत्री आर. आर. पाटील यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात संजय मंडलिक, संजय घाटगे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखविला आहे. परिणामी जिल्ह्यातील अन्य काही नेते ‘महायुती’च्या संपर्कात आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काँग्रेस, राष्ट्रवादीला जसा धोका निर्माण होऊ शकतो, तसा धोका अन्य जिल्ह्यांत होऊ नये यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली आहे. यातून जो विजयी होईल तो आपला, असेही सूत्र या मंडळींनी मांडले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी इच्छुकांच्या आज मुंबईत मुलाखतीसातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती उद्या, मंगळवारी दुपारी एक वाजता मुंबई येथे राष्ट्रवादी भवनात होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.