शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष

By admin | Updated: October 29, 2015 00:48 IST

हसन मुश्रीफ : फुलेवाडी येथे प्रचारसभा

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरचा टोल एक महिन्यात बंद करतो, असे सांगणारे आणि सत्तेवर येऊन एक वर्ष झालेल्या भाजप सरकारने अद्याप टोल का हटविला नाही, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली. मुश्रीफ म्हणाले, पैशाच्या जोरांवर आतापर्यंत महापालिकेत ताराराणी आघाडीने सत्ता आणली आणि गेल्या वीस वर्षांत महापालिकेचे वाटोळे केले. अशा आघाडीशी भाजपने युती केली आहे. या शहरात महायुतीची सत्ता आल्यास आणखी पंधरा वर्षे शहराचा विकास मागे जाईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यास सुरू केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनतेचे पाठबळ मिळत आहे म्हणूनच पक्षाला बदनाम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जात आहे; पण सुजाण जनता आमच्या पाठीशी राहील. यावेळी प्रा. जयंत पाटील म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक योजना आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणल्या. राष्ट्रवादीकडे विकासात्मक दृष्टिकोन असल्याने जनता आमच्याकडे सत्ता सोपवेल. यावेळी अजय कोराणे, राजेंद्र सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.