शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष

By admin | Updated: October 29, 2015 00:48 IST

हसन मुश्रीफ : फुलेवाडी येथे प्रचारसभा

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरचा टोल एक महिन्यात बंद करतो, असे सांगणारे आणि सत्तेवर येऊन एक वर्ष झालेल्या भाजप सरकारने अद्याप टोल का हटविला नाही, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली. मुश्रीफ म्हणाले, पैशाच्या जोरांवर आतापर्यंत महापालिकेत ताराराणी आघाडीने सत्ता आणली आणि गेल्या वीस वर्षांत महापालिकेचे वाटोळे केले. अशा आघाडीशी भाजपने युती केली आहे. या शहरात महायुतीची सत्ता आल्यास आणखी पंधरा वर्षे शहराचा विकास मागे जाईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यास सुरू केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनतेचे पाठबळ मिळत आहे म्हणूनच पक्षाला बदनाम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जात आहे; पण सुजाण जनता आमच्या पाठीशी राहील. यावेळी प्रा. जयंत पाटील म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक योजना आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणल्या. राष्ट्रवादीकडे विकासात्मक दृष्टिकोन असल्याने जनता आमच्याकडे सत्ता सोपवेल. यावेळी अजय कोराणे, राजेंद्र सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.