शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

कारवाईसाठी गेले, यंत्रणेअभावी परतले

By admin | Updated: April 22, 2015 00:54 IST

गौरवाडमधील घटना : बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी ग्रामस्थातून संताप; कारवाईबाबत साशंक

कुरुंदवाड : गौरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी कारवाईसाठी गेले. मात्र, कारवाईसाठी यंत्रणाच नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे अवैध वाळू उपसा व्यावसायिक व अधिकाऱ्यांत साटेलोटे आहे काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.ग्रामस्थांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी हे कर्मचारी व पोलिसांना घेऊन वाळू आवटीवर पोहोचले. मात्र, अधिकारी येत असल्याची चाहूल लागताच वाळू व्यावसायिक काही वेळातच आपल्या बोटी घेऊन निघून गेले. तसेच आलेल्या या पथकाकडे कारवाई करण्यासाठी जेसीबी अथवा ट्रक, अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने कारवाई न करताच ते अधिकारी माघारी परतले. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या या कारवाईबाबत ग्रामस्थही साशंक असून, ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू व्यावसायिक व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करीत आहेत. (वार्ताहर)रात्री अकरा नंतर वाळू उपसाकृष्णा नदीपात्रात आठ ते दहा ठिकाणांहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबरोबरच नदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पाणवट्यावर वाळू उपसा करू नये, यासाठी तहसीलदार सचिन गिरी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून दखल न घेता ग्रामस्थांच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे. रात्री ११ नंतर बोटीने वाळू उपसा करून वाहतूक केली जाते. उजाडताच सर्व काही शांत होते. वाळू व्यावसायिकांच्या या रात्रीच्या चोरीमुळे ग्रामस्थही हतबल झाले आहेत.